शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

EVM च्या मुद्द्यावरुन INDIA आघाडीत मतभेद; NC नंतर आता TMC ची काँग्रेसवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 17:57 IST

INDIA Alliance : तुम्ही जिंकता तेव्हा EVM योग्य, हरता तेव्हा दोष देता; ओमर अब्दुल्लांनी काँग्रेसला दाखवला आरसा

INDIA Alliance : हरियाणा आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने पुन्हा एकदा EVM वर खापर फोडायला सुरुवात केली आहे. अनेक नेत्यांनी तर पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. मात्र, याच मुद्द्यावरुन INDIA आघाडीत दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. या मुद्द्यावर इंडिया आघाडीतील  मित्रपक्षांनी काँग्रेसकडे पाठ फिरवली आहे.

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनीदेखील काँग्रेसचे EVM वरील आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. सोमवारी संसद भवन संकुलात प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले, 'ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांकडे याचे पुरावे असतील, तर त्यांनी ते निवडणूक आयोगाकडे सादर करावे. अशा आरोपांमध्ये काही तथ्य नाही, असे मला वाटते. अजूनही कोणाला वाटत असेल की, ईव्हीएम हॅक होऊ शकते, तर त्यांनी निवडणूक आयोगाला सिद्ध करुन दाखवावे अन्यथा असे निरर्थक विधाने करुन काहीही होणार नाही,' असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.

ओमर अब्दुल्ला काय म्हणाले?जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीदेखील ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर निशाणा साधला. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ओमर म्हणतात, 'जेव्हा तुम्ही जिंकता, तेव्हा तुम्ही निवडणूक निकाल स्वीकारता आणि जेव्हा तुम्ही हरता, तेव्हा तुम्ही ईव्हीएमला दोष देता. तुमचे 100 पेक्षा जास्त खासदार याच EVM मुळे निवडून आले, तेव्हा तुम्ही पक्षाचा विजय म्हणून साजरा केला. आता निवडणुकीचे निकाल तुमच्या मनासारखे लागले नाही, म्हणून तुम्ही EVM ला दोष देऊ शकत नाही,' अशी बोचरी टीका त्यांनी केली. 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीOmar Abdullahउमर अब्दुल्लाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस