शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आज निवडणुका झाल्या तर कुणाला मिळेल सत्ता?; जाणून घ्या, देशातील जनतेचा कौल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 21:41 IST

आज निवडणुका झाल्या तर निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, या प्रश्नावर जनतेने कौल दिला

नवी दिल्ली - इंडिया टूडे-सी वोटरनं एकत्र येत मूड ऑफ द नेशन सर्व्हे केला आहे. ज्यात NDA सरकारच्या कामावर देशातील जनतेचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जानेवारी २०२३ रोजी केलेल्या सर्व्हेत एकूण १ लाख ४० हजार ८१७ लोकांनी सहभाग घेतला. त्यात अनेक ज्वलंत प्रश्नावर लोकांनी मते व्यक्त केली. मोदी सरकारच्या एकूण कामगिरीवर किती समाधानी आहात? आज जर निवडणुका झाल्या तर देशात कुणाचं सरकार बनेल? NDA सरकारचं सर्वात मोठं यश आणि अपयश काय आहे. जाणून घेऊया या सर्व्हेत लोकांनी काय मत व्यक्त केलीत. 

NDA सरकारच्या कामावर लोकांनी पसंती व्यक्त केली आहे. ६७ टक्के लोकांनी खूप चांगले, ११ टक्के लोकांनी फक्त चांगले आणि १८ टक्के लोकांनी खराब कामगिरी असल्याचं म्हटलं आहे. लोकांनी कोरोनाच्या लढाईत मोदी सरकारने केलेल्या कामाचं कौतुक केले आहे. २० टक्के लोकांचे म्हणणं आहे की मोदी सरकार कोरोनाच्या लढाईत यशस्वी झाले. तर कलम ३७० हटवणे १४ टक्के, राम मंदिर बांधकाम ११ टक्के आणि जन कल्याण योजनेवर ८ टक्के लोकांनी यशस्वी कामगिरी म्हटली आहे. 

मोदी सरकारचे सर्वात मोठे अपयश?त्याचवेळी सर्वात मोठे अपयश या प्रश्नावर २५ टक्के लोकांनी महागाई सांगितली आहे. १७% बेरोजगारी, ८% कोविड-१९शी संबंधित, ६% लोकांनी आर्थिक विकास सांगितले.

विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसच्या कामावर तुम्ही किती खूश आहात?विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसच्या कार्यपद्धतीबाबतही जनतेला विचारण्यात आले आहे. यामध्ये १९ टक्के लोकांनी खूप चांगले, १५ टक्के चांगले, १९ टक्के सरासरी आणि २५ टक्के वाईट म्हटले आहे.

भारत जोडो यात्रेबद्दल काय मत आहे?भारत जोडो यात्रेबाबतही लोकांनी मते दिली आहेत. २९ टक्के लोकांनी जनतेशी संपर्क साधण्याचा हा चांगला निर्णय असल्याचं म्हटलं आहे. ३७ टक्के लोकांनी पक्ष मजबूत करण्यासाठी ठीक असल्याचं सांगितले. १३ टक्के लोकांनी राहुल गांधींची प्रतिमा सुधारण्यासाठी पावले उचलल्याचे सांगितले. त्याचवेळी ९ टक्के लोकांनी पक्षाला काही फरक पडणार नसल्याचे सांगितले.

आज निवडणुका झाल्या तर निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, या प्रश्नावर जनतेने कौल दिला. भाजपला २८४, काँग्रेसला ६८ आणि इतरांना १९१ जागा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचे झाल्यास, भाजपला ३९ टक्के, काँग्रेसला २२ आणि इतरांना ३९ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस