शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

भारतात मधुमेहाची १२३ टक्के वाढ

By admin | Updated: June 16, 2015 02:41 IST

भारतात गेल्या दोन दशकापासून मधुमेह हा मुख्य रोग बनला असून, १९९० ते २०१३ या कालावधीत जगात मधुमेह ४५ टक्क्याने वाढला असताना

नवी दिल्ली : भारतात गेल्या दोन दशकापासून मधुमेह हा मुख्य रोग बनला असून, १९९० ते २०१३ या कालावधीत जगात मधुमेह ४५ टक्क्याने वाढला असताना, भारतात मात्र तो १२३ टक्के वाढलेला दिसत आहे. भारतात महिला व पुरुषात सारख्याच धोकादायक ठरलेल्या या रोगामुळे स्थूलता, झोपमोड, युरीन इन्फेक्शन, हृदयविकार असे अनेक रोग होऊ शकतात. वॉशिंग्टन विद्यापीठातील हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन या विभागाने जागतिक पातळीवर हा अभ्यास केला असून निष्कर्ष काढला आहे. १८८ देशांतील ३०१ तीव्र रोग व पारंपरिक रोग व जखमा यांचा यात अभ्यास करण्यात आला आहे. गेल्या काही दशकांत विकसित देशात मधुमेहाचा प्रसार हा चिंतेचा विषय होता; मात्र आता भारत, चीन, मेक्सिको या विकसनशील देशांतही हाच रोग हातपाय पसरत असल्याचे दिसत आहे. मधुमेहाच्या सर्वच प्रकारांची वाढ होत असली तरीही टाईप २ मधुमेह जास्त वाढताना दिसत आहे. या मधुमेहाचे मुख्य कारण स्थूलता हे आहे. भारतातील युवा पिढीच्या खाण्याच्या व झोपण्याच्या सवयी बदलत असून शारीरिक हालचाली कमी होत आहेत. त्यामुळे या मधुमेहाचा शिरकाव होताना दिसत आहे असे फोर्टिस-सीडॉक फॉर डायबेटिसमधील एन्डोक्रिनॉलॉजिस्ट डॉ. अनुप मिश्रा यांनी म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)