शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

हिंमत असेल तर CAA बाबत संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली सार्वमत घ्या, ममतांचे मोदींना आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 7:27 PM

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे.

कोलकाता - केंद्र सरकारने केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशभरात आगडोंब उसळला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची एकजूट होत आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून मोदींवर जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशात संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षणाखाली सार्वमत घ्यावे असे आव्हान त्यांनी दिले आहे.   गुरुवारी एका प्राचरसभेला संबोधित करताना  ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ''केंद्र सरकारने संयुक्त राष्ट्र आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यासारख्या कुठल्याही निष्पक्षपाती संघटनेच्या देखरेखीखाली सार्वमत घ्यावे आणि किती नागरिक नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या बाजूने आहेत आणि किती नागरिक विरोधात आहेत हे विचारावे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७३ वर्षांनी आम्हाला अचानकपणे आम्ही भारतीय नागरिक आहोत हे सिद्ध करावे लागणार आहे. तुम्ही तुमचा विरोध मवाळ करू नका कारण आपल्याला नागरिकत्वविरोधा कायदा रद्द करायचा आहे.'' 

कोलकातामधील धर्मतला येथे एका आंदोलनात सहभागी झालेल्या ममता बॅनर्जी यांनी मंचावर आंदोलकांसोबत आंदोलनात सहभागी होत नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीला विरोध केला. ''सध्या भाजपा खास प्रकारच्या टोप्या खरेदी करत आहे. या टोप्या परिधान करून ते हिंसाचार माजवण्यास सांगणार आहे जेणेकरून एक समुदाय बदनाम व्हावा हा त्यांचा हेतू आहे. त्यांना यशस्वी होऊ देऊ नका.''असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.  

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदी