शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

म्हणे, हा 'नया पाकिस्तान'... मग दहशतवाद्यांवर 'नयी अ‍ॅक्शन' घ्या; भारतानं पाकला फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 12:43 IST

नवी दिल्लीत आज भारतीय परराष्ट्र खात्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत परराष्ट्र खात्याने पाकिस्तान सरकारला लक्ष्य करत पाकिस्तानची कानउघडणी केली.

नवी दिल्ली - आजचा पाकिस्तान हा 'नया पाकिस्तान'  'नयी सोच का पाकिस्तान' असल्याचा दावा करणाऱ्या पाकमधील राजकीय नेत्यांची भारतीय परराष्ट्र खात्यानं शेलक्या शब्दांत कानउघाडणी केली आहे. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर अनेकदा पाकिस्तानचा खोटरडेपणा उघडा पडला आहे. तर, भारताचे दोन विमानं पाडल्याचा पाकचा दावाही खोटा असल्याचं परराष्ट्र खात्याचे सचिव रवीश कुमार यांनी सांगितले. 

नवी दिल्लीत आज भारतीय परराष्ट्र खात्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत परराष्ट्र खात्याने पाकिस्तान सरकारला लक्ष्य करत पाकिस्तानची कानउघडणी केली. तसेच नया पाकिस्तान म्हणणाऱ्या पाकिस्तानी नेत्यांना फटकारलं. नया पाकिस्तान म्हणता, मग दहशतवाद्यांवर नयी अ‍ॅक्शन घ्या, असे भारताने सुनावले आहे. पाकिस्तानकडून सातत्याने भारताची दोन विमाने पाडल्याचे सांगण्यात येते, मग पाक त्याचे पुरावे का देत नाही ? कुठंय ते व्हिडीओ रेकॉर्डींग, कुठंय त्याची सत्यता, असा प्रश्न रवीश कुमार यांनी पाकिस्तानला विचारला आहे. भारताने पाकिस्तानचे विमान पाडले अन त्याचे पुरावेही दिले. तर, पाकिस्तानकडून भारताचे दोन विमान पाडल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, भारताचे मिग 21 हे एकच विमान पाडण्यात आले आहे. जर, दुसरे विमान पाडण्यात आले असेल, तर ते कुठंय, त्याचे पुरावे पाकिस्तान का देत नाही. पाकिस्तान नेहमीप्रमाणे खोटं बोलतोय, असेही भारताच्या परराष्ट्र खात्याचे सचिव रवीश कुमार यांनी म्हटले. पाकिस्तानवर संयुक्त राष्ट्राकडूनही आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव टाकण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीकडून पाकिस्तानाल जैश ए मोहम्मद संघटनेवर कडक कारवाई करण्याचे बजावण्यात आल्याचे रविश कुमार यांनी सांगितले. 

पाकिस्तान सरकार जैशच्या प्रवक्त्यासारखं वागतंय... 

भारतानं एफ-१६ पाडलं... त्याचे पुरावेही दिलेत, त्यावर पाकिस्तान काहीच का बोलत नाही? मसूद अझहर पाकिस्तानमध्येच असल्याचं त्यांचे परराष्ट्र मंत्री मान्य करतात, पण त्याच्यावर कुठलीच कारवाई केली जात नाही. पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैशनं स्वीकारली आहे, हे पाकिस्तान का विसरतंय, असेही भारताने म्हटले आहे.

 

टॅग्स :Indiaभारतpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मद