शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

आमचं पाणी रोखाल तर...-पाकिस्तानने दिला भारताला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 19:17 IST

रावी, सतलज आणि बियास नदीचे पाणी भारताने रोखल्यास तर सिंधू नदी करार मोडल्याने आम्ही भारताविरोधात इंटरनॅशनल कोर्ट फॉर आर्बिट्रेशनमध्ये जाऊ असं सांगितले

इस्लामाबाद - पुलवामा हल्ल्यानंतर भारतपाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला असून या हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानचेपाणी रोखणार असा इशारा दिला होता. मात्र भारताने आमचं पाणी रोखल्यास आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागू असा इशारा पाकिस्ताने भारताला दिला आहे. 

पाकिस्तानच्या जियो न्यूजशी संवाद साधताना पाकिस्ताचे अधिकारी म्हणाले की, भारत पाकिस्तानला येणाऱं पाणी रोखण्याबाबत आक्रमक होताना दिसत आहे. रावी, सतलज आणि बियास नदीचे पाणी भारताने रोखल्यास तर सिंधू नदी करार मोडल्याने आम्ही भारताविरोधात इंटरनॅशनल कोर्ट फॉर आर्बिट्रेशनमध्ये जाऊ असं सांगितले

काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी पाकिस्तानला जाणारं भारताच्या हिस्स्याचे पाणी रोखू असा इशारा दिला होता त्यावेळी पाकिस्तानकडून पाणी रोखलं तरी आम्हाला काही फरक पडणार नाही अशी भूमिका घेतली होती. जियो न्यूज बातमीनुसार पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाणी आणि ऊर्जा मंत्रालय पाकिस्तानचं पाणी भारताकडून रोकण्यात येणार असल्याबाबत चर्चा करत आहे. मात्र सिंधू करारानुसार भारताला असं करता येणार नाही. 1960 मध्ये सिंधू करार झाला होता. यामध्ये पश्चिमेकडे असणाऱ्या सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांचे पाणी पाकिस्तानच्या हद्दीत आहे तर पूर्वेकडील नद्या रावी, बियास आणि सतलज या नद्यांचे पाणी भारताच्या हद्दीत आहे. 

केंद्र सरकारच्यावतीने सिंधू जल कराराविषयी माहिती देताना नितीन गडकरी म्हणाले होते की, पाकिस्तानकडे वाहत जाणाऱ्या तीन नद्यांचे पाणी या नद्यांवर बांधण्यात येणाऱ्या धरणांमधून रोखण्यात येईल. त्यानंतर हे पाणी पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये वाहत येणाऱ्या नद्यांमध्ये प्रवाहित करण्यात येईल.

 

पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, पाकिस्तानची सार्वत्रिक कोंडी करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास भारताने तयारी सुरू केली होती. यामध्ये पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जाही काढून व्यापारीदृष्या पाकिस्तानला कोंडीत पकडलं तर दुसरीकडे सिंधू जल करारातून माघार घेण्याच्या दिशेने भारताने पावले उचलली होती.     

1960 चा सिंधू करार नेमका काय आहे ?

1960 मध्ये भारत - पाकिस्तानमध्ये सिंधू जलवाटप करार झाला. या करारनुसार पाकिस्तानसाठी भारतातून जाणाऱ्या सहा नद्यांच्या पाणीवाटपावर निर्णय घेतला गेला. सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज या नद्यांच्या पाणी वाटपाबाबत हा करार करण्यात आला. करारनुसार पूर्वेकडील नद्यांवर भारताचा पूर्ण अधिकार राहिल तर पश्चिमेकडील नद्यांचं पाणी हे पाकिस्तानला सोडावं लागेल. अर्थात रावी, बियास आणि सतलज या नद्यांचं पाणी भारत वीज निर्मितीसाठी वापरू शकतो. पण, शेतीसाठी वापरू शकत नाही. म्हणजेच काय तर भारताला रावी, बियास आणि सतलज या नद्यांचं पाणी वापरून पुन्हा नदीत सोडायचं आहे. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानWaterपाणीriverनदी