शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

Independence Day 2022 : भारीच! स्वातंत्र्यानंतर तब्बल 75 वर्षांनी देशातील 'या' गावात पहिल्यांदाच फडकला तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 19:48 IST

Independence Day 2022 : स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 75 वर्षांनी एका गावात पहिल्यांदा तिरंगा फडकला आहे.

नवी दिल्ली - देशभरात जल्लोषात आज स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 75 वर्षांनी एका गावात पहिल्यांदा तिरंगा फडकला आहे. छत्तीसगड राज्यातील बस्तर जिल्ह्यातील चांदामेटा गावातील ग्रामस्थांनी पहिल्यांदा तिरंग्याला वंदन केलं. छत्तीसगड आणि ओडिशाच्या सीमेवर असलेल्या चांदामेटा गावात नक्षलवाद्यांचं वर्चस्व होतं. एकेकाळी नक्षलवादी तिथं प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबवायचे. चांदामेटा गावाला नक्षलवाद्यांची राजधानी म्हटलं जायचं, मात्र सरकार आणि सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांचं वर्चस्व कमी केलं आहे.

पोलीस आणि सुरक्षा दलांच्या प्रयत्नांनी चांदामेटा परिसरातील नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी होत आहे. चांदामेटाच्या भागात सुरक्षा दलांनी कॅम्प टाकले आहेत. त्यामुळं चांदामेटा गावातील लोकांनी आणि सुरक्षा दलांनी पहिल्यांदा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, चांदामेटा गावातील लोकांनी सकाळपासून घराबाहेर पडून सुरक्षा दलांच्या कॅम्पजवळ जमा होण्याचा निर्णय घेतला होता. 

सुरुवातीला कॅम्पमध्ये जिल्हा पोलीस दल आणि सीआरपीएफसोबत मिळून झेंडावंदन केलं. ग्रामस्थांनी यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांच्या साथीनं तिरंगा हाती घेत गावातून फेरी काढली. एकेकाळी ज्या भागात नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेला बस्तर जिल्हा बदलत असल्याचं दिसत आहे. स्वातंत्र्यांच्या 75 वर्षानंतर चांदामेटा गावात पहिल्यांदा तिरंगा फडकला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

तांदूळ 12 पैसे, साखर 40 पैसे किलो, पेट्रोल 25 पैसे लीटर; गेल्या 75 वर्षांत 'अशा' बदलल्या किमती

गेल्या काही वर्षांत देशात महागाईही वाढली आणि अनेक वस्तू आणि सेवांच्या जुन्या किमती आज स्वप्नवत वाटत आहेत. 1947 आणि 2022 मधील काही वस्तूंच्या किमतींची तुलना करा. त्यात जुन्या किमती पाहून तुम्ही हैराण व्हाल. तेव्हाच्या आणि आताच्या किमती जाणून घेऊया.1947 मध्ये एक किलो तांदूळ 12 पैशांना मिळत होता, जो आज 40 रुपये किलोने विकला जातो. तसेच साखर तेव्हा 40 पैसे प्रतिकिलो होती, पण आज 42 रुपये किलो आहे. बटाटा 25 पैशांवरून 25 रुपयांवर गेला आहे. दूध 12 पैशांवरून 60 रुपये किलोवर पोहोचलं आहे.

आज पेट्रोल 97 रुपये लिटर आहे पण 1947 मध्ये तुम्हाला एक लिटर पेट्रोल फक्त 25 पैशांना मिळायचे. आज सायकलची किंमत 8,000 रुपये आहे, 1947 मध्ये ती फक्त 20 रुपयांना मिळत होती. तुम्ही फ्लाइटमध्ये फक्त 140 रुपये खर्च करून दिल्ली ते मुंबई जाऊ शकत होता. मात्र, आता तुम्हाला यासाठी सुमारे 7,000 रुपये खर्च करावे लागतील. त्याचप्रमाणे महागाईशी लढण्याचे हत्यार असलेले सोने 1947 मध्ये 88 रुपयांना 10 ग्रॅम होते. आज तेच सोने 52 हजार रुपयांवर पोहोचले आहे. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनChhattisgarhछत्तीसगड