शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

हिम्मत असेल तर काँग्रेसने विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवावी - नरेंद्र मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 18:47 IST

काँग्रेसने गुजरातचे नुकसान करण्याची एकही संधी सोडली नाही. गांधी कुटुंब आणि काँग्रेसला गुजरात काटयासारखा खुपतो.

अहमदाबाद - काँग्रेसने गुजरातचे नुकसान करण्याची एकही संधी सोडली नाही. गांधी कुटुंब आणि काँग्रेसला गुजरात काटयासारखा खुपतो. देशाची सेवा करणा-या ख-या नायकांचा काँग्रेसने अपमान केलायं. काँग्रेसने देशसेवेवर कधीही लक्ष दिले नाही अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केली. ते गुजरात गौरव यात्रेमध्ये बोलत होते. जातीयवाद आणि लोकांची दिशाभूल करणे हे काँग्रेसचे निवडणुकीतील मुख्य शस्त्र आहे. 

मी फक्त एका राज्याचा मुख्यमंत्री होतो तेव्हा तुमच्याकडे संपूर्ण हिंदुस्थानची सत्ता होती. त्यावेळी काँग्रेसने भरपूर षडयंत्र रचली असा आरोप मोदींनी केला. काँग्रेसला काही जमले नाही तेव्हा त्यांनी विकासला शिव्या घालायला सुरुवात केली. काँग्रेस पक्षाच्या मनात विकासाबद्दल राग आहे असे मोदी म्हणाले. सरदार पटेलांची मुलगी, मोरारजी देसाईंबरोबर काँग्रेसने काय केले ते इतिहासाला माहित आहे. 

मोरारजी देसाई पंतप्रधान असताना काँग्रेसला त्यांना संपवायचे होते. काँग्रेसला गुजरात आवडत नाही अशी टीका मोदी यांनी केला. निवडणूक आमच्यासाठी विकासवादाची तर, काँग्रेससाठी वंशवादाची लढाई आहे. मला विश्वास आहे या लढाईत विकासवाद जिंकेल असे मोदी म्हणाले.  जीएसटीच्या मुद्यावरुन बचाव करताना त्यांनी जीएसटी लागू करण्याचा निर्णय एकटया मोदीचा नव्हता असे सांगितले. जीएसटी लागू  करण्याआधी 30 पक्षांबरोबर चर्चा केली त्यांचा सुद्धा सहभाग होता. जीएसटीच्या निर्णयात काँग्रेसही समान भागीदार आहे. त्यांनी जीएसटीवरुन खोटया बातम्या पसरवू नये असे मोदी म्हणाले. 

- काँग्रेसने देशाला अनेक नेते दिले पण सध्या त्यांचे सर्व लक्ष खोटे बोलण्यावर असते. - काँग्रेसची स्थिती इतकी चांगली होती मग निवडणुकीआधी त्यांचे 25 टक्के आमदार का सोडून गेले ?. - काँग्रेसने लोकांना भ्रमित करु नये, विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढा. - सरदार पटेलासोबत काँग्रेसने काय केले ते इतिहासाला माहित आहे.- जीएसटी संबंधी सर्व पक्षांनी मिळून निर्णय घेतला. एकटया काँग्रेसला टीका करण्याचा अधिकार नाही. - गुजरातच्या विकासासंबंधी काँग्रेसचा दृष्टीकोन नेहमीच नकारात्मक राहिला आहे, त्यांनी सरदार सरोवर प्रकल्पही पूर्ण केला नाही. - वंशवाद हरणार, विकासवाद जिंकणार. - एका बाजूला घराणेशाहीवर चालणारे पक्ष आहेत आणि दुस-या बाजूला विचारधारेवर चालणारा पक्ष आहे.- देशसेवेसाठी भाजपा पूर्णपणे कटिबद्ध आहे, उत्तर प्रदेशच्या विजयासाठी अमित शहांना सामनावीराचा पुरस्कार जातो.- काँग्रेसने लोकांना भ्रमित करु नये, विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढा.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरात