शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

"हिंदू हिंसक असते तर...", दोन वर्षांनंतर सार्वजनिक व्यासपीठावरून नुपूर शर्मा स्पष्टच बोलल्या? बघा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 20:53 IST

त्यांनी गाझियाबादमधील रामप्रस्थ ग्रीन कॅम्पस येथे आयोजित भागवत कथेदरम्यान, अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले. यावेळी, या देशात सनातनींना संपविण्याचे षडयंत्र रचले गेले, जे आपण अनुभवले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

साधारणपणे दोन वर्षांपूर्वी आपल्या एका वादग्रस्त विधानानंतर, राजकीय पटलावरून जवळपास गायब झालेल्या भाजपच्या माजी नेत्या नुपूर शर्मा यांनी अखेर मौन सोडले आहे. त्यांनी गाझियाबादमधील रामप्रस्थ ग्रीन कॅम्पस येथे आयोजित भागवत कथेदरम्यान, अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले. यावेळी, या देशात सनातनींना संपविण्याचे षडयंत्र रचले गेले, जे आपण अनुभवले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

राहुल गांधींचे नाव न घेता नुपूर म्हणाल्या, "जेव्हा एखाद्या उच्च पदावरी लोक हिंदू हिंसक आहेत, असे बोलतात अथवा सनातना नष्ट करायला हवे, असे इतर काही लोक बोलतात, तेव्हा हे षड्यंत्र समजायला हवे. जर हिंदू हिंसक झाले असते, तर आपल्याच देशात एका हिंदू मुलीला एवढ्या सुरक्षा व्यवस्थेत रहावे लागले नसते. ते काही बोलले, तर 'वाह-वाह' आणि मी काही बोलले तर 'सिर तन से जुदा', असे चालणार नाही. आपला देश आपल्या संविधानाने चलेल, कुठल्याही धर्माच्या कायद्याने अथवा शरिया कायद्याने चालणार नाही."

तत्पूर्वी, 1 जुलैला लोकसभेमधील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले होते, "भारत हा अहिंसेचा देश आहे, तो घाबरत नाही. आपल्या महापुरुषांनी भीऊ नका आणि कुणाला घाबरू नका, असा संदेश दिला आहे. शिव शंकर म्हणतात, भिऊ नका, घाबरवू नका. तर दुसरीकडे, जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते 24 तास हिंसा-हिंसा-हिंसा... द्वेष-द्वेष-द्वेष... आपण  हिंदू नाहीच. सत्याच्या बाजूने उभे रहायला हवे, असे हिंदू धर्मात स्पष्ट शब्दात लिहिले आहे."

राहुल गांधींच्या या वक्त्यवावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभे राहून हे गंभीर असल्याचे म्हटले होते. पंतप्रधान मोदी म्हणाले होते, संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे गंभीर गोष्ट आहे. यावर पुन्हा राहुल गांधी म्हणाले होते, पंतप्रधान मोदी आणि भाजप म्हणजे, संपूर्ण हिंदू समाज नाही.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीHinduहिंदूlok sabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदी