शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

हिम्मत असेल तर काँग्रेसने विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवावी - नरेंद्र मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 18:47 IST

काँग्रेसने गुजरातचे नुकसान करण्याची एकही संधी सोडली नाही. गांधी कुटुंब आणि काँग्रेसला गुजरात काटयासारखा खुपतो.

अहमदाबाद - काँग्रेसने गुजरातचे नुकसान करण्याची एकही संधी सोडली नाही. गांधी कुटुंब आणि काँग्रेसला गुजरात काटयासारखा खुपतो. देशाची सेवा करणा-या ख-या नायकांचा काँग्रेसने अपमान केलायं. काँग्रेसने देशसेवेवर कधीही लक्ष दिले नाही अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केली. ते गुजरात गौरव यात्रेमध्ये बोलत होते. जातीयवाद आणि लोकांची दिशाभूल करणे हे काँग्रेसचे निवडणुकीतील मुख्य शस्त्र आहे. 

मी फक्त एका राज्याचा मुख्यमंत्री होतो तेव्हा तुमच्याकडे संपूर्ण हिंदुस्थानची सत्ता होती. त्यावेळी काँग्रेसने भरपूर षडयंत्र रचली असा आरोप मोदींनी केला. काँग्रेसला काही जमले नाही तेव्हा त्यांनी विकासला शिव्या घालायला सुरुवात केली. काँग्रेस पक्षाच्या मनात विकासाबद्दल राग आहे असे मोदी म्हणाले. सरदार पटेलांची मुलगी, मोरारजी देसाईंबरोबर काँग्रेसने काय केले ते इतिहासाला माहित आहे. 

मोरारजी देसाई पंतप्रधान असताना काँग्रेसला त्यांना संपवायचे होते. काँग्रेसला गुजरात आवडत नाही अशी टीका मोदी यांनी केला. निवडणूक आमच्यासाठी विकासवादाची तर, काँग्रेससाठी वंशवादाची लढाई आहे. मला विश्वास आहे या लढाईत विकासवाद जिंकेल असे मोदी म्हणाले.  जीएसटीच्या मुद्यावरुन बचाव करताना त्यांनी जीएसटी लागू करण्याचा निर्णय एकटया मोदीचा नव्हता असे सांगितले. जीएसटी लागू  करण्याआधी 30 पक्षांबरोबर चर्चा केली त्यांचा सुद्धा सहभाग होता. जीएसटीच्या निर्णयात काँग्रेसही समान भागीदार आहे. त्यांनी जीएसटीवरुन खोटया बातम्या पसरवू नये असे मोदी म्हणाले. 

- काँग्रेसने देशाला अनेक नेते दिले पण सध्या त्यांचे सर्व लक्ष खोटे बोलण्यावर असते. - काँग्रेसची स्थिती इतकी चांगली होती मग निवडणुकीआधी त्यांचे 25 टक्के आमदार का सोडून गेले ?. - काँग्रेसने लोकांना भ्रमित करु नये, विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढा. - सरदार पटेलासोबत काँग्रेसने काय केले ते इतिहासाला माहित आहे.- जीएसटी संबंधी सर्व पक्षांनी मिळून निर्णय घेतला. एकटया काँग्रेसला टीका करण्याचा अधिकार नाही. - गुजरातच्या विकासासंबंधी काँग्रेसचा दृष्टीकोन नेहमीच नकारात्मक राहिला आहे, त्यांनी सरदार सरोवर प्रकल्पही पूर्ण केला नाही. - वंशवाद हरणार, विकासवाद जिंकणार. - एका बाजूला घराणेशाहीवर चालणारे पक्ष आहेत आणि दुस-या बाजूला विचारधारेवर चालणारा पक्ष आहे.- देशसेवेसाठी भाजपा पूर्णपणे कटिबद्ध आहे, उत्तर प्रदेशच्या विजयासाठी अमित शहांना सामनावीराचा पुरस्कार जातो.- काँग्रेसने लोकांना भ्रमित करु नये, विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढा.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरात