शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

हिंमत असेल तर मोदींनी सर्वांसमक्ष चर्चा करावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 07:50 IST

ममतांचे आव्हान; भाजपला बहुमत अशक्यच

विशाखापट्टणम : हिंमत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए सरकारच्या कामगिरीबाबत विरोधकांशी खुलेआम चर्चा करावी, असे आव्हान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले आहे. लोकसभा निवडणुकांत भाजपला १२५ पेक्षा जास्त जागा व बहुमत मिळणार नाही, असेही भाकीत त्यांनी वर्तविले.

तेलुगू देसम पार्टीने येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, २०१४च्या निवडणुकीत दक्षिण भारतात भाजपने २१ जागा जिंकल्या होत्या. त्यातील १७ जागा कर्नाटकातील होत्या. आगामी लोकसभा निवडणुकांत एवढ्याही जागा भाजपला जिंकता येणे अशक्य आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपचा धुव्वा उडाला आहे. गुजरातमध्येही या पक्षाला लोकसभेच्या पूर्वीसारखा विजय मिळणार नाही. उत्तर प्रदेशात २०१४ साली भाजपविरोधी मतांत विभागणी झाल्याने त्या पक्षाला ८० पैकी ७३ जागा जिंकता आल्या होत्या. मात्र, यावेळी भाजपला त्या राज्यात १५ हून जास्त जागा मिळणे अवघड आहे. एनडीए सरकारने पाच वर्षांत केलेल्या कामगिरीवर मोदींची खुलेआम चर्चा करण्याची तयारी असल्यास विरोधकांकडून आम्ही एक प्रतिनिधी पाठवू. तो कोणत्याही कागदपत्रांचा आधार न घेतामोदींना प्रश्न विचारेल. मोदींनीही कोणती कागदपत्रे न चाळताकिंवा टेलिप्रॉम्पटरची मदत न घेता उत्तरे द्यावीत, अशी उपरोधिक टीकाही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. (वृत्तसंस्था)‘सैन्याचा अवमान’भारतीय सैन्याला मोदींची सेना म्हणणाऱ्या योगी आदित्यनाथांनी संरक्षण दलांचा अवमान केला आहे अशी खरमरीत टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे. त्या म्हणाल्या की, भारतीय सैन्य भाजपच्या मालकीचे नसून ते साऱ्या देशाचे आहे. देशाच्या संरक्षण दलांबद्दल आम्हाला रास्त अभिमान आहे. प्रत्येक नागरिकाने योगी आदित्यनाथ यांच्या विधानांचा निषेध केला पाहिजे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा