शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

गरीबांना वेतनानंतर राहुल गांधी यांनी महिलांना दिले मोठे आश्वासन, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 19:26 IST

2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कंबर कसली आहे. सत्तेत आल्यास गरिबांना दरमहा निश्चित वेतन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आता राहुल गांधी यांनी महिलांनाही मोठे आश्वासन दिले आहे.

ठळक मुद्दे2019 साली सत्तेत आल्यास अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले महिला आरक्षण विधेयक संसदेमध्ये पारित करून घेऊमहिलांच्या नेतृत्वाला राजकीय क्षेत्रात वरच्या पातळीवर आणण्याची आमची इच्छा लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यात यावे अशी महिला आरक्षण विधेयकात तरतूद

कोचिन -  2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कंबर कसली आहे. सत्तेत आल्यास गरिबांना दरमहा निश्चित वेतन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आता राहुल गांधी यांनी महिलांनाही मोठे आश्वासन दिले आहे. 2019 साली सत्तेत आल्यास अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले महिलाआरक्षण विधेयक संसदेमध्ये पारित करून घेऊ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.कोचिन येथे बुथ कार्यकर्त्यांशी चर्चा करताना राहुल गांधी यांनी सांगितले की, ''2019 मध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर सर्वप्रथम आम्ही संसदेत महिला आरक्षण विधेयक पारित करून घेऊ. महिलांच्या नेतृत्वाला राजकीय क्षेत्रात वरच्या पातळीवर आणण्याची आमची इच्छा आहे.'' एका कार्यकर्त्याने दिलेल्या सल्ल्यावर बोलताना राहुल गांधी यांनी ही घोषणा केली.

 महिला आरक्षण विधेयक गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यात यावे अशी या विधेयकात तरतूद आहे. मात्र राजकीय एकमत होऊ न शकल्याने हे विधेयक अद्याप पारित झालेले नाही. दरम्यान,  राहुल गांधी यांनी कोचिन येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जवळच्या 15 मित्रांना कमाल उत्पन्न गॅरंटी दिली असून शेतकऱ्यांना मात्र फसविले आहे. तुम्ही अनिल अंबानी असाल तर या योजनेचा लाभ मिळेल. या उलट काँग्रेस किमान उत्पन्न योजना आणली असून ही योजना सर्व भारतीयांसाठी लागू होईल. असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांनी गेल्या 5 वर्षांत एकच काम केले, ते म्हणजे एका मागोमाग एक खोटे बोलणे. यामुळे देशाचा वेळ वाय़ा गेला. तरणांना 2 कोटी रोजगार उपलब्ध करण्याचेही आश्वासन त्यांनी दिलेले. किती जणांना रोजगार मिळाले ही आकडेवारीच समोर आली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसKeralaकेरळWomenमहिलाreservationआरक्षण