शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
4
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
5
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
6
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
7
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
8
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
9
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
10
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
11
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
12
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
13
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
14
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
15
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
16
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
17
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
18
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
19
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...

जगाला गरज भासली तेव्हा भारत पुढे आला : सरसंघचालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 12:00 IST

आज भारत अनेक देशांपेक्षा लोकशाही पद्धतींच्या आघाडीवर आहे

सीकर (राजस्थान): "भारताने नेहमीच सर्वांच्या कल्याणासाठी प्रयत्न केले असून आता तो जागतिक पटलावर आपले योग्य स्थान प्रस्थापित करत आहे," असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

ते सीकर येथील रेवासा धामातील श्री जानकीनाथ बड़ा मंदिरात स्वामी राघवाचार्य वेदांती महाराज यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. स्वामी राघवाचार्य हे रेवासा पीठाचे माजी पीठाधीश्वर होते.

भागवत म्हणाले, स्वातंत्र्यानंतर भारतात लोकशाही टिकेल का याबाबत शंका व्यक्त केली जात होती. मात्र, ती फक्त टिकलीच नाही तर संकटाच्या काळात जनतेने तिचे रक्षण केले. "आज भारत अनेक देशांपेक्षा लोकशाही पद्धतींच्या आघाडीवर आहे," असे ते पुढे बोलताना म्हणाले.

भारताच्या सांस्कृतिक प्रवासाचा उल्लेख करताना भागवत म्हणाले, देशाने समृद्धी व दारिद्रय, स्वातंत्र्य व परकीय सत्ता या सर्व टप्प्यांतून प्रवास केला तरी ध्येय अबाधित राहिले. "जगाला जेव्हा गरज भासली, तेव्हा भारत उभा राहिला," असे त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी त्यांनी स्वामी राघवाचार्याची मूर्ती अनावरण केली आणि नव्या गुरुकुल भवनाचे उद्घाटन केले. भागवत यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांचा समाजासाठीचा जिव्हाळा व समर्पण अधोरेखित केले. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRajasthanराजस्थान