शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

भारताने नैतिक शिक्षण आणि तत्वांना धरुन वाटचाल केली, तर चीनदेखील मागोमाग येईल - दलाई लामा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 20:09 IST

भारताने आपल्या तत्वांवर आधारिक नैतिक शिक्षणावर जोर दिला तर चीनदेखील भारताच्या पावलांवर पाऊल ठेवत आपली वाटचाल करेल असं तिबेटीयन धर्मगुरु दलाई लामा यांनी म्हटलं आहे.

ठळक मुद्दे'भारताने आपल्या तत्वांवर आधारिक नैतिक शिक्षणावर जोर दिला तर चीनदेखील भारताच्या पावलांवर पाऊल ठेवत आपली वाटचाल करेल'युद्ध आणि शस्त्रांचा वापर गरजेचा नसून करुणा आणि शिक्षणावर जोर देणं गरजेचं असल्याचं दलाई लामांनी म्हटलं आहे

नवी दिल्ली - भारताने आपल्या तत्वांवर आधारिक नैतिक शिक्षणावर जोर दिला तर चीनदेखील भारताच्या पावलांवर पाऊल ठेवत आपली वाटचाल करेल असं तिबेटीयन धर्मगुरु दलाई लामा यांनी म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी युद्ध आणि शस्त्रांचा वापर गरजेचा नसून करुणा आणि शिक्षणावर जोर देणं गरजेचं असल्याचं सांगितलं. तिबेटवर सध्या राजकीयदृष्या जरी चीनने कब्जा केला असला, तरी एक दिवस तिबेट चीनवर राज्य करेल अशी भविष्यवाणीही दलाई लामा यांनी केली आहे. काही दिवसांपुर्वी दलाई लामांनी तिबेटच्या स्वातंत्र्याची नाही, तर विकासाची अपेक्षा असल्याचं सांगितलं होतं. 

दलाई लामांनी सांगितलं की, 'युद्धासारख्या समस्यांमधून उपाय शोधणं बेईमानी असून ही खूप जुनी पद्धत आहे. करुणा आणि शिक्षणाचा प्रसार झाल्यानंतरच हे जग एक सुंदर ठिकाण बनू शकतं'. भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीची तुलना करताना ते बोलले की, 'शिक्षण आजच्या काळात महत्वाची गोष्ट असून भारतासाठी ही काही नवी गोष्ट नाही. भारतामध्ये अहिंसेचे विचार 1000 वर्ष जुने आहेत'.

'मला असं वाटतं आधुनिक भारत खूप शांततापुर्ण आहे. पाकिस्तानच्या तुलनेत भारतातील स्थिती खूप चांगली आहे. पाकिस्तान एक मुस्लिम देश असून भारतात पाकिस्तानच्या तुलनेत अधिक मुस्लिम राहतात. दोन्ही देशातील मुस्लिम एकच कुराण वाचतात. पण भारतातील मुस्लिम जास्त शांतताप्रिय आहेत. यामुळेच भारतात अनेक वर्षांपासून चालत आलेली अहिंसेची परंपरा अद्याप कायम आहे', असं दलाई लामा म्हणाले आहेत. 

भारतीय परंपरापासून प्रभावित झाल्याचं सांगतना दलाई लामा यांनी युद्ध आणि शस्त्रांच्या वापराने जगात फक्त छोटे युद्ध जिंकले जाऊ शकतात असं म्हटलं आहे. 'शस्त्रांचा वापर करत सत्तेपर्यंत नक्कीच पोहोचता येऊ शकतं, पण मोठ्या शर्यतीत हे कामाला येत नाही', हे सांगायला ते विसरले नाहीत. 

'भारतातील प्राचीन शिक्षापद्दतीमुले मला दृढ इच्छाशक्ती मिळाली. भारतीय संस्कृतीत समाधी आणि मौनची प्रथा तीन हजार वर्ष जुनी आहे. भारतीय संस्कृती वारंवार भावनांवर नियंत्रण आणि मानसिक स्तरावर सुधारणा करण्याबद्दल सांगते', असं दलाई लामा म्हणाले आहेत. 'बौद्ध धर्म अहिंसेचा धर्म आहे. यामध्ये हिंसा, युद्धाला कोणतंही स्थान नाही. भारतीय परंपरा आणि शिक्षणाचा प्रचार केल्यास जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित केली जाऊ शकते', असा विश्वास दलाई लामांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Dalai Lamaदलाई लामाchinaचीन