शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

Independence Day 2021 : 'कित्येक वर्षांपूर्वी आपण नियतीशी करार केला होता....'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 08:48 IST

Celebrating Happy Independence Day 2021: पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेले "ट्रिस्ट विथ डेस्टिनी' (नियतीशी करार) हे भाषण हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एका ऊर्जस्वल ठेवा आहे. त्या भाषणाचा हा भावानुवाद...

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. 14 ऑगस्टच्या मध्यरात्री संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात शपथ घेण्यासाठी लोकप्रतिनिधी जमले असताना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेले "ट्रिस्ट विथ डेस्टिनी' (नियतीशी करार) हे भाषण हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एका ऊर्जस्वल ठेवा आहे. त्या भाषणाचा हा भावानुवाद :

कित्येक वर्षांपूर्वी आपण नियतीशी करार केला होता आणि  आज आपली प्रतिज्ञा पूर्णत्वाने नव्हे परंतु ब-याच अंशी प्रत्यक्षात घेण्याचा क्षण आला आहे .  मध्यरात्रीच्या या प्रशांत समयी सारे जग झोपलेले असताना, भारत स्वातंत्र्याच्या युगात नवा जन्म घेत आहे. इतिहासात असा क्षण क्वचितच येतो. आपण जुने ते सारे त्यागून नव्याकडे जात आहोत.   एका युगाचा अंत होतो आहे.  वर्षानुवर्षे दडपलेला राष्ट्राचा आत्मा आज मुक्त होत आहे. या औपचारिक, धीरगंभीर आणि प्रगल्भ क्षणी;   आपण भारताच्या, भारतवासीयांच्या आणि त्याहूनही मोठ्या अशा  मानवतेप्रति आम्ही समर्पित होऊ अशी प्रतिज्ञा करीत आहोत.  इतिहासाच्या प्रारंभापासूनच भारतभूमीने आपला न संपणारा शोध सुरू केला. शतकानुशतके अविरत संघर्ष केला आणि यश-अपयशाच्या डोंगरदऱ्याही पार केल्या. चांगल्या आणि वाईट काळातदेखील भारताची दृष्टी या शोधापासून कधीही ढळली नाही, भारताला आपल्या या शोधाचा; तसेच स्वतःला शक्ती देणाऱ्या मूल्यांचा कधीच विसर पडला नाही. एका दुर्दैवी कालखंडातील आपला प्रवास आज संपत आहे आणि भारताला पुन्हा एकदा स्वतःचाच शोध लागला आहे, स्वत्वाची जाणीव होते आहे.  हे यश म्हणजे एक संधी आहे : आपल्या प्रतीक्षेत असणाऱ्या अनेक मोठ्या विजयांची आणि यशाची पहिली पायरी आहे.ही संधी प्राप्त करण्याइतका सुज्ञपणा आणि भावी आव्हाने पेलण्याइतके सामर्थ्य आपल्यात आहे का?- हा प्रश्न आज आपण स्वतःला विचारला पाहिजे. स्वातंत्र्य आणि सत्ता यांच्या जोडीने जबाबदारीदेखील येते. सार्वभौम भारतीयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या घटनासमितीवर ही जबाबदारी आहे.  स्वातंत्र्याचा जन्म होण्याआधी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी झगडलेल्या या देशाने सर्व प्रकारच्या वेदना सहन केल्या आहेत. त्यात सुख होते, तसे दु:खा आणि क्लेशही होते! त्या आठवणींचा सल अजूनही मनाशी आहे. असो. आता तो भूतकाळ संपला आहे, आपण आपल्या भविष्यकाळाच्या दारात उभे राहिलो आहोत!  हा भावी काळ सहजसाध्य  नाही, विसावा घ्यावा असाही  नाही. आतापर्यंत आपण घेतलेल्या अनेक प्रतिज्ञांची पूर्तता करण्यासाठी आपलयाला अविरत झटावे लागणार आहे. भारताची सेवा म्हणजे भारतातील कोट्यवधी पीडितांची सेवा.  दारिद्य्र, अज्ञान, रोगराई, संधींची असमानता यांचे उच्चाटन म्हणजेच भारताची सेवा.  प्रत्येकाच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसला गेला पाहिजे ही आपल्या पिढीतील सर्वांत थोर व्यक्तीची महत्त्वाकांक्षा आहे. हे काम कदाचित आपल्या क्षमतेच्या पलीकडील असेल; परंतु जोपर्यंत दुःख आणि अश्रू असतील, तोपर्यंत आपले काम संपणार नाही. कठोर परिश्रम घ्यावे लागतील, त्यासाठी वाट्याला येईल ते सारे सोसावे लागेल, अथक काम करावे लागेल , तरच आपण पाहिलेली सारी स्वप्ने साकार होऊ शकतील. ही स्वप्ने फक्त भारताची, भारतासाठी नाहीत; ती जगाची स्वप्ने आहेत, जगासाठी पाहिली गेलेली आहेत ! जगभरातील  देश आणि या पृथ्वीवरील सारी माणसे एकमेकांशी इतकी  जोडली गेलेली  आहेत, की कोणा एकाला इतरांपासून विलग करता येईल, अलग राहता येईल, अशी कल्पनासुद्धा करणे शक्य नाही. शांती, स्वातंत्र्य, समृद्धी आणि संकटे हे सारे आजच्या अविच्छिन्न एकमय जगात अविभाज्य आहेत. इतरांपासून फुटून निघालेले,  एकट्याचे असे वेगळे काही यापुढच्या जगात असणार नाही.अवघ्या भारतविश्वातील जनतेचे आपण प्रतिनिधी आहोत . या नात्याने मी सर्वाना आवाहन करतो, स्वातंत्र्याच्या युगात पाऊल टाकत असताना या साहसी प्रवासात  श्रद्धेने आणि विश्‍वासाने आमच्यासोबत असा. ही वेळ क्षुद्र आणि विघातक टीकेची नाही; तसेच अनिष्ट चिंतनाची, विद्वेषाची आणि आरोप-प्रत्यारोपांचीही नाही. भारतमातेची सारी लेकरे जिथे सुखाने नांदू शकतील , अशा स्वतंत्र भारताच्या प्रासादाची उभारणी आपल्याला करायची आहे. 

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूIndependence Dayस्वातंत्र्य दिन