शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये थरार! AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या कारचा पाठलाग, भाजपा इच्छुकांचा कारनामा
2
शक्तिप्रदर्शन करत आला, पण अर्जच विसरला! धापा टाकत कार्यकर्ता अखेर अर्ज घेऊन आला
3
Amit Shah : Video - "बंगालमधील घुसखोरी संपवणार, प्रत्येकाला शोधून बाहेर काढणार", अमित शाह कडाडले
4
"पक्षासाठी केसेस अंगावर, तिकीट मात्र दुसऱ्यांना"; संभाजीनगरात भाजप पदाधिकाऱ्यांचा राडा
5
मनपा निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंच्या किती संयुक्त सभा होणार?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
नाराजी टाळण्यासाठी एबी फॉर्मबाबत सस्पेन्स, उमेदवारीसाठी आज अखेरचा दिवस : युतीची शक्यता कमीच
7
उद्धवसेना, मनसेने अमराठी उमेदवारांनाही दिलं तिकीट; 'मराठीचा नारा' देणाऱ्या ठाकरे बंधूंचं काय आहे 'गणित'?
8
जालना मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा; शिंदेसेना-भाजपात १२ प्रभागांतील जागांवर एकमत
9
Nashik Municipal Corporation Election : नाशकात शिंदेसेना-राष्ट्रवादी एकत्र; महायुतीत फूट तर मविआत एकजूट, भाजपकडून 'ही' नावं निश्चित
10
काहीतरी मोठं घडणार! चीनची आक्रमक हालचाल, तैवानला सैन्याने वेढा घातला; विमानांची उड्डाणेही रद्द
11
Municipal Election 2026: सुरुवात झाली! अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेची युती तुटली...
12
वादळाने दृष्टी हिरावली, 'दिव्यदृष्टी'ने भाकितं वर्तवली; बाबा वेंगा कोण होत्या? त्यांनी खरंच हे सगळं लिहून ठेवलंय?
13
फोटोग्राफर, प्रोड्यूसर, नॅशनल लेव्हल फुटबॉलपटू... कोण आहे प्रियंका गांधींची होणारी सून?
14
विरोधकांच्या एकीला तडे; वसई-विरारमध्ये उद्धवसेना स्वबळावर, महायुतीतील मित्रपक्षाचा पाठिंबा
15
बच्चू कडूंच्या प्रहारची उद्धवसेनेसोबत युती, पण उमेदवार लढणार मशाल चिन्हावर!
16
Travel : चला, प्रेमाच्या शहरात! आयफेल टॉवर अन् सीन नदीच्या काठावर फिरण्यासाठी असा करा परफेक्ट प्लॅन
17
मिशन बंगाल; अमित शाहांनी रणनीती आखली, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जींचा सामना करणार...
18
मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून ५६ उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध, अमराठी आणि मुस्लिम चेहऱ्यांना दिलं प्राधान्य   
19
२०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा...
20
बाजारात एन्ट्री घेताच जोरदार आपटला 'हा' शेअर, पहिल्याच दिवशी २४% नं घसरला, गुंतवणूकदारांना मोठा झटका
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 09:43 IST

हिमाचल प्रदेशातील सोलन येथील एका व्यावसायिकाने पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर पीएम फंडला ११ लाख रुपये देण्याची घोषणा केली.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. दोन्ही देशातील सैन्य अलर्ट आहेत. पाकिस्तान सैन्याकडून सलग ११ दिवस शस्त्राचे उल्लंघन केले आहेत. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील प्रत्येक नागरिक दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेशातील सोलन येथील एका व्यावसायिकाने युद्ध झाले तर पीएम फंडात ११ लाख रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे. या व्यावसायिकाचे नाव अजय सहगल आहे आणि त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हे सांगितले.

उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले

सोलनचे व्यापारी अजय सहगल म्हणाले की, जर मोदींनी पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारले तर मी पंतप्रधान मदत निधीला ११ लाख रुपये देणारा पहिला व्यक्ती असेन. देशातील प्रत्येक नागरिक प्रथम असे मानतो की हे मोदी सरकार आहे, नंतर भाजप सरकार आहे. 

अजय सहगल म्हणाले की, जर मोदी सरकारच्या काळात हे घडले असेल तर ते खूप लज्जास्पद आहे. जर श्रीनगरमध्ये मुख्यमंत्री हवा असेल तर तो योगी आदित्यनाथसारखा असावा. पुढच्या वेळी जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजपचे सरकार असावे आणि योगींना मुख्यमंत्री बनवावे अशीही अजय सहगल यांनी इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले की, सध्या प्रत्येक भारतीयाच्या मनात राग आहे. मी सार्वजनिक ठिकाणी राहणारा माणूस आहे. 

उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार

गेल्या काही दिवसापासून पाकिस्तान आणि भारतीय सीमेवर तणावाचे वातावरण आहे. पहगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे दोन्ही देशात वाढला आहे. दोन्ही देशातील सैन्य अलर्ट आहेत. दरम्यान, आता भारत सरकार ७ मे २०२५ रोजी देशभरातील २४४ ओळखल्या जाणाऱ्या नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल आयोजित करणार आहे. क्षेपणास्त्र हल्ले किंवा हवाई हल्ले यासारख्या युद्धसदृश परिस्थितीत सामान्य जनता किती जलद आणि प्रभावीपणे प्रतिसाद देऊ शकते याची चाचणी करणे हा याचा उद्देश आहे.

या मॉक ड्रिलमध्ये सध्याची पसिस्थीती जाणून घेतली जाईल. यामध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजणे, शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित होणे, आश्रय घेण्याचा सराव करणारे लोक आणि आपत्कालीन सेवा जलद प्रतिसाद देणे यांचा समावेश असेल. या सरावाचा उद्देश भीती, गोंधळ कमी करणे आहे, अराजकता कमी करणे आणि जीव वाचवणे आहे.

ही तयारी म्हणजे शीतयुद्धाच्या काळाची आठवण करून देणाऱ्या असल्या तरी, सध्याच्या जागतिक तणावांमुळे याला पुन्हा एकदा महत्त्व आले आहे. ७ मे रोजी होणाऱ्या या राष्ट्रीय स्तरावरील सरावासाठी गृह मंत्रालयाने २ मे २०२५ रोजी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचना जारी केल्या. हा सराव नागरी संरक्षण नियम, १९६८ अंतर्गत येतो.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानIndiaभारत