शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

... तर महाडची दुर्घटना टळली असती - नितिन गडकरी

By admin | Updated: September 13, 2016 16:56 IST

जर पर्यायी पुलासाठी भूसंपादन आणि पर्यावरण खात्याची मंजुरी या गोष्टी वेळेत झाल्या असत्या तर महाडची दुर्घटना टळली असती असे उद्गार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी काढले

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - जर पर्यायी पुलासाठी भूसंपादन आणि पर्यावरण खात्याची मंजुरी या गोष्टी वेळेत झाल्या असत्या तर महाडची दुर्घटना टळली असती असे उद्गार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी काढले आहेत. लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्हमध्ये बोलताना गडकरी यांनी भूसंपादन आणि पर्यावरण खात्याची मंजुरी वेळेत मिळणं किती आवश्यक आहे यावर भर दिला.
 
दोन ऑगस्ट रोजी महाड पूल दुर्घटनेत 26 जणांनी प्राण गमावले होते. या दुर्घटनेची जबाबदारी सरकार या नात्याने आमचीच असल्याचे गडकरींनी त्याचवेळी सांगितले होते. सावित्री नदीवरच्या पर्यायी पूलासाठी वेळीच पर्यावरण खात्याची मंजुरी मिळाली असती आणि भूसंपादन वेळेत झाले असते, तर या ब्रिटिशकालीन पुलावरचं अवलंबित्व कमी झालं असतं आणि ही दुर्घटना टळली असती अशी खंत गडकरींनी व्यक्त केली आहे.
 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी, आम्हा दोघांना याविषयी खेद झाला, परंतु आम्ही काय करू शकतो अशी हतबलताही त्यांनी व्यक्त केली.
 
गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी 12 हजार कोटी रुपयांची योजना बनवण्यात आली आहे, तसेच 2018 पर्यंत संपूर्ण महामार्ग काँक्रिटचा करण्यात येईल असेही गडकरी म्हणाले.
 
(महामार्गावरील मृत्यूचे प्रमाण कमी करणे प्राथमिकता - नितीन गडकरी)
 
गेल्या दोन वर्षांमध्ये महामार्गावरील मृत्यूंमध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाली असून हे प्रमाण कमी करणे हे आमचे मुख्य लक्ष्य असल्याचेही गडकरी म्हणाले. रस्त्यांच्या बांधकामांमध्ये असलेल्या कमतरता लक्षात आल्या असून अशा 786 जागा निश्चित करण्यात आल्याचे आणि या धोकादायक जागांचा धोका कमी करण्यासाठी 11 हजार कोटी रुपयांची योजना आखण्यात आल्याचेही ते म्हणाले.
 
मे 2019 पूर्वी रस्त्यांवरील अपघातांची संख्या 50 टक्क्यांनी घटवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे गडकरी म्हणाले. महामार्गांचे रुंदीकरण आणि सुरक्षेच्या उपायांमध्ये महाराष्ट्राकडे विशेष लक्ष देण्यात येईल याची हमी गडकरी यांनी दिली आहे.