शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

म्हणे, हा 'नया पाकिस्तान'... मग दहशतवाद्यांवर 'नयी अ‍ॅक्शन' घ्या; भारतानं पाकला फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 12:43 IST

नवी दिल्लीत आज भारतीय परराष्ट्र खात्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत परराष्ट्र खात्याने पाकिस्तान सरकारला लक्ष्य करत पाकिस्तानची कानउघडणी केली.

नवी दिल्ली - आजचा पाकिस्तान हा 'नया पाकिस्तान'  'नयी सोच का पाकिस्तान' असल्याचा दावा करणाऱ्या पाकमधील राजकीय नेत्यांची भारतीय परराष्ट्र खात्यानं शेलक्या शब्दांत कानउघाडणी केली आहे. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर अनेकदा पाकिस्तानचा खोटरडेपणा उघडा पडला आहे. तर, भारताचे दोन विमानं पाडल्याचा पाकचा दावाही खोटा असल्याचं परराष्ट्र खात्याचे सचिव रवीश कुमार यांनी सांगितले. 

नवी दिल्लीत आज भारतीय परराष्ट्र खात्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत परराष्ट्र खात्याने पाकिस्तान सरकारला लक्ष्य करत पाकिस्तानची कानउघडणी केली. तसेच नया पाकिस्तान म्हणणाऱ्या पाकिस्तानी नेत्यांना फटकारलं. नया पाकिस्तान म्हणता, मग दहशतवाद्यांवर नयी अ‍ॅक्शन घ्या, असे भारताने सुनावले आहे. पाकिस्तानकडून सातत्याने भारताची दोन विमाने पाडल्याचे सांगण्यात येते, मग पाक त्याचे पुरावे का देत नाही ? कुठंय ते व्हिडीओ रेकॉर्डींग, कुठंय त्याची सत्यता, असा प्रश्न रवीश कुमार यांनी पाकिस्तानला विचारला आहे. भारताने पाकिस्तानचे विमान पाडले अन त्याचे पुरावेही दिले. तर, पाकिस्तानकडून भारताचे दोन विमान पाडल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, भारताचे मिग 21 हे एकच विमान पाडण्यात आले आहे. जर, दुसरे विमान पाडण्यात आले असेल, तर ते कुठंय, त्याचे पुरावे पाकिस्तान का देत नाही. पाकिस्तान नेहमीप्रमाणे खोटं बोलतोय, असेही भारताच्या परराष्ट्र खात्याचे सचिव रवीश कुमार यांनी म्हटले. पाकिस्तानवर संयुक्त राष्ट्राकडूनही आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव टाकण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीकडून पाकिस्तानाल जैश ए मोहम्मद संघटनेवर कडक कारवाई करण्याचे बजावण्यात आल्याचे रविश कुमार यांनी सांगितले. 

पाकिस्तान सरकार जैशच्या प्रवक्त्यासारखं वागतंय... 

भारतानं एफ-१६ पाडलं... त्याचे पुरावेही दिलेत, त्यावर पाकिस्तान काहीच का बोलत नाही? मसूद अझहर पाकिस्तानमध्येच असल्याचं त्यांचे परराष्ट्र मंत्री मान्य करतात, पण त्याच्यावर कुठलीच कारवाई केली जात नाही. पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैशनं स्वीकारली आहे, हे पाकिस्तान का विसरतंय, असेही भारताने म्हटले आहे.

 

टॅग्स :Indiaभारतpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मद