शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

Bihar Elections: बिहारमधील विधान परिषद निवडणुकीत भाजपा, जेडीयूला धक्का, सर्वाधिक जागा जिंकल्या, पण संख्या घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 13:17 IST

Bihar Legislative Council elections: बिहारमधील विधान परिषदेच्या निवडणुकीत एनडीएची सरशी झाली आहे. एकूण २४ जागांपैकी २२ जागांचे निकाल हाती आले असून, एनडीएला १३ जागा मिळाल्या आहेत. यात जदयूला ५ व भाजपला ८ जागा मिळाल्या आहेत.

-एस. पी. सिन्हापाटणा : बिहारमधील विधान परिषदेच्या निवडणुकीत एनडीएची सरशी झाली आहे. एकूण २४ जागांपैकी २२ जागांचे निकाल हाती आले असून, एनडीएला १३ जागा मिळाल्या आहेत. यात जदयूला ५ व भाजपला ८ जागा मिळाल्या आहेत. राजदला ५ व अपक्षांनी तीन जागी बाजी मारली आहे. काँग्रेसने एका जागी विजय प्राप्त केला आहे. या निकालाने जदयू, भाजप प्रदेशाध्यक्षांसह अनेक बड्या बड्यांना धक्का दिला.

मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा पक्ष जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह हे आपल्या संसदीय मतदारसंघातून उमेदवाराला निवडून आणण्यात अपयशी ठरले. त्याचप्रमाणे भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय जायसवाल हेही आपल्या संसदीय मतदारसंघातून दोन्ही जागा निवडून आणण्यात अपयशी ठरले. याचबरोबर बिहार विधान परिषदेत राजदला विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक असलेले संख्याबळ मिळाले आहे. याचाच अर्थ राबडीदेवी यांचे विरोधी पक्षनेतेपद वाचले आहे, असा काढला जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेतून झालेल्या निवडणुकीत पाटणा जागेवर कार्तिक सिंह (१८८६ मते) यांनी अपक्ष कर्णवीर सिंह यादू ऊर्फ लल्लू     मुखिया (१७०६) यांच्यावर मातकेली. जदयू उमेदवार वाल्मिकी सिंह (१३८८) तिसऱ्या स्थानावर राहिले. कटिहारमध्ये अशोक अग्रवाल (१७३८) यांनी दुसऱ्या फेरीत विजय मिळविला. राजदचे कुंदन यादव (९४२) व काँग्रेसचे सुनील यादव (८०१) यांचा त्यांनी पराभव केला.छपरामध्ये भाजपचा पराभव झाला. भाजपचे बंडखोर उमेदवार सच्चिदानंद राय यांनी पुन्हा विजय मिळविला.

कोणी, किती लढविल्या- एनडीएमध्ये भाजपने १२ व जदयूने ११ उमेदवार तसेच रालोजपाने एका जागेवर उमेदवार मैदानात उतरविले होते. राजद २३ व सीपीआयने एक जागा लढली होती.- यावेळी महागठबंधनपासून वेगळे होऊन काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढविली होती. काँग्रेसने आठ जागी, मुकेश सहनी यांच्या विकासशील इन्सान पार्टीने (व्हीआयपी) सात तर चिराग पासवान यांच्या पक्षाने सहा जागांवर निवडणूक लढविली होती.- या निवडणुकीपूर्वी भाजपकडे सर्वाधिक १३ जागा होत्या. २०१६मध्ये भाजपने ११ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर दोन आमदार भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांची संख्या वाढून १३ झाली होती.- यावेळी भाजपने केवळ १२ जागा लढविल्या होत्या. पक्षाने आपल्या कोट्यातील मधुबनीची जागा जदयूला दिली होती. मागील वेळी जदयूकडे पाच जागा होत्या. परंतु नंतर राजदचे तीन आमदार जदयूमध्ये गेल्याने आमदारांची संख्या आठ झाली होती.

 

टॅग्स :BJPभाजपाBiharबिहारPoliticsराजकारण