शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 09:05 IST

गेल्या आठवड्यात 5 राज्यांमध्ये आलेल्या वादळामुळे 124 लोकांचा मृत्यू झाला होता

नवी दिल्ली: देशातील तेरा राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. देशातील अनेक भागांमध्ये आज वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो, असा इशारा हवामान खात्यानं दिलाय. याशिवाय काही भागांमध्ये गारपीटदेखील होऊ शकते, असा अंदाजदेखील हवामान खात्यानं वर्तवलाय. जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होऊ शकते, असं हवामान खात्यानं म्हटलंय. तर उत्तराखंड, पंजाबमधील काही ठिकाणी गडगडासह पाऊस होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात पाच राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. यामध्ये 124 जणांचा मृत्यू झाला होता. तर 300 जण जखमी झाले होते. हवामान खात्यानं दिलेल्या सूचनांचा उल्लेख करत गृह मंत्रालयातील एका अधिकाऱ्यानं याबद्दलची माहिती दिली. 'आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यांमधील काही ठिकाणी सोमवारी मुसळधार पाऊस होऊ शकतो. याशिवाय जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा, चंदीगढ, दिल्ली आणि उत्तर प्रदेशाच्या पश्चिम भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे,' अशी माहिती या अधिकाऱ्यानं दिली. राजस्थानच्या पश्चिम भागात धुळीची वादळं निर्माण होण्याची शक्यता आहे. याशिवाय ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याचाही अंदाज वर्तवण्यात आलाय. आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता असल्यानं हरयाणा सरकारनं शाळांना सुट्टी जाहीर केलीय. त्यामुळे हरयाणातील 350 खासगी शाळा आणि 575 सरकारी शाळा दोन दिवस बंद राहतील. शिक्षणमंत्री प्रा. रामविलास शर्मा यांनी याबद्दलची माहिती दिलीय.  

टॅग्स :IndiaभारतRainपाऊस