शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

'तीन निवडणुका जिंकणारे राहुल गांधी असताना महाआघाडीची गरजच काय?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 16:32 IST

राहुल गांधी यांना भाजपा नेते राम माधव यांचा टोला

नवी दिल्ली: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसनं मिळवलेल्या विजयांमुळे राहुल गांधींना पंतप्रधान पदाचं उमेदवार समजलं जातं आहे. असं असेल तर मग महाआघाडीची गरजच काय?, असा टोला भाजपाचे राष्ट्रीय महासचिव राम माधव यांनी लगावला. सध्या द्रमुकचे स्टॅलिन वगळता कोणीही महाआघाडीचे प्रमुख नेते म्हणून राहुल गांधीचं नाव पुढे करताना दिसत नाही. महाआघाडीतील 6 नेत्यांना पंतप्रधान होण्याची इच्छा आहे, अशा शब्दांमध्ये राम माधव यांनी महाआघाडीवर भाष्य केलं. राम माधव यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाबद्दल बोलताना नुकत्याच झालेल्या निवडणुकांचा संदर्भ दिला. 'राहुल गांधी काँग्रेसचे प्रमुख आहेत. त्यांचं नेतृत्त्व पक्षासाठी योग्य आहे की नाही, हे त्यांनी ठरवावं. त्यांचं नेतृत्त्व काँग्रेससाठी चांगलं आहे की नाही, यावर आम्ही कसं बोलणार? त्यांच्या नेतृत्त्वाची झलक गेल्या काही निवडणुकांमध्ये दिसली. त्यामध्ये काँग्रेसला विजय मिळाला,' असं राम माधव म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही पक्षांनी भाजपाची साथ सोडली, त्यावरही माधव यांनी भाष्य केलं. 'आघाडी किंवा युतीच्या राजकारणात तडजोडी करावी लागते. त्यासाठी भाजपा तयार आहेत. कुशवाह यांच्यासारख्या नेत्यांनी आमची साथ सोडली. मात्र आम्ही नवे मित्र शोधत आहोत. दक्षिण आणि पूर्व भारतात नव्या मित्रपक्षांचा शोध सुरू आहे,' अशी माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९