शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

Bihar Elections: बिहारमधील विधान परिषद निवडणुकीत भाजपा, जेडीयूला धक्का, सर्वाधिक जागा जिंकल्या, पण संख्या घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 13:17 IST

Bihar Legislative Council elections: बिहारमधील विधान परिषदेच्या निवडणुकीत एनडीएची सरशी झाली आहे. एकूण २४ जागांपैकी २२ जागांचे निकाल हाती आले असून, एनडीएला १३ जागा मिळाल्या आहेत. यात जदयूला ५ व भाजपला ८ जागा मिळाल्या आहेत.

-एस. पी. सिन्हापाटणा : बिहारमधील विधान परिषदेच्या निवडणुकीत एनडीएची सरशी झाली आहे. एकूण २४ जागांपैकी २२ जागांचे निकाल हाती आले असून, एनडीएला १३ जागा मिळाल्या आहेत. यात जदयूला ५ व भाजपला ८ जागा मिळाल्या आहेत. राजदला ५ व अपक्षांनी तीन जागी बाजी मारली आहे. काँग्रेसने एका जागी विजय प्राप्त केला आहे. या निकालाने जदयू, भाजप प्रदेशाध्यक्षांसह अनेक बड्या बड्यांना धक्का दिला.

मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा पक्ष जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह हे आपल्या संसदीय मतदारसंघातून उमेदवाराला निवडून आणण्यात अपयशी ठरले. त्याचप्रमाणे भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय जायसवाल हेही आपल्या संसदीय मतदारसंघातून दोन्ही जागा निवडून आणण्यात अपयशी ठरले. याचबरोबर बिहार विधान परिषदेत राजदला विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक असलेले संख्याबळ मिळाले आहे. याचाच अर्थ राबडीदेवी यांचे विरोधी पक्षनेतेपद वाचले आहे, असा काढला जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेतून झालेल्या निवडणुकीत पाटणा जागेवर कार्तिक सिंह (१८८६ मते) यांनी अपक्ष कर्णवीर सिंह यादू ऊर्फ लल्लू     मुखिया (१७०६) यांच्यावर मातकेली. जदयू उमेदवार वाल्मिकी सिंह (१३८८) तिसऱ्या स्थानावर राहिले. कटिहारमध्ये अशोक अग्रवाल (१७३८) यांनी दुसऱ्या फेरीत विजय मिळविला. राजदचे कुंदन यादव (९४२) व काँग्रेसचे सुनील यादव (८०१) यांचा त्यांनी पराभव केला.छपरामध्ये भाजपचा पराभव झाला. भाजपचे बंडखोर उमेदवार सच्चिदानंद राय यांनी पुन्हा विजय मिळविला.

कोणी, किती लढविल्या- एनडीएमध्ये भाजपने १२ व जदयूने ११ उमेदवार तसेच रालोजपाने एका जागेवर उमेदवार मैदानात उतरविले होते. राजद २३ व सीपीआयने एक जागा लढली होती.- यावेळी महागठबंधनपासून वेगळे होऊन काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढविली होती. काँग्रेसने आठ जागी, मुकेश सहनी यांच्या विकासशील इन्सान पार्टीने (व्हीआयपी) सात तर चिराग पासवान यांच्या पक्षाने सहा जागांवर निवडणूक लढविली होती.- या निवडणुकीपूर्वी भाजपकडे सर्वाधिक १३ जागा होत्या. २०१६मध्ये भाजपने ११ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर दोन आमदार भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांची संख्या वाढून १३ झाली होती.- यावेळी भाजपने केवळ १२ जागा लढविल्या होत्या. पक्षाने आपल्या कोट्यातील मधुबनीची जागा जदयूला दिली होती. मागील वेळी जदयूकडे पाच जागा होत्या. परंतु नंतर राजदचे तीन आमदार जदयूमध्ये गेल्याने आमदारांची संख्या आठ झाली होती.

 

टॅग्स :BJPभाजपाBiharबिहारPoliticsराजकारण