शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

आमचं पाणी रोखाल तर...-पाकिस्तानने दिला भारताला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 19:17 IST

रावी, सतलज आणि बियास नदीचे पाणी भारताने रोखल्यास तर सिंधू नदी करार मोडल्याने आम्ही भारताविरोधात इंटरनॅशनल कोर्ट फॉर आर्बिट्रेशनमध्ये जाऊ असं सांगितले

इस्लामाबाद - पुलवामा हल्ल्यानंतर भारतपाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला असून या हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानचेपाणी रोखणार असा इशारा दिला होता. मात्र भारताने आमचं पाणी रोखल्यास आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागू असा इशारा पाकिस्ताने भारताला दिला आहे. 

पाकिस्तानच्या जियो न्यूजशी संवाद साधताना पाकिस्ताचे अधिकारी म्हणाले की, भारत पाकिस्तानला येणाऱं पाणी रोखण्याबाबत आक्रमक होताना दिसत आहे. रावी, सतलज आणि बियास नदीचे पाणी भारताने रोखल्यास तर सिंधू नदी करार मोडल्याने आम्ही भारताविरोधात इंटरनॅशनल कोर्ट फॉर आर्बिट्रेशनमध्ये जाऊ असं सांगितले

काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी पाकिस्तानला जाणारं भारताच्या हिस्स्याचे पाणी रोखू असा इशारा दिला होता त्यावेळी पाकिस्तानकडून पाणी रोखलं तरी आम्हाला काही फरक पडणार नाही अशी भूमिका घेतली होती. जियो न्यूज बातमीनुसार पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाणी आणि ऊर्जा मंत्रालय पाकिस्तानचं पाणी भारताकडून रोकण्यात येणार असल्याबाबत चर्चा करत आहे. मात्र सिंधू करारानुसार भारताला असं करता येणार नाही. 1960 मध्ये सिंधू करार झाला होता. यामध्ये पश्चिमेकडे असणाऱ्या सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांचे पाणी पाकिस्तानच्या हद्दीत आहे तर पूर्वेकडील नद्या रावी, बियास आणि सतलज या नद्यांचे पाणी भारताच्या हद्दीत आहे. 

केंद्र सरकारच्यावतीने सिंधू जल कराराविषयी माहिती देताना नितीन गडकरी म्हणाले होते की, पाकिस्तानकडे वाहत जाणाऱ्या तीन नद्यांचे पाणी या नद्यांवर बांधण्यात येणाऱ्या धरणांमधून रोखण्यात येईल. त्यानंतर हे पाणी पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये वाहत येणाऱ्या नद्यांमध्ये प्रवाहित करण्यात येईल.

 

पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, पाकिस्तानची सार्वत्रिक कोंडी करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास भारताने तयारी सुरू केली होती. यामध्ये पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जाही काढून व्यापारीदृष्या पाकिस्तानला कोंडीत पकडलं तर दुसरीकडे सिंधू जल करारातून माघार घेण्याच्या दिशेने भारताने पावले उचलली होती.     

1960 चा सिंधू करार नेमका काय आहे ?

1960 मध्ये भारत - पाकिस्तानमध्ये सिंधू जलवाटप करार झाला. या करारनुसार पाकिस्तानसाठी भारतातून जाणाऱ्या सहा नद्यांच्या पाणीवाटपावर निर्णय घेतला गेला. सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज या नद्यांच्या पाणी वाटपाबाबत हा करार करण्यात आला. करारनुसार पूर्वेकडील नद्यांवर भारताचा पूर्ण अधिकार राहिल तर पश्चिमेकडील नद्यांचं पाणी हे पाकिस्तानला सोडावं लागेल. अर्थात रावी, बियास आणि सतलज या नद्यांचं पाणी भारत वीज निर्मितीसाठी वापरू शकतो. पण, शेतीसाठी वापरू शकत नाही. म्हणजेच काय तर भारताला रावी, बियास आणि सतलज या नद्यांचं पाणी वापरून पुन्हा नदीत सोडायचं आहे. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानWaterपाणीriverनदी