शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत वादळ वारं सुटलंय...विमानतळ रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
2
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
3
काँग्रेसकडून अचानक 'जय मराठी'चा नारा; सरकार स्थापन होताच...; जयराम रमेश यांचं वचन
4
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
5
'अडवाणी, मुरली मनोहर जोशींप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
6
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
7
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
8
'माझ्या परवानगीशिवाय मला जन्म का दिला?' नाराज मुलीने आई-वडीलांवरच दाखल केला खटला
9
Share Market मध्ये रिकव्हरी; फार्मा, आयटी, बँक इंडेक्समुळे तेजी; TATA Motors आपटला
10
Arvind Kejriwal : "कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती
11
RCB च्या विजयाने Play Off चे गणित किचकट झाले! ३ स्थानासाठी ७ संघ मैदानात उरले
12
मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्याची एन्ट्री, ४०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त होतं सेलिब्रेशन
13
'पाकिस्तानने बांगड्या भरल्या नसतील तर आम्ही त्यांना बांगड्या भरण्यास भाग पाडू', नरेंद्र मोदींचा टोला   
14
Virat Kohli-अनुष्का शर्माची २.५ कोटींच्या गुंतवणूकीचे झाले ९ कोटी; आता कंपनीचा येणार IPO, गुंतवणूक करणार का?
15
धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी
16
पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले
18
Lok Sabha Election दरम्यान शेअर बाजारात का दिसतो चढ-उतार? आकडेवारीवरुन मिळेल उत्तर
19
१८ व्या वर्षी दृष्टी गेली, आईच्या मदतीनं पेपर लिहिलं; संघर्षातून युवक बनला IAS
20
शरद पवारांकडून सुपारी घेऊन संजय राऊतांनी उबाठा संपवली; मनसेचा जोरदार पलटवार

नितीश कुमारांनी घेतला मोठा निर्णय; आई-वडिलांची सेवा केली नाही तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 9:46 AM

तसेच राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या पेन्शन योजनेला राइट टू सर्व्हिस अ‍ॅक्टमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे

पटणा - समाजात अशा अनेक घटना आहेत ज्यामध्ये आई-वडील वृद्ध झाल्यानंतर मुलं त्यांचा सांभाळ करत नाहीत. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात मुलांकडून आई-वडिलांवर अन्याय केला जातो. त्यांना सन्मानजनक वागणूक दिली जात नाही. मात्र बिहारमध्ये आता जर वयोवृद्ध आई-वडिलांची सेवा केली नाही तर जेलमध्ये रवानगी केली जाऊ शकते असा मुख्यमंत्री निर्णय नितीश कुमार यांनी घेतला आहे. नितीश कुमारांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. 

बिहारमध्ये मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार आणि मंत्र्यांनी राज्यातील पाल्यांना इशारा दिला आहे की, जर तुम्ही आई-वडिलांची सेवा केली नाही तर त्यांना जेलमध्ये पाठवलं जाईल. आई-वडिलांच्या तक्रारीनंतर मुलांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. त्याचसोबत पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबीयातील एकाला शासकीय नोकरी देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत अनेक प्रस्तावांना मान्यता दिली. शहीद जवानांच्या कुटुंबीयांपैकी एकाला शासकीय नोकरीत तृतीय अथवा चतुर्थ श्रेणीत नोकरी देण्याला मान्यता दिली. शहीदाच्या पत्नीने लिखीत स्वरुपात त्यांच्या वारसाला नोकरी देण्याची शिफारस केल्यानंतर ही नोकरी दिली जाणार आहे. जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 40 पेक्षा अधिक जवान शहीद झाले होते. यामध्ये बिहारमधील भागलपूर येथील रतन कुमार ठाकूर आणि पटणा जिल्ह्यातील संजय कुमार सिन्हा यांना वीरमरण आले होते. 

तसेच राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या पेन्शन योजनेला राइट टू सर्व्हिस अ‍ॅक्टमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही वयोवृद्धाची पेन्शन योजनेत रखडल्यानंतर नियोजित अर्जापासून 21 दिवसांत त्यांच्या तक्रारीचं निरसन करण्यात येणार आहे. तसेच पटणा येथे बनविण्यात येणाऱ्या विभागीय पासपोर्ट कार्यालयासाठी 55.84 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. तर पासपोर्ट कार्यालयासाठी परराष्ट्र मंत्रालयाला 1.46 एकर जमीन हस्तांतरित करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहार