शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विजय मिळाला नाही, तर भाजप होणार प्रबळ विरोधी पक्ष; टी. राजा सिंह यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 08:43 IST

त्रिकाेणी लढतीकडे राज्याचे लक्ष

हैदराबाद : तेलंगणाच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला विजय मिळाला नाही तर तो प्रबळ विरोधी पक्ष म्हणून पुढे येईल, असे गोशामहल मतदारसंघातील भाजपचे उमेदवार टी. राजा सिंह यांनी गुरुवारी सांगितले. गेल्या विधानसभा निवडणुकांतही ते गोशामहल मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. टी. राजा सिंह यांनी सांगितले की, भारत राष्ट्र समितीने  (बीआरएस) असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएम या पक्षातील नेत्यांशी हातमिळवणी केली आहे. 

गोशामहल मतदारसंघात १७ हजार बोगस मतदारांची नावे नोंदविण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला. टी. राजा सिंह यांची लढत बीआरएसचे नंदकिशोर व्यास व काँग्रेसच्या मोगिली सुनीता या उमेदवारांशी होणार आहे. राजा सिंह यांच्यावरील कारवाई पक्षाने मागे घेतली. त्यामुळे येथे रंगत निर्माण झाली आहे. (वृत्तसंस्था)

‘तिसऱ्यांदाही मीच निवडून येणार’

भाजपचे उमेदवार टी. राजा सिंह यांनी सांगितले की, मी तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून येणार आहे. गोशामहल मतदारसंघात मी गेल्या नऊ वर्षांत ५०० कोटी रुपयांची विकासकामे करून घेतली आहेत. काँग्रेसच्या उमेदवार मोगिली सुनीता म्हणाल्या की, गोशामहल मतदारसंघात टी. राजा सिंह हे एकेकाळी अतिशय प्रबळ उमेदवार होते. पण आता तसे नाही. सिंह हे मतदारसंघात क्वचितच दिसतात.

विशिष्ट धर्माबद्दल अतिशय अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार टी. राजा सिंह यांना भाजपने निलंबित केले होते. ही कारवाई गेल्या महिन्यात मागे घेण्यात आली. पक्षाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसीला त्यांनी दिलेल्या उत्तरानंतर या घडामोडी घडल्या होत्या. अवमानकारक वक्तव्ये केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना नोव्हेंबर २०२२मध्ये न्यायालयाने जामीन मंजूर केला. 

टॅग्स :telangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३BJPभाजपाcongressकाँग्रेस