शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

"आमचं ऐकलं नाही तर विधानसभा निवडणुकीत पराभूत करू’’, या राज्यात सरपंचांनी वाढवलं भाजपा सरकारचं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 20:38 IST

Haryana BJP News: हरयाणातील नायाब सिंह सैनी सरकारसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. राज्यातील सरपंचांनी राज्य सरकारविरोधात आघाडी उघडली आहे.

या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्राबरोबरच हरयाणामध्येही विधानसभेची निवडणूक होणार आहे. महाराष्ट्राप्रमाणेच हरयाणामध्येही सत्ताधारी भाजपासमोर येथील सत्ता राखण्याचं आव्हान असणार आहे. या परिस्थितीत हरयाणातील नायाब सिंह सैनी सरकारसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. राज्यातील सरपंचांनी राज्य सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. राज्यामध्ये बांधण्यात आलेल्या अमृत समोरवरामध्ये १८०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप त्यांच्याकडून करण्यात आले आहेत. ग्रामपंचायतींनी अमृत सरोवरांची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. तसेच सरकारने सरपंचांचे सर्व अधिकार परत द्यावे, अन्यथा विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपाला विरोध केला जाईल, असा इशारा दिला आहे.  

लोकसभा निवडणुकीमध्ये सरकारला विरोध करणाऱ्या सरपंचांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. सरपंचांनी सरकारकडून गावांमध्ये बांधण्यात आलेल्या अमृत सरोवरांची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. तसेच सरपंचांचे सगळे अधिकार परत दिले नाहीत तर विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाला विरोध केला जाईल, असा इशाराही दिला आहे. 

याबाबत फतेहाबादमध्ये सरपंच असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष रणबीर गिल यांनी सांगितले की, सरकारने राज्यभरामध्ये १८०० कोटी रुपयांचा खर्च करून शेकडो अमृत सरोवर थेट ठेकेदारांकडून बांधून घेण्यात आली आहेत. या सरोवरांना योग्य पद्धतीने बांधण्यात आलेले नाही. तसेच त्यांचं खोदकामही योग्य पद्धतीने करण्यात आलेले नाही. आता सरकार ही सरोवरं ग्रामपंचायतींच्या ताब्यात देण्याची तयारी करत आहे. कारण ही सरोवरं पावसाचं पाणी साठून ओव्हर फ्लो होऊन ग्रामस्थांना त्रास होईल, याची सरकारला कल्पना आहे, असा आरोप त्यांनी केला. 

या कामात ठेकेदारांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे. तसेच आता त्याचं खापर सरपंचांच्या डोक्यावर फोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरपंच हे अजिबात खपवून घेणार नाहीत. तसेच सरकारने सरपंचांचे सारे मौलिक अधिकार परत दिले नाहीत, तर सरपंच पुन्हा एका विधानसभा निवडणुकीत भाजपाविरोधात बिगुल वाजवतील, अशा इशारा त्यांनी दिला.   

टॅग्स :HaryanaहरयाणाBJPभाजपाsarpanchसरपंच