शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

हिम्मत असेल तर काँग्रेसने विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवावी - नरेंद्र मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 18:47 IST

काँग्रेसने गुजरातचे नुकसान करण्याची एकही संधी सोडली नाही. गांधी कुटुंब आणि काँग्रेसला गुजरात काटयासारखा खुपतो.

अहमदाबाद - काँग्रेसने गुजरातचे नुकसान करण्याची एकही संधी सोडली नाही. गांधी कुटुंब आणि काँग्रेसला गुजरात काटयासारखा खुपतो. देशाची सेवा करणा-या ख-या नायकांचा काँग्रेसने अपमान केलायं. काँग्रेसने देशसेवेवर कधीही लक्ष दिले नाही अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केली. ते गुजरात गौरव यात्रेमध्ये बोलत होते. जातीयवाद आणि लोकांची दिशाभूल करणे हे काँग्रेसचे निवडणुकीतील मुख्य शस्त्र आहे. 

मी फक्त एका राज्याचा मुख्यमंत्री होतो तेव्हा तुमच्याकडे संपूर्ण हिंदुस्थानची सत्ता होती. त्यावेळी काँग्रेसने भरपूर षडयंत्र रचली असा आरोप मोदींनी केला. काँग्रेसला काही जमले नाही तेव्हा त्यांनी विकासला शिव्या घालायला सुरुवात केली. काँग्रेस पक्षाच्या मनात विकासाबद्दल राग आहे असे मोदी म्हणाले. सरदार पटेलांची मुलगी, मोरारजी देसाईंबरोबर काँग्रेसने काय केले ते इतिहासाला माहित आहे. 

मोरारजी देसाई पंतप्रधान असताना काँग्रेसला त्यांना संपवायचे होते. काँग्रेसला गुजरात आवडत नाही अशी टीका मोदी यांनी केला. निवडणूक आमच्यासाठी विकासवादाची तर, काँग्रेससाठी वंशवादाची लढाई आहे. मला विश्वास आहे या लढाईत विकासवाद जिंकेल असे मोदी म्हणाले.  जीएसटीच्या मुद्यावरुन बचाव करताना त्यांनी जीएसटी लागू करण्याचा निर्णय एकटया मोदीचा नव्हता असे सांगितले. जीएसटी लागू  करण्याआधी 30 पक्षांबरोबर चर्चा केली त्यांचा सुद्धा सहभाग होता. जीएसटीच्या निर्णयात काँग्रेसही समान भागीदार आहे. त्यांनी जीएसटीवरुन खोटया बातम्या पसरवू नये असे मोदी म्हणाले. 

- काँग्रेसने देशाला अनेक नेते दिले पण सध्या त्यांचे सर्व लक्ष खोटे बोलण्यावर असते. - काँग्रेसची स्थिती इतकी चांगली होती मग निवडणुकीआधी त्यांचे 25 टक्के आमदार का सोडून गेले ?. - काँग्रेसने लोकांना भ्रमित करु नये, विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढा. - सरदार पटेलासोबत काँग्रेसने काय केले ते इतिहासाला माहित आहे.- जीएसटी संबंधी सर्व पक्षांनी मिळून निर्णय घेतला. एकटया काँग्रेसला टीका करण्याचा अधिकार नाही. - गुजरातच्या विकासासंबंधी काँग्रेसचा दृष्टीकोन नेहमीच नकारात्मक राहिला आहे, त्यांनी सरदार सरोवर प्रकल्पही पूर्ण केला नाही. - वंशवाद हरणार, विकासवाद जिंकणार. - एका बाजूला घराणेशाहीवर चालणारे पक्ष आहेत आणि दुस-या बाजूला विचारधारेवर चालणारा पक्ष आहे.- देशसेवेसाठी भाजपा पूर्णपणे कटिबद्ध आहे, उत्तर प्रदेशच्या विजयासाठी अमित शहांना सामनावीराचा पुरस्कार जातो.- काँग्रेसने लोकांना भ्रमित करु नये, विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढा.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरात