शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

Independence Day 2022 : भारीच! स्वातंत्र्यानंतर तब्बल 75 वर्षांनी देशातील 'या' गावात पहिल्यांदाच फडकला तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 19:48 IST

Independence Day 2022 : स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 75 वर्षांनी एका गावात पहिल्यांदा तिरंगा फडकला आहे.

नवी दिल्ली - देशभरात जल्लोषात आज स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 75 वर्षांनी एका गावात पहिल्यांदा तिरंगा फडकला आहे. छत्तीसगड राज्यातील बस्तर जिल्ह्यातील चांदामेटा गावातील ग्रामस्थांनी पहिल्यांदा तिरंग्याला वंदन केलं. छत्तीसगड आणि ओडिशाच्या सीमेवर असलेल्या चांदामेटा गावात नक्षलवाद्यांचं वर्चस्व होतं. एकेकाळी नक्षलवादी तिथं प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबवायचे. चांदामेटा गावाला नक्षलवाद्यांची राजधानी म्हटलं जायचं, मात्र सरकार आणि सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांचं वर्चस्व कमी केलं आहे.

पोलीस आणि सुरक्षा दलांच्या प्रयत्नांनी चांदामेटा परिसरातील नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी होत आहे. चांदामेटाच्या भागात सुरक्षा दलांनी कॅम्प टाकले आहेत. त्यामुळं चांदामेटा गावातील लोकांनी आणि सुरक्षा दलांनी पहिल्यांदा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, चांदामेटा गावातील लोकांनी सकाळपासून घराबाहेर पडून सुरक्षा दलांच्या कॅम्पजवळ जमा होण्याचा निर्णय घेतला होता. 

सुरुवातीला कॅम्पमध्ये जिल्हा पोलीस दल आणि सीआरपीएफसोबत मिळून झेंडावंदन केलं. ग्रामस्थांनी यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांच्या साथीनं तिरंगा हाती घेत गावातून फेरी काढली. एकेकाळी ज्या भागात नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेला बस्तर जिल्हा बदलत असल्याचं दिसत आहे. स्वातंत्र्यांच्या 75 वर्षानंतर चांदामेटा गावात पहिल्यांदा तिरंगा फडकला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

तांदूळ 12 पैसे, साखर 40 पैसे किलो, पेट्रोल 25 पैसे लीटर; गेल्या 75 वर्षांत 'अशा' बदलल्या किमती

गेल्या काही वर्षांत देशात महागाईही वाढली आणि अनेक वस्तू आणि सेवांच्या जुन्या किमती आज स्वप्नवत वाटत आहेत. 1947 आणि 2022 मधील काही वस्तूंच्या किमतींची तुलना करा. त्यात जुन्या किमती पाहून तुम्ही हैराण व्हाल. तेव्हाच्या आणि आताच्या किमती जाणून घेऊया.1947 मध्ये एक किलो तांदूळ 12 पैशांना मिळत होता, जो आज 40 रुपये किलोने विकला जातो. तसेच साखर तेव्हा 40 पैसे प्रतिकिलो होती, पण आज 42 रुपये किलो आहे. बटाटा 25 पैशांवरून 25 रुपयांवर गेला आहे. दूध 12 पैशांवरून 60 रुपये किलोवर पोहोचलं आहे.

आज पेट्रोल 97 रुपये लिटर आहे पण 1947 मध्ये तुम्हाला एक लिटर पेट्रोल फक्त 25 पैशांना मिळायचे. आज सायकलची किंमत 8,000 रुपये आहे, 1947 मध्ये ती फक्त 20 रुपयांना मिळत होती. तुम्ही फ्लाइटमध्ये फक्त 140 रुपये खर्च करून दिल्ली ते मुंबई जाऊ शकत होता. मात्र, आता तुम्हाला यासाठी सुमारे 7,000 रुपये खर्च करावे लागतील. त्याचप्रमाणे महागाईशी लढण्याचे हत्यार असलेले सोने 1947 मध्ये 88 रुपयांना 10 ग्रॅम होते. आज तेच सोने 52 हजार रुपयांवर पोहोचले आहे. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनChhattisgarhछत्तीसगड