निवडणूक आयोगाने देशभरात एसआयआर ची मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने एसआयआर विरोधात मोहीम सुरू केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज बोनगाव येथे एसआयआरचा निषेध करण्यासाठी एक रॅली काढली. त्यानंतर जमावाला संबोधित करताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी भाजपा आव्हान दिले.
'जर भाजपने बंगालमध्ये आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर ते संपूर्ण भारतात भाजपाचा पाया हादरवून टाकतील, असे आव्हान बॅनर्जी यांनी दिले. भाजप आम्हाला राजकीयदृष्ट्या पराभूत करू शकत नाही. भाजप शासित राज्यांमध्ये एसआयआर लागू करण्याचा अर्थ केंद्र सरकारने तेथे घुसखोरांची उपस्थिती मान्य केली आहे का असा सवाल त्यांनी केला.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, एसआयआर नंतर मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक आयोग आणि भाजपने काय केले आहे हे लोकांना कळेल. जर एसआयआर दोन ते तीन वर्षांत झाला तर आम्ही शक्य तितक्या सर्व साधनांनी प्रक्रियेला पाठिंबा देऊ. बिहारमधील निवडणूक निकाल पहा. एसआयआरचा परिणाम असा आहे की विरोधी पक्ष भाजपचा खेळ ओळखू शकले नाहीत. जर भाजपने बंगालमध्ये माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर मी संपूर्ण भारतात त्यांचा पाया हादरवून टाकेन, असे आव्हान ममता बॅनर्जी यांनी दिले.
"जर मतदार यादीतून नाव काढले तर केंद्र सरकारही काढून टाकले जाईल"
"मला बांगलादेश एक देश म्हणून आवडतो कारण आमची भाषा एकच आहे. मी बीरभूमची आहे; एक दिवस ते मला बांगलादेशी म्हणतील. काळजी करू नका, पंतप्रधान मोदींना २०२४ च्या यादीत मतदान झाले आहे. जर तुमचे नाव काढून टाकले तर केंद्र सरकारही काढून टाकले जाईल. मला विचारायचे आहे की, SIR बद्दल इतकी घाई का आहे?, असा टोलाही त्यांनी लगावला.
Web Summary : Mamata Banerjee rallied against SIR in Bengal, challenging BJP. She warned that attacks in Bengal would shake BJP's foundation nationwide. She questioned the urgency of SIR and its impact on voter lists, suggesting potential manipulation. Banerjee affirmed support if SIR is conducted fairly.
Web Summary : ममता बनर्जी ने बंगाल में एसआईआर के खिलाफ रैली की और भाजपा को चुनौती दी। उन्होंने चेतावनी दी कि बंगाल में हमले होने पर भाजपा की नींव पूरे देश में हिल जाएगी। उन्होंने एसआईआर की तात्कालिकता और मतदाता सूचियों पर इसके प्रभाव पर सवाल उठाया, संभावित हेरफेर का सुझाव दिया। बनर्जी ने निष्पक्ष एसआईआर का समर्थन किया।