शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

Independence Day 2022 : भारीच! स्वातंत्र्यानंतर तब्बल 75 वर्षांनी देशातील 'या' गावात पहिल्यांदाच फडकला तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 19:48 IST

Independence Day 2022 : स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 75 वर्षांनी एका गावात पहिल्यांदा तिरंगा फडकला आहे.

नवी दिल्ली - देशभरात जल्लोषात आज स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 75 वर्षांनी एका गावात पहिल्यांदा तिरंगा फडकला आहे. छत्तीसगड राज्यातील बस्तर जिल्ह्यातील चांदामेटा गावातील ग्रामस्थांनी पहिल्यांदा तिरंग्याला वंदन केलं. छत्तीसगड आणि ओडिशाच्या सीमेवर असलेल्या चांदामेटा गावात नक्षलवाद्यांचं वर्चस्व होतं. एकेकाळी नक्षलवादी तिथं प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबवायचे. चांदामेटा गावाला नक्षलवाद्यांची राजधानी म्हटलं जायचं, मात्र सरकार आणि सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांचं वर्चस्व कमी केलं आहे.

पोलीस आणि सुरक्षा दलांच्या प्रयत्नांनी चांदामेटा परिसरातील नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी होत आहे. चांदामेटाच्या भागात सुरक्षा दलांनी कॅम्प टाकले आहेत. त्यामुळं चांदामेटा गावातील लोकांनी आणि सुरक्षा दलांनी पहिल्यांदा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, चांदामेटा गावातील लोकांनी सकाळपासून घराबाहेर पडून सुरक्षा दलांच्या कॅम्पजवळ जमा होण्याचा निर्णय घेतला होता. 

सुरुवातीला कॅम्पमध्ये जिल्हा पोलीस दल आणि सीआरपीएफसोबत मिळून झेंडावंदन केलं. ग्रामस्थांनी यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांच्या साथीनं तिरंगा हाती घेत गावातून फेरी काढली. एकेकाळी ज्या भागात नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेला बस्तर जिल्हा बदलत असल्याचं दिसत आहे. स्वातंत्र्यांच्या 75 वर्षानंतर चांदामेटा गावात पहिल्यांदा तिरंगा फडकला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

तांदूळ 12 पैसे, साखर 40 पैसे किलो, पेट्रोल 25 पैसे लीटर; गेल्या 75 वर्षांत 'अशा' बदलल्या किमती

गेल्या काही वर्षांत देशात महागाईही वाढली आणि अनेक वस्तू आणि सेवांच्या जुन्या किमती आज स्वप्नवत वाटत आहेत. 1947 आणि 2022 मधील काही वस्तूंच्या किमतींची तुलना करा. त्यात जुन्या किमती पाहून तुम्ही हैराण व्हाल. तेव्हाच्या आणि आताच्या किमती जाणून घेऊया.1947 मध्ये एक किलो तांदूळ 12 पैशांना मिळत होता, जो आज 40 रुपये किलोने विकला जातो. तसेच साखर तेव्हा 40 पैसे प्रतिकिलो होती, पण आज 42 रुपये किलो आहे. बटाटा 25 पैशांवरून 25 रुपयांवर गेला आहे. दूध 12 पैशांवरून 60 रुपये किलोवर पोहोचलं आहे.

आज पेट्रोल 97 रुपये लिटर आहे पण 1947 मध्ये तुम्हाला एक लिटर पेट्रोल फक्त 25 पैशांना मिळायचे. आज सायकलची किंमत 8,000 रुपये आहे, 1947 मध्ये ती फक्त 20 रुपयांना मिळत होती. तुम्ही फ्लाइटमध्ये फक्त 140 रुपये खर्च करून दिल्ली ते मुंबई जाऊ शकत होता. मात्र, आता तुम्हाला यासाठी सुमारे 7,000 रुपये खर्च करावे लागतील. त्याचप्रमाणे महागाईशी लढण्याचे हत्यार असलेले सोने 1947 मध्ये 88 रुपयांना 10 ग्रॅम होते. आज तेच सोने 52 हजार रुपयांवर पोहोचले आहे. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनChhattisgarhछत्तीसगड