शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

म्युकोरमायकोसिसचा धोका वाढतोय, काेराेनामुक्त झालेल्यांना लागण; राज्यात २००हून अधिक रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 06:10 IST

स्टेराॅईडच्या वापरामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, परिणामी औषधांमुळे रोगप्रतिकारकशक्तीही कमी होते. अशा स्थितीत म्युकोरमायकोसिसचा संसर्ग होतो. हा संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचला की, रुग्णाची स्थिती अत्यवस्थ होण्याचा धोका असतो.

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांत कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने दिलासाजनक स्थिती आहे, मात्र कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींमध्ये म्युकोरमायकोसिसचा धोका वाढत असल्याने वैद्यकीय वर्तुळातून चिंता व्यक्त केली जात आहे. 

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात म्युकोरमायकोसिस आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या दुसऱ्या लाटेत  २०० वर गेली असून यामुळे आतापर्यंत आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, म्युकोरमायकोसिस आजाराचे प्रमाण वाढत आहे. याला ब्लॅक फंगस असेही म्हणतात. राज्यात जे कोविड रुग्ण ऑक्सिजनवर आहेत, त्यांच्यात ऑक्सिजनमुळे आर्द्रता निर्माण होते, परिणामी या रुग्णांना म्युकोरमायकोसिसची लागण होण्याची शक्यता अधिक अधिक असते. काेराेनामुक्त मधुमेहींना याचा धाेका अधिक असताे. म्युकोरमायकोसिस आजार पूर्वीपासून अस्तित्वात आहे; मात्र कोरोनामुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीमुळे याची लागण हाेत आहे. 

स्टेराॅईडच्या वापरामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, परिणामी औषधांमुळे रोगप्रतिकारकशक्तीही कमी होते. अशा स्थितीत म्युकोरमायकोसिसचा संसर्ग होतो. हा संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचला की, रुग्णाची स्थिती अत्यवस्थ होण्याचा धोका असतो.पहिल्या लाटेतही रुग्ण, मात्र प्रमाण कमी गेल्या दोन आठवड्यांपासून केईएम रुग्णालयात म्युकोरमायकोसिस आजार झालेले रुग्ण येत आहेत. दर दिवसाला २-३ रुग्ण येतात, यात बरेचसे रुग्ण मुंबईबाहेरील आहेत. त्यांना उपचारांचा खर्च परवडत नाही, त्यामुळे पालिका रुग्णालयात येतात; मात्र रुग्णालयात येईपर्यंत या रुग्णांचा आजार गंभीर झालेला असतो. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही म्युकोरमायकोसिस या आजाराचे रुग्ण होते, परंतु त्या वेळेस हा संसर्ग कोरोनामुक्त झाल्यानंतर दोन आठवड्यांनी दिसून येत होता. पण आता कोरोनावरील उपचार सुरू असतानाच या आजाराची लागण होत असल्याचे दिसून येत आहे.

- डॉ. हेतल मारफातिया, कान-नाक-घसातज्ज्ञ म्युकोरमायकोसिस म्हणजे काय?हे एक दुर्मीळ फंगल इंफेक्शन आहे, याला झिगॉमायकोसिस असेही म्हणतात. यात रोग आणि जंतूंचा सामना करण्याची क्षमता कमी होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर मधुमेह असलेल्या नागरिकांना हा आजार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. वेळेत उपचार घेतल्यास रुग्ण लवकर बरा होऊ शकतो. तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, डोकेदुखी, सायनस, रक्तसंचय, तोंडाच्या वरच्या भागात ताप येणे ही म्युकोरमायकोसिसची लक्षणे आहेत. हा नवीन आजार नाही. मात्र कोरोना नसताना वर्षा-दोन वर्षातून एखादी केस पाहायला मिळायची. पहिल्या कोरोना लाटेत फार रुग्ण नव्हते, पण दुसऱ्या लाटेत म्युकोरमायकोसिस आजार हाेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

अवयवांचे हाेते नुकसानम्युकोरमायकोसिस हा असा आजार आहे, ज्याद्वारे श्वासोच्छवास आणि त्वचेच्या माध्यमातून रोगजंतू शरीरात प्रवेश करतात आणि वेगवेगळ्या अवयवांचे नुकसान करतात. फुफ्फुस आणि त्वचेमध्ये या फंगल इंफेक्शनची सुरुवात होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस