शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भारतने कॅनाडाच्या नागरिकांसाठी पुन्हा सुरू केली व्हिसा; फक्त 'या' लोकांना मिळणार परवानगी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 22:02 IST

India-Canada Issue: खालिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर भारत-कॅनडामधील संबंध बिघडले आहेत.

India-Canada Row: भारत आणि कॅनडामधील संबंध गेल्या काही दिवसांपासून बिघडलेले आहेत. खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरून दोन्ही देशांमध्ये वाद सुरू आहे. दरम्यान, भारताने कॅनेडियन नागरिकांसाठी बंद केलेली व्हिसा सेवा बुधवारी (25 ऑक्टोबर) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

कॅनडाच्या ओटावामधील भारतीय उच्चायुक्तांनी (High Commission of India) सोशल मीडियावर सांगितले की, व्हिसा सेवा केवळ प्रवेश व्हिसा, व्यवसाय व्हिसा, वैद्यकीय व्हिसा आणि कॉन्फरन्स व्हिसा या श्रेणींमध्ये सुरू करण्यात आल्या आहेत. उच्चायुक्तांनी निवेदनात पुढे म्हटले की, सुरक्षा कारणास्तव यापूर्वी व्हिसा देण्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. आता सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर पुन्हा व्हिसा सेवा सुरू करण्यात आली आहे. गुरुवारपासून (26 ऑक्टोबर) या निर्णयाची अंमलबजावणी होईल.

कॅनडाने 41 अधिकाऱ्यांना परत बोलावलेपरराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी अलीकडेच सांगितले होते की, भारतात कॅनडाच्या डिप्लोमॅट्सची संख्या जास्त आहे, त्यामुळे समतोल निर्माण करण्याची गरज आहे. हे लोक भारताच्या अंतर्गत बाबींमध्येही ढवळाढवळ करतात. त्यामुळे कॅनडाने आपले अधिकारी परत बोलवावे, आम्ही लवकरच त्यांना दिलेली सूट मागे घेणार आहोत. यानंतर कॅनडाला आपले 41 अधिकारी परत बोलावावे लागले. 

वाद कसा सुरू झाला?कॅनडात राहणाऱ्या खलिस्तानी समर्थक हरदीपसिंग निज्जरची जुन महिन्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी या हत्येचा आरोप भारतावर लावला. भारतीय गुप्तचर संस्थांनी हत्या केल्याचे वक्तव्य ट्रुडो यांनी त्यांच्या संसदेत केले. याला उत्तर देताना भारताने ट्रूडोचे सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले होते. या वक्तव्यानंतरच हा वाद सुरू झाला.

टॅग्स :IndiaभारतCanadaकॅनडाVisaव्हिसाInternationalआंतरराष्ट्रीयNarendra Modiनरेंद्र मोदीS. Jaishankarएस. जयशंकर