शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

'INDIA' आघाडी संपुष्टात?; काँग्रेस नेत्याच्या विधानानं उधाण; "केवळ लोकसभेपुरती..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 18:54 IST

ही आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीपुरती असेल. विधानसभा निवडणुकीत ही आघाडी असणार नाही असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं होते त्यानंतर काँग्रेससह आणखी एका घटक पक्षाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीला ८ महिने झाले नाही तोवर देशात भाजपा विरोधी पक्षांनी बनवलेली INDIA आघाडी संपुष्टात आली का असा प्रश्न काँग्रेस नेत्याच्या विधानानं निर्माण झाला आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येत देशात इंडिया आघाडी बनवली. मात्र आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्यानंतर आता काँग्रेस नेते पवन खेडा यांनी ही आघाडी केवळ लोकसभेपुरती होती असं विधान केले आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

इंडिया आघाडीबाबत विचारलेल्या प्रश्नावर पवन खेडा म्हणाले की, ही आघाडी लोकसभेपुरती होती. इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी होती जी राष्ट्रीय स्तरावर होती. आपल्याला एकत्र लढले पाहिजे की नाही याचा निर्णय विविध राज्यात तिथल्या परिस्थितीनुसार जे पक्ष आहेत मग काँग्रेस असो वा प्रादेशिक पक्ष घेत असतात असं त्यांनी सांगितले.

तेजस्वी यादव काय म्हणाले होते?

'इंडिया आघाडी बनवत असताना असं ठरलं होतं की, ही आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीपुरती असेल. विधानसभा निवडणुकीत ही आघाडी असणार नाही असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं होते. गेल्या काही महिन्यात इंडिया आघाडीतील घटक पक्षांकडूनच काँग्रेसबद्दल नाराजीचे सूर उमटत आहेत. त्यात आता तेजस्वी यादवांनी विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्याबद्दल सूचक विधान केले होते. 

"इंडिया आघाडी विसर्जित करा"

दरम्यान, दिल्ली निवडणुकीपूर्वी आप आणि काँग्रेसमधील जोरदार वादावर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी भाष्य केले. विरोधी पक्ष एकजूट नाही, त्यामुळे इंडिया आघाडी विसर्जित करायला हवी. इंडिया आघाडीची बैठक झाली नाही हे दुर्दैवी आहे. कोण नेतृत्व करेल? अजेंडा काय असेल? युती कशी पुढे जाईल? या मुद्द्यांवर कोणतीही चर्चा झालेली नाही. तिथे या विषयावर कोणतीही स्पष्टता नाही. आपण एकजूट राहू की नाही हा प्रश्न आहे. जर ती आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीसाठी असेल तर आता ती संपवली पाहिजे, परंतु जर ती विधानसभा निवडणुकीसाठी चालू ठेवायची असेल तर मग आपल्याला एकत्र काम करावे लागेल असं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं. 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसTejashwi Yadavतेजस्वी यादवOmar Abdullahउमर अब्दुल्ला