शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

'INDIA' आघाडी संपुष्टात?; काँग्रेस नेत्याच्या विधानानं उधाण; "केवळ लोकसभेपुरती..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 18:54 IST

ही आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीपुरती असेल. विधानसभा निवडणुकीत ही आघाडी असणार नाही असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं होते त्यानंतर काँग्रेससह आणखी एका घटक पक्षाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीला ८ महिने झाले नाही तोवर देशात भाजपा विरोधी पक्षांनी बनवलेली INDIA आघाडी संपुष्टात आली का असा प्रश्न काँग्रेस नेत्याच्या विधानानं निर्माण झाला आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येत देशात इंडिया आघाडी बनवली. मात्र आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्यानंतर आता काँग्रेस नेते पवन खेडा यांनी ही आघाडी केवळ लोकसभेपुरती होती असं विधान केले आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

इंडिया आघाडीबाबत विचारलेल्या प्रश्नावर पवन खेडा म्हणाले की, ही आघाडी लोकसभेपुरती होती. इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी होती जी राष्ट्रीय स्तरावर होती. आपल्याला एकत्र लढले पाहिजे की नाही याचा निर्णय विविध राज्यात तिथल्या परिस्थितीनुसार जे पक्ष आहेत मग काँग्रेस असो वा प्रादेशिक पक्ष घेत असतात असं त्यांनी सांगितले.

तेजस्वी यादव काय म्हणाले होते?

'इंडिया आघाडी बनवत असताना असं ठरलं होतं की, ही आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीपुरती असेल. विधानसभा निवडणुकीत ही आघाडी असणार नाही असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं होते. गेल्या काही महिन्यात इंडिया आघाडीतील घटक पक्षांकडूनच काँग्रेसबद्दल नाराजीचे सूर उमटत आहेत. त्यात आता तेजस्वी यादवांनी विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्याबद्दल सूचक विधान केले होते. 

"इंडिया आघाडी विसर्जित करा"

दरम्यान, दिल्ली निवडणुकीपूर्वी आप आणि काँग्रेसमधील जोरदार वादावर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी भाष्य केले. विरोधी पक्ष एकजूट नाही, त्यामुळे इंडिया आघाडी विसर्जित करायला हवी. इंडिया आघाडीची बैठक झाली नाही हे दुर्दैवी आहे. कोण नेतृत्व करेल? अजेंडा काय असेल? युती कशी पुढे जाईल? या मुद्द्यांवर कोणतीही चर्चा झालेली नाही. तिथे या विषयावर कोणतीही स्पष्टता नाही. आपण एकजूट राहू की नाही हा प्रश्न आहे. जर ती आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीसाठी असेल तर आता ती संपवली पाहिजे, परंतु जर ती विधानसभा निवडणुकीसाठी चालू ठेवायची असेल तर मग आपल्याला एकत्र काम करावे लागेल असं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं. 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसTejashwi Yadavतेजस्वी यादवOmar Abdullahउमर अब्दुल्ला