शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

आंध्र प्रदेशात भाऊ विरुद्ध बहीण सामना रंगणार, काँग्रेसने वायएस शर्मिलांकडे दिली मोठी जबाबदारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 17:26 IST

Congress News: काही दिवसांपूर्वीच शर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, काँग्रेसमध्ये आल्यानंतर वायएस शर्मिला यांच्याकडे काँग्रेसने आंध्र प्रदेशचं प्रदेशाध्यक्षपद सोपवलं आहे. त्यामुळे येत्या काळात आंध्र प्रदेशमध्ये भाऊ विरुद्ध बहीण असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे दिवंगत नेते आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वाय. एस. आर. रेड्डी यांच्या कुटुंबामध्ये राजकीय हेव्यादाव्यांमधून फूट पडली होती. त्यानंतर वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना त्यांचीच बहीण वायएस शर्मिला यांनी आव्हान दिले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच शर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, काँग्रेसमध्ये आल्यानंतर वायएस शर्मिला यांच्याकडे काँग्रेसने आंध्र प्रदेशचं प्रदेशाध्यक्षपद सोपवलं आहे. त्यामुळे येत्या काळात आंध्र प्रदेशमध्ये भाऊ विरुद्ध बहीण असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

या नियुक्तीबाबत काँग्रेसकडून एक ट्विट करण्यात आलं आहे. त्यात म्हटलंय की, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांन वायएस शर्मिला यांना तत्काळ प्रभावाने काँग्रेसच्या आंध्र प्रदेशमधील प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्त केलं आहे. आतापर्यंत आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद सांभाळत असलेले रुद्रराजूगिडूगू यांना काँग्रेसच्या कार्यकारिणी समिती (सीडब्ल्यूसी) मध्ये विशेष निमंत्रित सदस्य बनवण्यात आलं आहे.

पक्षामध्ये सहभागी झाल्यानंतर वायएस शर्मिला यांनी सांगितले की, राहुल गांधी हे पंतप्रधान व्हावेत, असं माझे वडील वायएस राजशेखर रेड्डी यांचं स्वप्न होतं. हे स्वप्न साकार करण्यासाठी मी त्या दिशेने काम करेन.

आंध्र प्रदेशमधील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या राजशेखर रेड्डी यांचा एका हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचे पुत्र जगनमोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्रिपद मिळावं यासाठी प्रयत्न केले होते. तसेच त्यांनी आंध्र प्रदेशमध्ये एक यात्राही काढली होती. मात्र काँग्रेसच्या हायकमांडशी मतभेद झााल्यानंतर जगनमोहन रेड्डी यांनी वायएसआर काँग्रेसची स्थापना केली होती. मात्र त्यांच्या कुटुंबात मतभेद झाल्यानंतर त्यांची बहीश शर्मिला यांनी विरोधात भूमिका घेतली होती.  

 

टॅग्स :congressकाँग्रेसAndhra Pradeshआंध्र प्रदेश