शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 11:04 IST

Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून, त्यांना कलमा पढायला लावून तसेच त्यांचे कपडे उतरवून त्यांची धार्मिक ओळख पटवून त्यांना ठार मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून, त्यांना कलमा पढायला लावून तसेच त्यांचे कपडे उतरवून त्यांची धार्मिक ओळख पटवून त्यांना ठार मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी भाजपावर गंभीर आऱोप केला आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांची हत्या करताना त्यांना धर्म विचारून मग गोळ्या झाडल्या होत्या. त्याबाबत विचारलं असता संजय राऊत  म्हणाले की, जर पर्यटकांची हत्या करताना त्यांना धर्म विचारला गेला असेल तर त्यासाठीही भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार आहे. ज्या प्रकारे आपल्या देशात द्वेषाचं राजकारण सुरू आहे, ती कधी ना कधी उलटणार आहे. पहलागममध्ये जे काही घडलंय, त्यासाठी भाजपानं निर्माण केलेली घाण, द्वेषाचं राजकारण जबाबदार आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

यावेळी संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शाह यांचा अपयशी गृहमंत्री असा उल्लेख करत त्यांच्यावर बोचरी टीका केली. ते  म्हणाले की, अमित शाह हे अपयशी गृहमंत्री  आहेत. मीच नाही तर संपूर्ण देश त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. अमित शाह हे अपशकुनी आणि अपयशी गृहमंत्री आहेत. त्यांना एक मिनिटही पदावर राहण्याचा अधिकार नाही आहे. ते दिवसभर राजकारण, कटकारस्थान करत असतात. हा पक्ष तोडायचा, तो पक्ष तोडायचा, हे चालत असतान तिकडे संपूर्ण देश तुटत आहे. आमची माणसं मारली जात आहेत आणि हे लोक राजकारणात गुंतलेले आहेत.

संजय राऊत यांनी सांगितले की, काल पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आमचे देशभरातील पर्यटक मारले गेले. त्यात महाराष्ट्रामधील सहा जणांचा समावेश आहे. काश्मीरवर केंद्राचं पूर्ण नियंत्रण राहावं यासाठी कलम ३७० हटवलं. जम्मू -काश्मीरला केंद्रशासित बनवलं. त्यामुळे काल पहलगाम येथे जो हल्ला झाला, त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची नाही तर केंद्र सरकारची आहे.

ही दुर्घटना का घडली. यासाठी सरकार जबाबदार आहे, गृहमंत्री जबाबदार आहेत. हा काळ म्हणजे काश्मीरमधील पर्यटनाचा हंगाम आहे. तिथे दोन ते तीन हजार पर्यटक होते.  मात्र तिथे सुरक्षा दलांचा एकही जवान तैनात नव्हता. मात्र अमित शाह श्रीनगरमध्ये उतरले तेव्हा तिथे जवळपास ७५ कारचा ताफा होता. तसेच ५०० हून अधिक बंदुकधारी सुरक्षा रक्षक होते. एका व्यक्तीसाठी सुरक्षेचा एवढा लावाजमा होता. मात्र सामान्य जनता जेव्हा तिथे जाते, तेव्हा तिथे त्यांच्यासाठी कुठलीही सुरक्षा व्यवस्था नसते. त्याचं कारण म्हणजे आमच्या लष्करामध्ये सुमारे २ लाख पदं रिक्त आहेत. यांना संरक्षणाच्या खर्चात कपात करायची आहे. हे लाडकी बहीण सारख्या योजनांना पैसे वळवतात आणि सुरक्षा व्यवस्थेशी खेळ करतात, असा दावा संजय राऊत यांनी केला.

नोटाबंदी झाल्यानंतर जम्मू काश्मीरमधील दहशतवाद पूर्णपणे संपुष्टात येईल, असं मोदी आणि अमित शाह यांनी सांगितलं होतं. मात्र दहशतवाद वाढत आहे, आणि हे लोक संसदेत खोटं बोलत  आहेत. तिथे घडणाऱ्या घडामोडींची माहिती बाहेर येत नाही. काल जे काही घडलं, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे जबाबदार आहेत. सरकार जबाबदार आहे. पश्चिम बंगालपासून काश्मीरपर्यंत ज्या प्रकारे देशात द्वेष  परवण्याचं काम सुरू आहे, त्याचा हा परिणाम आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला. 

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरSanjay Rautसंजय राऊतAmit Shahअमित शाहCentral Governmentकेंद्र सरकारPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला