शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

पटेलांचा पुतळा उभारता येतो, मग राम मंदिरासाठी कायदा का करता येत नाही?- संघ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 4:56 PM

राम मंदिराच्या मुद्यावरुन संघ आक्रमक

मुंबई: वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारला जाऊ शकतो, मग राम मंदिरासाठी कायदा का केला जाऊ शकत नाही?, असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून विचारण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सभेत संघाचे सह-सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी हा प्रश्न विचारला. गेल्या काही दिवसांपासून राम मंदिरासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद यांच्यासह अनेक हिंदुत्त्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या तटावर सरदार पटेल यांचा पुतळा उभारला जाऊ शकतो, तर मग भव्य राम मंदिरासाठी कायदा संमत का केला जात नाही?, असा प्रश्न होसबळे यांनी सभेला संबोधित करताना विचारला. याआधी संघाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनीही हाच मुद्दा उपस्थित केला होता. अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्यासाठी कायदा करण्याची मागणी भागवत यांनी केली होती. आता होसबळे यांनी संघाच्या याच भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. दत्तात्रय होसबळे यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करताना पी. व्ही. नरसिंह राव यांच्या विधानाचा संदर्भ दिला. 'वादग्रस्त जमिनीखाली मंदिराचे अवशेष सापडल्यास ती जमीन मंदिराच्या उभारणीसाठी दिली जाईल, अशी माहिती पी. व्ही. नरसिंह राव यांनी पंतप्रधान असताना सर्वोच्च न्यायालयाला दिली होती. त्यानंतर उत्खननात मंदिराचे अवशेषदेखील सापडले. मात्र आता या प्रकरणी निकाल देण्यास न्यायालय टाळाटाळ करत आहे. या सुनावणीला प्राधान्य द्यावं, असं न्यायालयाला वाटत नाही. यासाठी सर्वोच्च न्यायालयानं स्वतंत्र घटनापीठाची स्थापना केली आहे. मात्र प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या प्रकरणावर अद्याप कोणताही निर्णय आलेला नाही,' असं म्हणत होसबळे यांनी न्यायालयाकडून होणाऱ्या विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदीAyodhyaअयोध्याBJPभाजपा