शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

भारताने नैतिक शिक्षण आणि तत्वांना धरुन वाटचाल केली, तर चीनदेखील मागोमाग येईल - दलाई लामा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 20:09 IST

भारताने आपल्या तत्वांवर आधारिक नैतिक शिक्षणावर जोर दिला तर चीनदेखील भारताच्या पावलांवर पाऊल ठेवत आपली वाटचाल करेल असं तिबेटीयन धर्मगुरु दलाई लामा यांनी म्हटलं आहे.

ठळक मुद्दे'भारताने आपल्या तत्वांवर आधारिक नैतिक शिक्षणावर जोर दिला तर चीनदेखील भारताच्या पावलांवर पाऊल ठेवत आपली वाटचाल करेल'युद्ध आणि शस्त्रांचा वापर गरजेचा नसून करुणा आणि शिक्षणावर जोर देणं गरजेचं असल्याचं दलाई लामांनी म्हटलं आहे

नवी दिल्ली - भारताने आपल्या तत्वांवर आधारिक नैतिक शिक्षणावर जोर दिला तर चीनदेखील भारताच्या पावलांवर पाऊल ठेवत आपली वाटचाल करेल असं तिबेटीयन धर्मगुरु दलाई लामा यांनी म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी युद्ध आणि शस्त्रांचा वापर गरजेचा नसून करुणा आणि शिक्षणावर जोर देणं गरजेचं असल्याचं सांगितलं. तिबेटवर सध्या राजकीयदृष्या जरी चीनने कब्जा केला असला, तरी एक दिवस तिबेट चीनवर राज्य करेल अशी भविष्यवाणीही दलाई लामा यांनी केली आहे. काही दिवसांपुर्वी दलाई लामांनी तिबेटच्या स्वातंत्र्याची नाही, तर विकासाची अपेक्षा असल्याचं सांगितलं होतं. 

दलाई लामांनी सांगितलं की, 'युद्धासारख्या समस्यांमधून उपाय शोधणं बेईमानी असून ही खूप जुनी पद्धत आहे. करुणा आणि शिक्षणाचा प्रसार झाल्यानंतरच हे जग एक सुंदर ठिकाण बनू शकतं'. भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीची तुलना करताना ते बोलले की, 'शिक्षण आजच्या काळात महत्वाची गोष्ट असून भारतासाठी ही काही नवी गोष्ट नाही. भारतामध्ये अहिंसेचे विचार 1000 वर्ष जुने आहेत'.

'मला असं वाटतं आधुनिक भारत खूप शांततापुर्ण आहे. पाकिस्तानच्या तुलनेत भारतातील स्थिती खूप चांगली आहे. पाकिस्तान एक मुस्लिम देश असून भारतात पाकिस्तानच्या तुलनेत अधिक मुस्लिम राहतात. दोन्ही देशातील मुस्लिम एकच कुराण वाचतात. पण भारतातील मुस्लिम जास्त शांतताप्रिय आहेत. यामुळेच भारतात अनेक वर्षांपासून चालत आलेली अहिंसेची परंपरा अद्याप कायम आहे', असं दलाई लामा म्हणाले आहेत. 

भारतीय परंपरापासून प्रभावित झाल्याचं सांगतना दलाई लामा यांनी युद्ध आणि शस्त्रांच्या वापराने जगात फक्त छोटे युद्ध जिंकले जाऊ शकतात असं म्हटलं आहे. 'शस्त्रांचा वापर करत सत्तेपर्यंत नक्कीच पोहोचता येऊ शकतं, पण मोठ्या शर्यतीत हे कामाला येत नाही', हे सांगायला ते विसरले नाहीत. 

'भारतातील प्राचीन शिक्षापद्दतीमुले मला दृढ इच्छाशक्ती मिळाली. भारतीय संस्कृतीत समाधी आणि मौनची प्रथा तीन हजार वर्ष जुनी आहे. भारतीय संस्कृती वारंवार भावनांवर नियंत्रण आणि मानसिक स्तरावर सुधारणा करण्याबद्दल सांगते', असं दलाई लामा म्हणाले आहेत. 'बौद्ध धर्म अहिंसेचा धर्म आहे. यामध्ये हिंसा, युद्धाला कोणतंही स्थान नाही. भारतीय परंपरा आणि शिक्षणाचा प्रचार केल्यास जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित केली जाऊ शकते', असा विश्वास दलाई लामांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Dalai Lamaदलाई लामाchinaचीन