शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करणार, मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 07:10 IST

केंद्र सरकारने बिहारला विशेष राज्याचा दर्जा दिला तर हे उद्दिष्ट आणखी कमी कालावधीत पूर्ण होईल, असेही नितीशकुमार यांनी म्हटले आहे.

- एस. पी. सिन्हा

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंगळवारी विधानसभेत राज्यातील आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या अंतर्गत त्यांनी विद्यमान आरक्षणाची मर्यादा ५० वरून ६५ करण्याची सूचना केली आहे. जातीय सर्वेक्षणानंतर मागास, अतिमागास, एससी, एसटी लोकसंख्येच्या आकडेवारीवरून आरक्षण वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे ५० टक्के आरक्षण ६५ टक्के करावे. आधीच उच्च जातींना १० टक्के आरक्षण आहे. या ६५ टक्क्यानंतर एकूण आरक्षण ७५ टक्के होईल.  याबाबत योग्य तो विचारविनिमय करून निर्णय घेऊ. विधानसभेच्या याच अधिवेशनात प्रस्ताव मांडण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

गरिबांना २ लाखांची आर्थिक मदतबिहारमध्ये ९४ लाखापेक्षा अधिक कुटुंबांचे मासिक उत्पन्न ६ हजार रुपयांपर्यंत आहे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी २ लाखांच्या मदतीचा प्रस्ताव आहे.राज्यात ६३,८५० कुटुंबांना राहण्यासाठी घरे नाहीत. अशा कुटुंबांना जमीन घेण्यासाठी १ लाख व बांधकामासाठी १.२० लाख रुपये देण्याचा विचार आहे. यावर एकूण २ लाख ५० हजार कोटी रुपयांचा खर्च येईल. पुढील पाच वर्षांत हे उद्दिष्ट साध्य करण्यात येईल. यासाठी प्रत्येक वर्षी ५० हजार कोटी रुपये खर्च येईल. केंद्र सरकारने बिहारला विशेष राज्याचा दर्जा दिला तर हे उद्दिष्ट आणखी कमी कालावधीत पूर्ण होईल, असेही नितीशकुमार यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारreservationआरक्षण