शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची मदार ‘अँटी इन्कम्बन्सी’वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 13:16 IST

विधानसभेच्या ७० जागांसाठी १४ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. राज्य म्हणून अस्तित्वात आल्यापासून, नारायणदत्त तिवारी यांचा पाच वर्षांचा कालखंड वगळता उत्तराखंडच्या नशिबी स्थैर्य आलेच नाही.

रवी टाले - डेहराडून : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीचे मतदान अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपले असताना, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची मदार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिश्म्यावर, तर सत्तेची स्वप्ने बघत असलेल्या काँग्रेसची ‘अँटी इन्कम्बन्सी’वर असल्याचे चित्र दिसत आहे. विधानसभेच्या ७० जागांसाठी १४ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. राज्य म्हणून अस्तित्वात आल्यापासून, नारायणदत्त तिवारी यांचा पाच वर्षांचा कालखंड वगळता उत्तराखंडच्या नशिबी स्थैर्य आलेच नाही. राज्याने उण्यापुऱ्या दोन दशकांत तब्बल दहा मुख्यमंत्री बघितले. गत निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत लाभूनही पाच वर्षांत तीन मुख्यमंत्री नशिबी आले. २०१७ मध्ये दिसली तशी मोदींची लाट यावेळी दिसत नसली तरी, त्यांचा जादुई करिश्मा कायम आहे आणि त्या बळावर यावेळीही तरून जाऊ, अशी भाजपची अपेक्षा आहे.   राज्यात एकूण १३ जिल्ह्यांत ७० विधानसभा मतदारसंघ असले, तरी त्यापैकी तब्बल ३० डेहराडून, हरिद्वार आणि उधमसिंगनगर या तीनच जिल्ह्यांत आहेत. त्यापैकी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्याला सीमा लागून असलेल्या उधमसिंगनगर जिल्ह्यात शीख शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे आणि त्यांनी भाजपची डोकेदुखी वाढवली आहे.  

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडUttarakhand Assembly Election 2022उत्तराखंड विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेसBJPभाजपा