शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

महाभियोग : ... तर काँग्रेस घेणार सर्वोच्च न्यायालयात धाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2018 21:08 IST

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात दिलेली महाभियोगाची नोटीस राज्यसभेच्या सभापतींनी फेटाळल्यास त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी काँग्रेसने केली आहे.

नवी दिल्ली -  सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात दिलेली महाभियोगाची नोटीस राज्यसभेच्या सभापतींनी फेटाळल्यास त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी तसे संकेत दिले आहेत. यासंदर्भात काँग्रेसचे एक नेते म्हणाले, राज्यसभेच्या सभापतींच्या निर्णयाला आव्हान दिले जाऊ शकते. तसेच त्याची कायदेशीर समीक्षा होऊ शकते. सरन्यायाधीशांवर यासाठी नैतिक दबाव बनवण्यात येत आहे. जेणेकरून महाभियोग प्रस्ताव सादर केल्यानंतर ते आपल्या कायदेशीर उत्तरदायित्वापासून बाजूला होतील, असे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले. याआधीसुद्धा महाभियोगाचा सामना करणारे न्यायधीश आपल्या कायदेशीर कामकाजापासून दूर झाले होते. त्यामुळे सध्याच्या सरन्यायाधीशांनीही असेच केले पाहिजे, असेही काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटले आहे. दरम्यान, महाभियोगाच्या प्रस्तावावर लवकरात लवकर निर्णय होईल, अशी अपेक्षा काँग्रेसला आहे.  सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना हटवण्यासाठी काँग्रेसने 71 खासदारांच्या स्वाक्ष-या असलेला प्रस्ताव राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्याकडे शुक्रवारी सोपवला होता. तसेच राज्यसभा सभापतींनी या प्रस्तावाला मान्यता द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली होती. आम्ही सरन्यायाधीश दीपक मिश्रांविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव आणला आहे. या प्रस्तावावर 71 खासदारांनी स्वाक्ष-या केल्या आहेत. त्यामुळे आता राज्यसभेच्या अध्यक्षांनी यावर निर्णय घ्यावा, असे काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यावेळी म्हणाले होते. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी पदाचा दुरुपयोग करत अनेक प्रकरणे हाताळली आहेत. त्यांच्यामुळे न्यायव्यवस्थेची स्वायत्तता धोक्यात आली आहे. त्यांच्यापासून देशाच्या न्यायव्यवस्थेला धोका आहे. त्यामुळेच आम्ही त्यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणला, अशी टीका काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केली होती. 

टॅग्स :Deepak Mishraदीपक मिश्राSupreme Courtसर्वोच्च न्यायालयcongressकाँग्रेस