शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

EVM च्या मुद्द्यावरुन INDIA आघाडीत मतभेद; NC नंतर आता TMC ची काँग्रेसवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 17:57 IST

INDIA Alliance : तुम्ही जिंकता तेव्हा EVM योग्य, हरता तेव्हा दोष देता; ओमर अब्दुल्लांनी काँग्रेसला दाखवला आरसा

INDIA Alliance : हरियाणा आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने पुन्हा एकदा EVM वर खापर फोडायला सुरुवात केली आहे. अनेक नेत्यांनी तर पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. मात्र, याच मुद्द्यावरुन INDIA आघाडीत दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. या मुद्द्यावर इंडिया आघाडीतील  मित्रपक्षांनी काँग्रेसकडे पाठ फिरवली आहे.

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनीदेखील काँग्रेसचे EVM वरील आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. सोमवारी संसद भवन संकुलात प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले, 'ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांकडे याचे पुरावे असतील, तर त्यांनी ते निवडणूक आयोगाकडे सादर करावे. अशा आरोपांमध्ये काही तथ्य नाही, असे मला वाटते. अजूनही कोणाला वाटत असेल की, ईव्हीएम हॅक होऊ शकते, तर त्यांनी निवडणूक आयोगाला सिद्ध करुन दाखवावे अन्यथा असे निरर्थक विधाने करुन काहीही होणार नाही,' असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.

ओमर अब्दुल्ला काय म्हणाले?जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीदेखील ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर निशाणा साधला. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ओमर म्हणतात, 'जेव्हा तुम्ही जिंकता, तेव्हा तुम्ही निवडणूक निकाल स्वीकारता आणि जेव्हा तुम्ही हरता, तेव्हा तुम्ही ईव्हीएमला दोष देता. तुमचे 100 पेक्षा जास्त खासदार याच EVM मुळे निवडून आले, तेव्हा तुम्ही पक्षाचा विजय म्हणून साजरा केला. आता निवडणुकीचे निकाल तुमच्या मनासारखे लागले नाही, म्हणून तुम्ही EVM ला दोष देऊ शकत नाही,' अशी बोचरी टीका त्यांनी केली. 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीOmar Abdullahउमर अब्दुल्लाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस