शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

'PM केअर फंडासाठी चीनी कंपन्यांकडून घेतलेला निधी तात्काळ परत करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 13:12 IST

भारत सरकारने तात्काळ चीनी कंपन्यांकडून पीएम केअर फंडासाठी घेतलेला निधी परत करायला हवा.

नवी दिल्ली - भारताने सीमारेषेवरील तणावानंतर चीनसंदर्भात कठोर भूमिका घ्यायला हवी. त्यासाठी, सीमारेषेवरील कारवाईपूर्वीच चीनी कंपन्यांकडून पीएम केअर फंडासाठी घेण्यात आलेला निधी परत करण्यात यावं, असे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अरमिंदर सिंह यांनी म्हटलंय. कोविड 19 महामारीच्या संकटाविरुद्ध लढण्यासाठी पीएम केअर फंडाची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी विविध कंपन्यांकडून कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तर चीनी कंपन्यांनीही कोट्यवधींची मदत पीएम केअर फंडासाठी दिली आहे. 

भारत सरकारने तात्काळ चीनी कंपन्यांकडून पीएम केअर फंडासाठी घेतलेला निधी परत करायला हवा. कारण, कोरोनाविरुद्धची लढाई लढण्यास भारत सक्षम असून चीनच्या मदतीशिवायही भारत ही लढाई लढू शकतो, असे अरमिंदर सिंग यांनी म्हटलंय. कोरोना लॉकडाऊनमध्ये पीएम केअर फंडसाठी, हावेई कंपनीकडून 7 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. तर, टीकटॉक कंपनीकडून 30 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे, तर शिओमीने 10 कोटी रुपये दिले आहेत. तसेच, ओप्पोनेही 1 कोटी रुपयांची मदत केली असून हे योगदान 2013 पासून देण्यात येत आहे. मात्र, सीमारेषेवरील तणाव लक्षात घेऊन, भारत सरकारने सर्वप्रथम या कंपन्यांनाच मदतनिधी परत करायला हवा, असेही सिंग यांनी सूचवले आहे. 

दरम्यान, देशातील लडाखच्या भूसीमेवर डोळे वटारून पाहणाऱ्या चीनशी समर्थपणे दोन हात करत असतानाच केंद्र सरकारने 59 चायना अॅप बंदीचा निर्णय घेऊन सीमांचे बंधन नसलेल्या सायबर विश्वातही या कपटी शेजारी देशाविरुद्ध भारताने एक प्रकारे युद्धाचे बिगुल फुंकले आहे. बाजारात कोट्यवधींच्या संख्येने विकल्या जाणाऱ्या चिनी कंपन्यांच्या मोबाईल फोनमध्ये यापैकी बरीच लोकप्रिय अ‍ॅप इनबिल्ट पद्धतीने उपलब्ध असल्याने सरकारने या अ‍ॅप्सचा वापर करण्यासही बंदी घातली आहे.

भारताच्या बंदीनंतर टिकटॉकने निवेदन जारी केलं असून आम्ही चिनी सरकारला भारतीयांची माहिती दिलेली नाही असं यामध्ये म्हटलं आहे. टिकटॉकच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. टिकटॉक इंडियाचे प्रमुख निखिल गांधी यांनी  भारत सरकारने 59 अ‍ॅप्स ब्लॉक करण्यासंदर्भात आदेश जारी केला असून यामध्ये टिकटॉकचाही समावेश असल्याचं म्हटलं आहे. तसेच आम्ही या आदेशाचे पालन करत आहोत. आम्हाला याबाबत सरकारच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठकीचे निमंत्रण आले असून या बैठकीत आम्हाला आमची बाजू मांडण्याची व स्पष्टीकरण देण्याची संधी मिळणार असल्याचं सांगितलं. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारतPunjabपंजाबChief Ministerमुख्यमंत्रीprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी