शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची सत्ता आल्यास ‘सीएए’ लागू करणार नाही, राहुल गांधी यांची आसाममध्ये घाेषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 07:37 IST

Rahul Gandhi in Assam : आसाममध्ये एका प्रचारसभेत राहुल गांधी म्हणाले, आम्ही गळ्यात घातलेल्या रुमालावर ‘सीएए’ लिहिले आहे. त्यावर क्राॅस केलेले आहे. हा कायदा काहीही झाले तरी आम्ही लागू हाेऊ देणार नाही.

गुवाहाटी : केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून (सीएए) आसाममध्ये हाेत असलेल्या विराेधाचा धागा पकडून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी माेदी सरकारला लक्ष्य केले. आसाममध्येकाँग्रेसची सत्ता आल्यास ‘सीएए’ कायदा लागू करणार नसल्याचे जाहीर केले.आसाममध्ये मार्च- एप्रिलमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. त्यादृष्टीने आसामच्या नागरिकांसाठी कळीचा मुद्दा असलेल्या विषयाला राहुल गांधी यांनी हात घातला. आसाममध्ये एका प्रचारसभेत राहुल गांधी म्हणाले, आम्ही गळ्यात घातलेल्या रुमालावर ‘सीएए’ लिहिले आहे. त्यावर क्राॅस केलेले आहे. हा कायदा काहीही झाले तरी आम्ही लागू हाेऊ देणार नाही. ‘हम दाे, हमारे दाे’वाल्यांनी हे नीट ऐकून घ्यावे, असा इशारा त्यांनी दिला. आसाममधील चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांनाही किमान भत्ता वाढवून देण्याचेही आश्वासन दिले. गुजरातमधील व्यापाऱ्यांकडून हा पैसा येईल. कारण मळ्यांची मालकी त्यांच्याकडे आहे, असे राहुल गांधी म्हणाले. आसामला आसामचाच मुख्यमंत्री हवा असल्याचेही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. याशिवाय आसाम कराराचेही काटेकाेरपणे पालन करू, असेही राहुल गांधी म्हणाले.  (वृत्तसंस्था)

‘सीएएची अंमलबजावणी केरळात नाही’- नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याची (सीएए) अंमलबजावणी केरळ करणार नाही, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी थिरूवनंतपुरम येथे केला. - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोविड-१९ लसीकरण प्रक्रिया पूर्ण झाली की सीएएची अंमलबजावणी केली जाईल, असे विधान केल्यावर विजयन यांनी माकपच्या राज्यपातळीवरील दौऱ्याचे उद्घाटन करताना म्हटले की, “आम्ही सीएएबद्दलची भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. आमचे सरकार सीएएसारखा कायदा राबवू देणार नाही.” - गुरुवारी शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या सभेत बोलताना म्हटले होते की, देशात काेरोनाचा फैलाव झाल्यामुळे सीएएची अंमलबजावणी स्थगित केली होती. कोविड-१९ लसीकरण प्रक्रिया पूर्ण होताच सीएएअंतर्गत नागरिकत्व बहाल करण्यास सुरुवात होईल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAssamआसामcongressकाँग्रेस