शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 16:49 IST

या कार्यक्रमामुळे राजस्थानच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल. पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे दिया कुमारी म्हणाल्या.

जयपूर : अनेक पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणजे राजस्थान. या राज्याची वेगळी अशी ओळख आहे. येथील इतिहास, हवेली, राजवाडे, किल्ले, खाद्यसंस्कृती आणि वाळवंट इत्यादी अनेक गोष्टी पर्यटकांना भुरळ घालतात. दरम्यान, येथील सरकारकडून पर्यटनाला चालणा देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. अशातच राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी आणि पर्यटन, कला आणि संस्कृती तसेच पुरातत्व विभागाचे सरकारी सचिव रवी जैन यांच्या उपस्थितीत रविवारी (दि.२४) अल्बर्ट हॉलमध्ये आयफा उपाध्यक्ष सुरेश अय्यर आणि राजस्थान सरकारचे पर्यटन आयुक्त विजय पाल सिंह यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. 

या सामंजस्य करारांतर्गत ७ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत जयपूर येथे "IIFA25 सेलिब्रेशन" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यटनाला चालना देण्याच्या दूरदृष्टीनुसार राज्यात पर्यटन क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जयपूर येथे ७ ते ९ मार्च या कालावधीत "IIFA25 सेलिब्रेशन" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, असे उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांनी सांगितले. 

आयफा पुरस्कारामुळे राजस्थानमधील पर्यटनाला नक्कीच चालना मिळेल. या कार्यक्रमादरम्यान जयपूरमध्ये सुप्रसिद्ध बॉलीवूड स्टार आणि इतर चित्रपट क्षेत्रातील मान्यवर हे आमचे पाहुणे असतील. राजस्थान आणि जयपूरमध्ये सिने जगताशी संबंधित या सेलिब्रिटींचे स्वागत आम्ही करणार आहोत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राजस्थानच्या अनोख्या संस्कृतीला आणि पर्यटनाला जागतिक पटलावर आणखी बळ मिळणार आहे, असे दिया कुमारी म्हणाल्या.

आयफा पुरस्कार रौप्य महोत्सव वर्षानिमित्त जयपूरमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची २५ गौरवशाली वर्षे साजरी करण्याचा सोहळा ऐतिहासिकरित्या आयोजित केला जाईल. आयफा पुरस्कार आणि उपक्रम तीन दिवस विविध विभागांमध्ये आयोजित केले जातील. या कार्यक्रमामुळे राजस्थानच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल. पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे दिया कुमारी म्हणाल्या. तसेच, याचा फायदा पर्यटनाशी संबंधित सर्व क्षेत्रांना होणार असल्याचेही दिया कुमारी यांनी सांगितले.

डेस्टिनेशन मार्केटिंगच्या संधी उपलब्ध होतील - रवी जैनजयपूरमध्ये ७ ते ९ मार्च २०२५ दरम्यान होणाऱ्या "IIFA25 सेलिब्रेशन्स" या तीन दिवसीय कार्यक्रमात अनेक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. यामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील मेगा अचिव्हर्स आणि यशस्वी लोकांना सन्मानित केले जाईल. या पुरस्कारांमुळे राज्यासाठी जागतिक ब्रँडिंग आणि डेस्टिनेशन मार्केटिंगच्या संधी उपलब्ध होतील. पर्यटन विभाग, राजस्थान सरकार आणि आयफा व्यवस्थापन यांच्यातील अनेक चर्चेनंतर जयपूरमध्ये "IIFA25 सेलिब्रेशन्स" आयोजित करण्याची योजना आखण्यात आली आहे, असे सरकारी सचिव रवी जैन यांनी सांगितले.

२०२५ मध्ये ही संधी जयपूरला मिळाली - सुरेश अय्यरमार्च २०२५ मध्ये जयपूरमध्ये या युनिक सिग्नेचर कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. आम्ही भारतीय चित्रपट उत्सव साजरा करू. आयफाची स्थापना २००० मध्ये झाली होती. आयफा दरवर्षी १४ वेगवेगळ्या देशांमध्ये आणि १८ वेगवेगळ्या भौगोलिक शहरांमध्ये आयोजित केला जातो. यावेळी जयपूर येथे होणारा कार्यक्रम आणि पुरस्कार वितरण समारंभ मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. हा कार्यक्रम जागतिक स्तरावर पोहोचेल आणि राजस्थान राज्यासाठी पर्यटन, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रात संधी निर्माण करणारा ठरणार आहे. तसेच, २०२० मध्ये भारतात आयफा कार्यक्रमाचे आयोजन मुंबईत करण्यात आले होते आणि आता २०२५ मध्ये ही संधी जयपूरला मिळाली आहे, असे आयफाचे उपाध्यक्ष सुरेश अय्यर यांनी सांगितले.

आयफा सोहळ्याचे उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रणदरम्यान, २७ ते २९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत अबुधाबी येथील यास द्वीपवर आयोजित करण्यात आलेल्या आयफा पुरस्कार २०२४ साठी आयफा उपाध्यक्ष सुरेश अय्यर यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांना आमंत्रित केले आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानtourismपर्यटन