शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा नेते गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
2
"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
3
अमेरिकेच्या अरेरावीला सडेतोड उत्तर ! रशिया-चीन-इराणचा समुद्रात एकत्रित नौदल युद्धाभ्यास
4
"माझ्या नादाला लागाल तर..." ठाण्याच्या माजी महापौरांची आगरी समाजाविषयी कथित ऑडिओ क्लीप चर्चेत, षड्यंत्र असल्याचा आरोप
5
कर्ज फेडू शकत नसल्यानं पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक; सौदीला गजब ऑफर, अमेरिकेचेही टेन्शन वाढलं
6
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
7
दुचाकी वाचवायला गेला आणि तीन जणांचा जीव गेला, ट्रक अपघाताचा थरकाप उडणारा सीसीटीव्ही व्हिडीओ
8
समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
9
अंकिता भंडारी हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे, उत्तराखंड सरकारचा निर्णय  
10
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
11
विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांची कंटेनरला धडक: ठाण्यात विचित्र अपघातात चाैघे जखमी, १२ वाहनांचे नुकसान
12
‘गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा’, निलेश राणे यांची मागणी  
13
VIDEO: प्रभासच्या चाहत्यांचा थिएटरमध्ये धुडगूस; ‘द राजा साब’च्या स्क्रीनिंगदरम्यान आणल्या मगरी
14
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात 8 वेळा चर्चा', अमेरिकन मंत्र्याचा 'तो' दावा भारताने फेटाळला...
15
"Bombay is not Maharashtra City..."; भाजपा नेत्याच्या विधानानं नवा वाद; उद्धवसेनेने सुनावले
16
महिला सक्षमीकरणाचे नवे मॉडेल! सोमनाथ मंदिरामुळे शेकडो महिलांना मिळाली रोजगाराची सुवर्णसंधी
17
Gautami Kapoor : राम कपूरकडे नव्हतं काम, पत्नी गौतमीने सांभाळलं घर; सांगितला लग्नानंतरचा अत्यंत कठीण काळ
18
२८ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; १ फेब्रुवारीला बजेट; सामान्यांची 'अच्छे दिन'ची प्रतीक्षा संपणार?
19
उमेदवारांची माहिती अद्याप 'अंधारात', निवडणुकीतील ४६९ उमेदवारांची शपथपत्रे अपलोडच केली नाहीत!
20
"एक दिवस हिजाब घालणारी महिला पंतप्रधान बनेल, पण कदाचित मी जिवंत नसेन", सोलापुरात ओवैसींचा अजित पवारांवर हल्ला
Daily Top 2Weekly Top 5

'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 18:17 IST

जर तुम्ही (राहुल गांधी) परदेशात भारताचा अपमान कराल, तर समजून घ्या की तुम्हाला देशात जेवढ्या जागा मिळाल्या आहेत, तेवढ्या देखील पुन्हा मिळणार नाहीत. आम्ही त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करतो.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या कोलंबिया येथील वक्तव्यांनंतर, आता भारतीय जनात पक्षाचे खासदार रविशंकर प्रसाद यांनी त्यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. रविशंकर प्रसाद म्हणाले, त्यांनी विजयादशमीच्या शुभ प्रसंगी भारतातील जनतेला शुभेच्छा दिल्या असत्या तर बरे झाले असते, पण ते भारतावर हल्ला करत आहेत. ते देशातही असेच करतात आणि परदेशातही.

जर तुम्ही (राहुल गांधी) परदेशात भारताचा अपमान कराल, तर समजून घ्या की... -रविशंकर प्रसाद म्हणाले, "राहुल गांधी यांनी कोलंबियामध्ये असे वक्तव्य केले की, भारतात लोकशाही नाही, लोकांना बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. खरे तर, जर कुणी व्यक्ती देशाच्या विकासासंदर्भात, भाजपसंदर्भात आणि पंतप्रधान मोदींसंदर्भात सर्वाधिक स्वातंत्र्य घेऊन अपशब्द वापरत असेल, तर ती व्यक्ती म्हणजे राहुल गांधीच आहेत. त्यांना देशाविरुद्ध बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. ते भारतात आणि परदेशातही तथ्यहीन बोलतात. जर तुम्ही (राहुल गांधी) परदेशात भारताचा अपमान कराल, तर समजून घ्या की तुम्हाला देशात जेवढ्या जागा मिळाल्या आहेत, तेवढ्या देखील पुन्हा मिळणार नाहीत. आम्ही त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करतो.

काय म्हणाले राहुल गांधी? -भारताकडे जगाला देण्यासाठी खूप काही आहे. याबद्दल अत्यंत आशावादी आहे. भारतीय व्यवस्थेत काही त्रुटी आणि धोके आहेत, ज्या भारताने दूर केल्या पाहिजेत. सर्वांत मोठा धोका म्हणजे लोकशाहीवर सतत होणारा हल्ला. भारत हा त्याच्या सर्व देशवासींमध्ये संवादाचे केंद्र आहे. वेगवेगळ्या परंपरा, धर्म आणि विचारांना जागा आवश्यक आहे आणि ती जागा निर्माण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लोकशाही व्यवस्था. 

दुसरे म्हणजे देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होणारी विभागणी. येथे अंदाजे १६-१७ वेगवेगळ्या भाषा आणि धर्म आहेत. या विविध परंपरांना व्यक्त होऊ देणे हे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. चीन जे करतो ते आपण करू शकत नाही - लोकांना दडपून टाकणे आणि हुकूमशाही व्यवस्था चालवणे. आपली व्यवस्था ते सहन करणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP hits back at Rahul Gandhi for 'insulting' India abroad.

Web Summary : BJP criticizes Rahul Gandhi's remarks in Colombia, alleging he insulted India. Prasad asserts Gandhi freely criticizes within India and abroad, but lacks the right to defame the nation internationally, warning of electoral consequences.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीRavi Shankar Prasadरविशंकर प्रसादBJPभाजपाcongressकाँग्रेस