शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

CoronaVirus News: ...तर आणि तरच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचाव शक्य; IMAच्या अध्यक्षांचा मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 15:45 IST

CoronaVirus News: अन्यथा आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचू शकणार नाही; IMAच्या अध्यक्षांकडून धोक्याचा इशारा

नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात दररोज कोरोनाचे ४ लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. आता हाच आकडा ३ लाखांच्या खाली आला आहे. मात्र तरीही तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसऱ्या लाटेमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करण्याची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जी. ए. जयालाल यांनी मोलाचा सल्ला दिला आहे.अतूट प्रेम! पत्नीच्या मृत्यूनंतर तासाभरातच पतीनेही सोडला जीव; एकाच चितेवर दिला दोघांना मुखाग्नीगेल्या २४ तासांत देशात ४ हजार ५२९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. देशात पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. त्यातच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोकादेखील कायम आहे. 'या परिस्थितीतून बाहेर पडण्याच एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे लसीकरण,' असं मत जयालाल यांनी व्यक्त केलं. आपण मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचं लसीकरण करायला हवं. तसं न केल्यास तिसऱ्या लाटेपासून आपला बचाव होऊ होणार नाही, असा धोक्याचा इशारा त्यांनी दिला.चिंताजनक! भारतातील तब्बल ९८ टक्के लोकसंख्या अद्यापही कोरोनाच्या धोक्याच्या छायेत, आतापर्यंत केवळ २ टक्के लोकांनाच संसर्गमोठ्या समूहांचं लसीकरण वेगानं करायला हवं. त्यासाठी केंद्र सरकारनं अधिकाधिक लसी खरेदी करायला हव्यात. सरकारनं घरोघरी जाऊन लसीकरण करण्याची सुविधा सुरू करायला हवी. देशात आतापर्यंत १८ कोटी लोकांचं लसीकरण झालं आहे. हा आकडा वेगानं वाढायला हवा, असं डॉ. जयालाल म्हणाले. देशात कोरोनामुळे आतापर्यंत २ लाख ८३ हजार २५८ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २ कोटी ५४ लाख ९६ हजार ३३० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्याच्या घडीला देशात ३२ लाख २६ हजार ७१९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या