शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
2
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
3
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
4
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
5
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
6
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
7
रागाच्या भरात परेश रावल यांनी गमावले भान! म्हणाले, 'एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड...'
8
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
10
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
11
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
12
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
14
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
15
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
16
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
17
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
18
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
19
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
20
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...

भारताने नैतिक शिक्षण आणि तत्वांना धरुन वाटचाल केली, तर चीनदेखील मागोमाग येईल - दलाई लामा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 20:09 IST

भारताने आपल्या तत्वांवर आधारिक नैतिक शिक्षणावर जोर दिला तर चीनदेखील भारताच्या पावलांवर पाऊल ठेवत आपली वाटचाल करेल असं तिबेटीयन धर्मगुरु दलाई लामा यांनी म्हटलं आहे.

ठळक मुद्दे'भारताने आपल्या तत्वांवर आधारिक नैतिक शिक्षणावर जोर दिला तर चीनदेखील भारताच्या पावलांवर पाऊल ठेवत आपली वाटचाल करेल'युद्ध आणि शस्त्रांचा वापर गरजेचा नसून करुणा आणि शिक्षणावर जोर देणं गरजेचं असल्याचं दलाई लामांनी म्हटलं आहे

नवी दिल्ली - भारताने आपल्या तत्वांवर आधारिक नैतिक शिक्षणावर जोर दिला तर चीनदेखील भारताच्या पावलांवर पाऊल ठेवत आपली वाटचाल करेल असं तिबेटीयन धर्मगुरु दलाई लामा यांनी म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी युद्ध आणि शस्त्रांचा वापर गरजेचा नसून करुणा आणि शिक्षणावर जोर देणं गरजेचं असल्याचं सांगितलं. तिबेटवर सध्या राजकीयदृष्या जरी चीनने कब्जा केला असला, तरी एक दिवस तिबेट चीनवर राज्य करेल अशी भविष्यवाणीही दलाई लामा यांनी केली आहे. काही दिवसांपुर्वी दलाई लामांनी तिबेटच्या स्वातंत्र्याची नाही, तर विकासाची अपेक्षा असल्याचं सांगितलं होतं. 

दलाई लामांनी सांगितलं की, 'युद्धासारख्या समस्यांमधून उपाय शोधणं बेईमानी असून ही खूप जुनी पद्धत आहे. करुणा आणि शिक्षणाचा प्रसार झाल्यानंतरच हे जग एक सुंदर ठिकाण बनू शकतं'. भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीची तुलना करताना ते बोलले की, 'शिक्षण आजच्या काळात महत्वाची गोष्ट असून भारतासाठी ही काही नवी गोष्ट नाही. भारतामध्ये अहिंसेचे विचार 1000 वर्ष जुने आहेत'.

'मला असं वाटतं आधुनिक भारत खूप शांततापुर्ण आहे. पाकिस्तानच्या तुलनेत भारतातील स्थिती खूप चांगली आहे. पाकिस्तान एक मुस्लिम देश असून भारतात पाकिस्तानच्या तुलनेत अधिक मुस्लिम राहतात. दोन्ही देशातील मुस्लिम एकच कुराण वाचतात. पण भारतातील मुस्लिम जास्त शांतताप्रिय आहेत. यामुळेच भारतात अनेक वर्षांपासून चालत आलेली अहिंसेची परंपरा अद्याप कायम आहे', असं दलाई लामा म्हणाले आहेत. 

भारतीय परंपरापासून प्रभावित झाल्याचं सांगतना दलाई लामा यांनी युद्ध आणि शस्त्रांच्या वापराने जगात फक्त छोटे युद्ध जिंकले जाऊ शकतात असं म्हटलं आहे. 'शस्त्रांचा वापर करत सत्तेपर्यंत नक्कीच पोहोचता येऊ शकतं, पण मोठ्या शर्यतीत हे कामाला येत नाही', हे सांगायला ते विसरले नाहीत. 

'भारतातील प्राचीन शिक्षापद्दतीमुले मला दृढ इच्छाशक्ती मिळाली. भारतीय संस्कृतीत समाधी आणि मौनची प्रथा तीन हजार वर्ष जुनी आहे. भारतीय संस्कृती वारंवार भावनांवर नियंत्रण आणि मानसिक स्तरावर सुधारणा करण्याबद्दल सांगते', असं दलाई लामा म्हणाले आहेत. 'बौद्ध धर्म अहिंसेचा धर्म आहे. यामध्ये हिंसा, युद्धाला कोणतंही स्थान नाही. भारतीय परंपरा आणि शिक्षणाचा प्रचार केल्यास जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित केली जाऊ शकते', असा विश्वास दलाई लामांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Dalai Lamaदलाई लामाchinaचीन