शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

संसदेतून बाहेर फेकलं तरी चालेल पण आता माघार नाहीच - राहुल गांधी

By admin | Published: August 04, 2015 11:46 AM

सत्ताधा-यांनी आम्हाला संसेदतून बाहेर फेकले तरी चालेल पण आम्ही माघार नाही असे सांगत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ४ - भूसंपादन व भ्रष्टाचारावरुन आम्ही सत्ताधा-यांविरोधात उभे राहिलो, सत्ताधा-यांनी आम्हाला संसेदतून बाहेर फेकले तरी चालेल पण आम्ही माघार घेणार नाही असे सांगत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मन की बात करणा-या पंतप्रधानांनी एकदा देशवासीयांच्या मन की बात ऐकावी असेही त्यांनी म्हटले आहे.

सोमवारी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काँग्रेसच्या २५ गोंधळी खासदारांना निलंबित केले होते. याविरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून मंगळवारी काँग्रेसने संसद परिसरात धरणे आंदोलन केले. सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी आदी दिग्गज नेते या आंदोलनात उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष या पक्षांचे खासदारही आंदोलनात सहभागी झाले होते. केंद्र सरकारवर टीका करताना सोनिया गांधी म्हणाल्या, संसद चालवणे ही सरकारची जबाबदारी आहे, खासदारांना निलंबित करत सरकारने लोकशाहीची हत्या केली. तर राहुल गांधी यांनी आक्रमक शैलीत मोदी सरकारवर निशाणा साधला. 

काँग्रेस खासदारांसोबत जे झाले ते फक्त एक उदाहरण आहे, देशातील विद्यार्थी, शेतकरी वर्ग इतकेच नव्हे तर इंटरनेटवरही मुस्कटदाबी केली जात आहे असा आरोप राहुल गांधींनी केला. ललित मोदी प्रकरणात सुषमा स्वराज यांनी कायद्याचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे, वसुंधरा राजे व ललित मोदींचे आर्थिक हितसंबंधही उघड झालेत. व्यापम घोटाळ्याने मध्य प्रदेशमधील लाखो तरुणांचे भविष्य उद्धवस्त केले असे राहुल गांधींनी सांगितले. तिन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहोत असे त्यांनी सांगितले. काँग्रेसला किंवा मला राजीनामा नको आहे, आता देशातील जनतेलाच राजीनामा हवा आहे असेही त्यांनी नमूद केले.