शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

चीनची गुर्मी उतरवायची असेल तर ताकद दाखवा - सेंटर फॉर जाँईट वॉरफेअर स्टडीज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 4:40 PM

सिक्कीमच्या डोकलाम भागात भारत आणि चीनमध्ये 73 दिवसांपासून सुरु असलेला संघर्ष मागच्या महिन्यात संपुष्टात आला.

ठळक मुद्देभारत आणि चीनने सैन्य मागे घेतल्यामुळे दोन्ही देशातील संबंध आता पूर्ववत होत आहेत. वादग्रस्त सीमा आणि नियंत्रण रेषेवर शांतता रहावी यासाठी भारताने आपल्या लष्करी शक्तीचे प्रदर्शन केले पाहिजे.

नवी दिल्ली, दि. 12 - सिक्कीमच्या डोकलाम भागात भारत आणि चीनमध्ये 73 दिवसांपासून सुरु असलेला संघर्ष मागच्या महिन्यात संपुष्टात आला. दोन्ही देशांचे सैन्य परस्परापरस्परांसमोर उभे ठाकले होते. भारत आणि चीनने सैन्य मागे घेतल्यामुळे दोन्ही देशातील संबंध आता पूर्ववत होत आहेत. पण भविष्यात पुन्हा असा संघर्ष उदभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भारताला रणनितीक मार्गदर्शन करणा-या सेंटर फॉर जाँईट वॉरफेअर स्टडीजने भारताला लष्करी क्षमता वाढवण्याचा सल्ला दिला आहे.

दशकभरापूर्वी संरक्षण मंत्रालयाने सीईएनजेओडब्ल्यूएसची स्थापना केली. वादग्रस्त सीमा आणि नियंत्रण रेषेवर शांतता रहावी यासाठी भारताने आपल्या लष्करी शक्तीचे प्रदर्शन केले पाहिजे. कारण चीन ताकतीचा आदर करतो असे सेंटर फॉर जाँईट वॉरफेअर स्टडीजने म्हटले आहे. भारत, चीन आणि भूतान या तीन देशांची सीमा जिथे मिळते त्या ट्राय जंक्शनवर चीनने रस्ता बांधणी सुरु करुन परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केल्यामुळे डोकलामचा संघर्ष उदभवला. खरतर डोकलाम भूतानच्या हद्दीत येते. पण चीनला परस्पर 'जैसे थे' परिस्थिती बदलण्याचा अधिकार नाही. कारण चीनच्या रस्ता बांधणीमुळे भारताच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होणार होता. यापूर्वी 2014 मध्ये चुमार आणि 2013 साली डेपसांगमध्ये दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर आले होते. सीईएनजेओडब्ल्यूएसने आपल्या अहवालात भारत-चीनसीमेवरील इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीचे कामही वेगाने करण्याची शिफारस केली आहे.

मध्यंतरी लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी भारताने एकाचवेळी चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा सामना करण्यासाठी सज्ज असले पाहिजे असे वक्तव्य केले होते. रावत यांचे हे विधान चीनच्या चांगलेच जिव्हारी लागले होते. भारताला एकाचवेळी चीन आणि पाकिस्तानबरोबर युद्ध परवडणार नसल्याचे ग्लोबल टाइम्सच्या लेखात म्हटले होते. जनरलनी नीट माहिती घेतली पाहिजे. एकाचवेळी चीन आणि पाकिस्तानबरोबर युद्ध सुरु झाले तर, भारत परिणाम सहन करु शकेल का ? असे लेखात म्हटले होते. आम्ही पहिल्यांदा परिस्थिती चिघळेल अशी कृती करणार नाही आणि भारतालाही करु देणार नाही असे ग्लोबल टाइम्सच्या लेखात म्हटले होते.

टॅग्स :Doklamडोकलाम