शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
3
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
4
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
5
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
6
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
7
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
8
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
9
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
10
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
11
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
13
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
14
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
15
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
17
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
18
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
19
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
20
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात

“तुम्ही महाराजा लागून गेलात का”; KCR यांचा NDA प्रवेशाचा मानस, पण PM मोदींचा ठाम नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 7:21 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तेलंगणमधील रॅलीत मोठा गौप्यस्फोट; NDA मधील प्रवेश नाकारण्याचे कारणही सांगितले.

PM Narendra Modi Telangana Visit: आगामी लोकसभा निवडणुकांच्या आधी देशातील काही राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. यात तेलंगण राज्याचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने जय्यत तयारी सुरू केली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणाला भेट दिली. निजामाबाद येथे एका रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी मोठा गौप्यस्फोट केला. के. चंद्रशेखर राव हे NDA मध्ये येण्यास इच्छूक होते. मात्र, मीच नको म्हटले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

मी केसीआर यांना एनडीएमध्ये प्रवेश नाकारला. केसीआर दिल्लीत आल्यानंतर मला भेटले होते. मला एनडीएचा भाग व्हायचे आहे, असे ते म्हणाले. मात्र, KTR यांना तुम्ही आशीर्वाद द्यावे, अशी त्यांचे म्हणणे होते. त्याचवेळी मी त्यांना म्हणालो की, तुम्ही राजा-महाराजा लागून गेलात का? सरकार कोणाचे असावे, याचा निर्णय जनता घेईल, असा मोठा गौप्यस्फोट पंतप्रधान मोदी यांनी या सभेवेळी केला. तेलंगणातील जनतेसाठी ८ हजार कोटी रुपयांच्या योजनांची घोषणा करण्यात आली असून, काही योजनांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते निजामाबाद येथे करण्यात आले. 

तेलंगणात विविध योजनांसाठी ८ हजार कोटी 

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, तेलंगणात NTPC च्या सुपर थर्मल पॉवर प्रकल्पाच्या पहिल्या ८०० मेगावॅटचे पहिले युनिट राष्ट्राला समर्पित केले जाईल. यामुळे तेलंगणला कमी किमतीत वीज मिळेल. राज्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. देशातील सर्वात पर्यावरणपूरक वीज केंद्रांपैकी हे एक असेल. मनोहराबाद आणि सिद्धीपेट यांना जोडणाऱ्या नवीन रेल्वे मार्गासह रेल्वे प्रकल्पांचे पंतप्रधान मोदी यांनी लोकार्पण केले.  याशिवाय धर्माबाद-मनोहराबाद आणि महबूबनगर-कुरनूल दरम्यान विद्युतीकरण प्रकल्प सुरू करण्यात आला.

रेल्वे मार्गांमुळे आर्थिक विकासाला चालना

७६ किमी लांबीच्या मनोहराबाद-सिद्दीपेट रेल्वे मार्गामुळे या प्रदेशाच्या विशेषतः मेडक आणि सिद्धीपेट जिल्ह्यांच्या सामाजिक तसेच आर्थिक विकासाला चालना मिळेल. धर्माबाद-मनोहराबाद आणि महबूबनगर-कुरनूल दरम्यानच्या विद्युतीकरण प्रकल्पामुळे रेल्वेच्या सरासरी वेगात सुधारणा होण्यास मदत होईल. भारतीय रेल्वेने पुढील काही महिन्यांत सर्व रेल्वे मार्गांचे १०० टक्के विद्युतीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या ९ वर्षात समस्यांचे निराकरण करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

दरम्यान, गेल्या ९ वर्षांपासून परवडणारी आरोग्यसेवा देण्यासाठी काम करत आहोत. देशभरात एम्स रुग्णालयांची संख्या वाढवली जात आहे. तेलंगणातही एम्सचे काम सुरू आहे. आज जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आयुष्मान भारत भारतात सुरू आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. 

 

टॅग्स :TelanganaतेलंगणाNarendra Modiनरेंद्र मोदीK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावBJPभाजपाBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समिती