शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

धगधगती भारत-बांगलादेश सीमा! आपसांत लग्न झाली, लपून छपून भेटायचे पण २० दिवसांत सगळं बदललं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 18:23 IST

बांगलादेशात सुरु असलेल्या हिंसक आंदोलनात मागील २० दिवसांत ३२८ मृत्यू झालेत.  

पटना - बांगलादेशात अजान सुरू झाली की त्याचा आवाज आमच्या घरापर्यंत येतो. आमच्या इथल्या लोकांची लग्नेही बांगलादेशात झाली आहेत. सुरुवातीला आम्ही लपून छपून ये-जा करत होतो परंतु मागील २० दिवसांपासून सर्व परिस्थिती बदलली आहे. सध्याच्या परिस्थितीत कुणी बांगलादेशात जाण्याचा विचारही करू शकत नाही असं सांगत डोळ्यात अश्रू आणि भीतीही दिसत होती. पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर येथे राहणाऱ्या कुकरौधा बॉर्डरजवळ राहणाऱ्या व्यक्तीची ही कहाणी आहे. 

बांगलादेशातील हिंसक आंदोलनाचा फटका सीमेजवळ राहणाऱ्या या लोकांच्या आयुष्यावर पडला. कारण त्यांचे बागलादेशात रोटी-बेटी नाते होते. भारत आणि बांगलादेश यांच्यात ४०९६ किमी बॉर्डर आहे. त्यातील २२१७ किमी बॉर्डर पश्चिम बंगालला जोडलेली आहे आणि प.बंगालच्या उत्तरेकडील दिनाजपूर जिल्ह्यापासून बिहारचं किशनगंज अवघ्या २० किमी अंतरावर आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मार्गेत बांगलादेशी बिहारमध्ये ये-जा करत होते. बिहारमध्ये राहणारे बांगलादेशी याच मार्गाने जातात. 

बांगलादेशात सुरु असलेल्या हिंसक आंदोलनात मागील २० दिवसांत ३२८ मृत्यू झालेत.  भारत बांगलादेश सीमेजवळील एका गावात दैनिक भास्करनं साहिब या व्यक्तीची मुलाखत घेतली. त्यात तो म्हणाला की, माझं घर बॉर्डरपासून १ किमी अंतरावर आहे. नदीच्या या बाजूला आम्ही राहतो त्याबाजूला बांगलादेशी राहतात. आम्ही एकमेकांना भेटत नाही. शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी याठिकाणी जवान तैनात असतात. आम्ही नदीजवळ जाऊ शकतो, मासे पकडू शकतो पण त्याबाजूला जाऊ शकत नाही. कारण त्याबाजूला बांगलादेश आहे असं त्याने सांगितले. 

तर इस्लामपूर बॉर्डरहून याआधी ये-जा सुरू होती. परंतु आता चिघळलेल्या परिस्थितीमुळे कडक बंदोबस्त आहे. १ महिन्यापूर्वी याठिकाणी एवढा बंदोबस्त नव्हता. ये-जा सुरू होती परंतु आता सर्व बंद आहे असं किशनगंजमध्ये राहणाऱ्या जमालनं सांगितले. किशनगंज आणि कटिहारसह बिहारमधील अनेकांची लग्न बांगलादेशात झाली आहेत. नेपाळसारखेच बांगलादेशात भारतीय लोकांची लग्न झालीत. त्यामुळे याठिकाणी बेटी-रोटीचं नाते बांगलादेशासोबत आहे. 

टॅग्स :IndiaभारतBangladeshबांगलादेश