शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जगाला गरज भासली तेव्हा भारत पुढे आला : सरसंघचालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 12:00 IST

आज भारत अनेक देशांपेक्षा लोकशाही पद्धतींच्या आघाडीवर आहे

सीकर (राजस्थान): "भारताने नेहमीच सर्वांच्या कल्याणासाठी प्रयत्न केले असून आता तो जागतिक पटलावर आपले योग्य स्थान प्रस्थापित करत आहे," असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

ते सीकर येथील रेवासा धामातील श्री जानकीनाथ बड़ा मंदिरात स्वामी राघवाचार्य वेदांती महाराज यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. स्वामी राघवाचार्य हे रेवासा पीठाचे माजी पीठाधीश्वर होते.

भागवत म्हणाले, स्वातंत्र्यानंतर भारतात लोकशाही टिकेल का याबाबत शंका व्यक्त केली जात होती. मात्र, ती फक्त टिकलीच नाही तर संकटाच्या काळात जनतेने तिचे रक्षण केले. "आज भारत अनेक देशांपेक्षा लोकशाही पद्धतींच्या आघाडीवर आहे," असे ते पुढे बोलताना म्हणाले.

भारताच्या सांस्कृतिक प्रवासाचा उल्लेख करताना भागवत म्हणाले, देशाने समृद्धी व दारिद्रय, स्वातंत्र्य व परकीय सत्ता या सर्व टप्प्यांतून प्रवास केला तरी ध्येय अबाधित राहिले. "जगाला जेव्हा गरज भासली, तेव्हा भारत उभा राहिला," असे त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी त्यांनी स्वामी राघवाचार्याची मूर्ती अनावरण केली आणि नव्या गुरुकुल भवनाचे उद्घाटन केले. भागवत यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांचा समाजासाठीचा जिव्हाळा व समर्पण अधोरेखित केले. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRajasthanराजस्थान