शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

"आमचं ऐकलं नाही तर विधानसभा निवडणुकीत पराभूत करू’’, या राज्यात सरपंचांनी वाढवलं भाजपा सरकारचं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 20:38 IST

Haryana BJP News: हरयाणातील नायाब सिंह सैनी सरकारसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. राज्यातील सरपंचांनी राज्य सरकारविरोधात आघाडी उघडली आहे.

या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्राबरोबरच हरयाणामध्येही विधानसभेची निवडणूक होणार आहे. महाराष्ट्राप्रमाणेच हरयाणामध्येही सत्ताधारी भाजपासमोर येथील सत्ता राखण्याचं आव्हान असणार आहे. या परिस्थितीत हरयाणातील नायाब सिंह सैनी सरकारसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. राज्यातील सरपंचांनी राज्य सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. राज्यामध्ये बांधण्यात आलेल्या अमृत समोरवरामध्ये १८०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप त्यांच्याकडून करण्यात आले आहेत. ग्रामपंचायतींनी अमृत सरोवरांची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. तसेच सरकारने सरपंचांचे सर्व अधिकार परत द्यावे, अन्यथा विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपाला विरोध केला जाईल, असा इशारा दिला आहे.  

लोकसभा निवडणुकीमध्ये सरकारला विरोध करणाऱ्या सरपंचांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. सरपंचांनी सरकारकडून गावांमध्ये बांधण्यात आलेल्या अमृत सरोवरांची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. तसेच सरपंचांचे सगळे अधिकार परत दिले नाहीत तर विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाला विरोध केला जाईल, असा इशाराही दिला आहे. 

याबाबत फतेहाबादमध्ये सरपंच असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष रणबीर गिल यांनी सांगितले की, सरकारने राज्यभरामध्ये १८०० कोटी रुपयांचा खर्च करून शेकडो अमृत सरोवर थेट ठेकेदारांकडून बांधून घेण्यात आली आहेत. या सरोवरांना योग्य पद्धतीने बांधण्यात आलेले नाही. तसेच त्यांचं खोदकामही योग्य पद्धतीने करण्यात आलेले नाही. आता सरकार ही सरोवरं ग्रामपंचायतींच्या ताब्यात देण्याची तयारी करत आहे. कारण ही सरोवरं पावसाचं पाणी साठून ओव्हर फ्लो होऊन ग्रामस्थांना त्रास होईल, याची सरकारला कल्पना आहे, असा आरोप त्यांनी केला. 

या कामात ठेकेदारांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे. तसेच आता त्याचं खापर सरपंचांच्या डोक्यावर फोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरपंच हे अजिबात खपवून घेणार नाहीत. तसेच सरकारने सरपंचांचे सारे मौलिक अधिकार परत दिले नाहीत, तर सरपंच पुन्हा एका विधानसभा निवडणुकीत भाजपाविरोधात बिगुल वाजवतील, अशा इशारा त्यांनी दिला.   

टॅग्स :HaryanaहरयाणाBJPभाजपाsarpanchसरपंच