शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

खेळ नियतीचा! टोमॅटोला दोन रूपयाचा 'भाव', शेतकऱ्यांवर रस्त्यावर फेकून देण्याची वेळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 21:25 IST

काही दिवसांपूर्वी टोमॅटोने शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणलं होतं.

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी टोमॅटोनं शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणलं होतं. पण, आता त्याच टोमॅटोनं बळीराजाला रडवल्याचे दिसते. नियतीचा खेळ कसा असतो याचं हे उत्तम उदाहरण. अलीकडेच ज्या टोमॅटोनं शेतकऱ्याला आर्थिक ताकद दिली तेच पिक आज शेतकऱ्याला जड झालं आहे. आंध्र प्रदेशात टोमॅटोचं भाव इतके खाली आलं आहेत की, शेतकऱ्यांना ते फेकून द्यावं लागत आहेत. खरं तर राज्यातील घाऊक बाजारात टोमॅटोचं दर किलोमागे दोन ते तीन रुपयांपर्यंत खाली आले आहेत. 

दरम्यान, टोमॅटोला योग्य भाव मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. टोमॅटो बाजारात नेणे देखील शक्य होत नसल्याने शेतकरी टोमॅटो रस्त्यावर टाकून देत आहे. आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील पत्तीकोंडा या घाऊक बाजारात एक किलो टोमॅटोची किंमत फक्त ३ रुपये किंवा २ रुपये आहे. तर, १०० किलो टोमॅटोचा भाव केवळ २०० रुपये आहे.

टोमॅटोला दोन रूपयाचा 'भाव'टोमॅटोला भाव नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. बाजारात असलेला टोमॅटोचा साठा शेतकऱ्यांची पिळवणूक करतो आहे. कारण साठ्याच्या तुलनेत टोमॅटोला खरेदीदार नाहीत. किमान २० ते ३० रुपये किलो भाव मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. खते, कीटकनाशके अशा इतर खर्चाव्यतिरिक्त माल वाहतुकीसाठीही पैसे उरत नसल्याने बळीराजा टोमॅटोला बाजारच दाखवत नसल्याचे भीषण चित्र तयार झालं आहे. त्यामुळे काही शेतकरी टोमॅटो रस्त्यावर फेकत आहेत. ग्राहक व्यवहार विभागाच्या वेबसाइटवर टोमॅटोचा भाव २८.४ रुपये किलो आहे. दरम्यान, जुलै महिन्यात टोमॅटोचे दर गगनाला भिडले होते. देशात टोमॅटोचा भाव ४०० रुपये किलोवर पोहोचला होता पण आज चित्र काहीसे बदलल्याचे दिसते.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशFarmerशेतकरी