शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

गेमच्या नादात प्रियकराने गमावले पैसे! प्रेयसीने रचला अपहरणाचा कट; घरच्यांकडून १० लाख मागितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 15:15 IST

ऑनलाईन गेमच्या नादात प्रियकराने पैसे गमावल्यानंतर प्रेयसीने असा कट रचला की पोलिसांनाही धक्का बसला.

प्रेमाला सीमा नाही आणि प्रेमात कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही, असे बोलले जाते. ऑनलाईन गेमच्या नादात प्रियकराने पैसे गमावल्यानंतर प्रेयसीने असा कट रचला की पोलिसांनाही धक्का बसला. पैशांचे नुकसान भरून काढण्यासाठी संबंधित प्रेयसीने स्वतःच्या अपहरणाचा कट रचला. तिने अपहरणाचा कट रचून तिच्याच घरच्यांकडून १० लाख रूपये मागितले. बिहारच्या भागलपूर येथील या घटनेने सर्वांचे लक्ष वेधले.

भागलपूर येथील अशोक रजक या व्यक्तीने २० जानेवारी रोजी स्थानिक नवगचिया पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी तक्रारीत सांगितले की, त्यांची भाची नेहा कुमारी सकाळी १० वाजता कॉलेजला गेली पण संध्याकाळी ७ वाजेपर्यंत घरी परतली नाही. कॉलेज आणि कोचिंगमधूनही नेहाची माहिती मिळाली नाही. अचानक २१ जानेवारीला नेहाच्या मोबाईलवरून तिच्या मामाच्या नंबरवर फोन आला. त्यांनी नेहा त्यांच्या ताब्यात असल्याचे सांगितले. १० लाखांची खंडणी दिल्यानंतर तिची सुटका करू अशी धमकी देण्यात आली.

प्रेयसीने रचला अपहरणाचा कटअपहरणाच्या घटनेची माहिती मिळताच एसपी सुशांत कुमार सरोज यांनी तातडीने तक्रार नोंदवली आणि तपास सुरू केला. मोबाईल लोकेशन आणि कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या संभाव्य अड्ड्यावर छापे टाकले. मग अपहरणकर्त्यांनी मुलीला भागलपूरमध्ये लपवून ठेवल्याची माहिती पथकाला मिळाली. पोलिसांनी मुलीला भागलपूरमधील एका लॉजमधून ताब्यात घेतले. यासोबतच अपहरण करणाऱ्या तीन मुलांनाही अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले तीन तरुण नवगचिया येथील श्रीपूर येथील रहिवासी आहेत. आरोपींमध्ये आयुष कुमार, गौरव कुमार आणि तिसरा एक अल्पवयीन आहे.

कॉलेजमध्ये झाले प्रेम पोलिसांनी चौकशी केल्यानंतर नेहा कुमारीने सर्व प्रकरणाची माहिती दिली. तिने सांगितले की, ती कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून वर्गातील आशिष कुमार नावाच्या मुलाशी तिचे प्रेमसंबंध आहेत. तसेच आशिष कुमार आणि आशिषच्या अटक केलेल्या दोन्ही मित्रांनी सांगितले की, आशिष ऑनलाइन गेमिंगमध्ये खूप रमला होता. त्याने मोठी रक्कम गुंतवली पण त्याच्या हाती काहीच लागले नाही. 

दरम्यान, २० तारखेला कॉलेजला जाण्याच्या बहाण्याने नेहा प्रियकर आशिषसोबत भागलपूरला गेली. ती आशिषचा मित्र आयुषच्या मैत्रिणीच्या लॉजमध्ये लपली आणि तिथून तिने तिच्या मोबाईलवरून आजोबा अशोक रजक यांना फोन करून प्रियकर आशिषशी बोलायला लावले. नेहाला सोडवण्यासाठी आशिषने १० लाख रुपयांची खंडणी मागितली. मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी लॉजमधून नेहाला ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :BiharबिहारLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस