शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

'PM केअर फंडासाठी चीनी कंपन्यांकडून घेतलेला निधी तात्काळ परत करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 13:12 IST

भारत सरकारने तात्काळ चीनी कंपन्यांकडून पीएम केअर फंडासाठी घेतलेला निधी परत करायला हवा.

नवी दिल्ली - भारताने सीमारेषेवरील तणावानंतर चीनसंदर्भात कठोर भूमिका घ्यायला हवी. त्यासाठी, सीमारेषेवरील कारवाईपूर्वीच चीनी कंपन्यांकडून पीएम केअर फंडासाठी घेण्यात आलेला निधी परत करण्यात यावं, असे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अरमिंदर सिंह यांनी म्हटलंय. कोविड 19 महामारीच्या संकटाविरुद्ध लढण्यासाठी पीएम केअर फंडाची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी विविध कंपन्यांकडून कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तर चीनी कंपन्यांनीही कोट्यवधींची मदत पीएम केअर फंडासाठी दिली आहे. 

भारत सरकारने तात्काळ चीनी कंपन्यांकडून पीएम केअर फंडासाठी घेतलेला निधी परत करायला हवा. कारण, कोरोनाविरुद्धची लढाई लढण्यास भारत सक्षम असून चीनच्या मदतीशिवायही भारत ही लढाई लढू शकतो, असे अरमिंदर सिंग यांनी म्हटलंय. कोरोना लॉकडाऊनमध्ये पीएम केअर फंडसाठी, हावेई कंपनीकडून 7 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. तर, टीकटॉक कंपनीकडून 30 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे, तर शिओमीने 10 कोटी रुपये दिले आहेत. तसेच, ओप्पोनेही 1 कोटी रुपयांची मदत केली असून हे योगदान 2013 पासून देण्यात येत आहे. मात्र, सीमारेषेवरील तणाव लक्षात घेऊन, भारत सरकारने सर्वप्रथम या कंपन्यांनाच मदतनिधी परत करायला हवा, असेही सिंग यांनी सूचवले आहे. 

दरम्यान, देशातील लडाखच्या भूसीमेवर डोळे वटारून पाहणाऱ्या चीनशी समर्थपणे दोन हात करत असतानाच केंद्र सरकारने 59 चायना अॅप बंदीचा निर्णय घेऊन सीमांचे बंधन नसलेल्या सायबर विश्वातही या कपटी शेजारी देशाविरुद्ध भारताने एक प्रकारे युद्धाचे बिगुल फुंकले आहे. बाजारात कोट्यवधींच्या संख्येने विकल्या जाणाऱ्या चिनी कंपन्यांच्या मोबाईल फोनमध्ये यापैकी बरीच लोकप्रिय अ‍ॅप इनबिल्ट पद्धतीने उपलब्ध असल्याने सरकारने या अ‍ॅप्सचा वापर करण्यासही बंदी घातली आहे.

भारताच्या बंदीनंतर टिकटॉकने निवेदन जारी केलं असून आम्ही चिनी सरकारला भारतीयांची माहिती दिलेली नाही असं यामध्ये म्हटलं आहे. टिकटॉकच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. टिकटॉक इंडियाचे प्रमुख निखिल गांधी यांनी  भारत सरकारने 59 अ‍ॅप्स ब्लॉक करण्यासंदर्भात आदेश जारी केला असून यामध्ये टिकटॉकचाही समावेश असल्याचं म्हटलं आहे. तसेच आम्ही या आदेशाचे पालन करत आहोत. आम्हाला याबाबत सरकारच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठकीचे निमंत्रण आले असून या बैठकीत आम्हाला आमची बाजू मांडण्याची व स्पष्टीकरण देण्याची संधी मिळणार असल्याचं सांगितलं. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारतPunjabपंजाबChief Ministerमुख्यमंत्रीprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी