शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
3
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
4
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
5
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
6
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
7
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
8
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
10
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
11
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
12
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
13
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
14
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
15
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
16
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
17
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
18
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
19
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
20
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”

ऑगस्टअखेरीस तिसरी लाट? ‘आयसीएमआर’चे प्रा. पांडा यांचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 07:39 IST

भारतात ऑगस्टच्या अखेरीस तिसरी लाट येण्याची शक्यता असून, दररोज एक लाख नवे रुग्ण आढळतील असा अंदाज प्रा. समीरण पांडा यांनी व्यक्त केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरलेली नसतानाच तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ‘आयसीएमआर’च्या वरिष्ठ शास्त्रज्ञांनी तिसऱ्या लाटेबाबत अंदाज वर्तविला आहे. भारतात ऑगस्टच्या अखेरीस तिसरी लाट येण्याची शक्यता असून, दररोज एक लाख नवे रुग्ण आढळतील असा अंदाज प्रा. समीरण पांडा यांनी व्यक्त केला आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झाली होती. मे महिन्यात दररोज चार लाख नवे रुग्ण आढळत होते. ही लाट ओसरू लागली आहे. मात्र, तज्ज्ञांकडून अनेक दिवसांपासून तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात येत आहे. प्रा. पांडा यांनी याबाबत सांगितले, की तिसरी लाट अटळ आहे. 

ऑगस्टच्या अखेरीस तिसरी लाट येऊ शकते. विषाणूमध्ये आणखी बदल न झाल्यास पहिल्या लाटेएवढी तीव्रता राहू शकते. मात्र, बदल झाल्यास तिसरी लाट अतिशय धाेकादायक ठरेल, असे प्रा. पांडा म्हणाले. ‘आयसीएमआर’ आणि लंडनच्या इम्पिरियल काॅलेजने विकसित केलेल्या गणितीय माॅडेलवर आधारित हा अंदाज आहे. लसीकरणाची संथ गती आणि निर्बंध शिथिल केल्यामुळे तिसरी लाट येईल. मात्र, दुसऱ्या लाटेएवढी ती तीव्र नसेल, असे प्रा. पांडा यांनी सांगितले.

तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणाची गती वाढविणे आवश्यक आहे. तसेच मोठ्या संख्येने लोकांनी गोळा होणे, तसेच मास्कचा वापर हे संसर्गाला प्रतिबंध घालू शकतात. निर्बंध शिथिल करण्यासाठी पॉझिटिव्हिटी दर दिशादर्शक ठरू शकेल, असे प्रा. पांडा म्हणाले. मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्यास तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी होईल. यासंदर्भात ‘आयसीएमआर’ने केलेल्या एका संशोधनाकडेही प्रा. पांडा यांनी लक्ष वेधले.

३८,०७९ जणांना कोरोनाचा  संसर्ग; ५६० जण मृत्युमुखी

३८,०७९ नवे कोरोना रुग्ण देशात सापडले. त्याबरोबर एकूण बाधितांचा आकडा ३,१०,६४,९०८ झाला. तसेच ५६० जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा आता ४,१३,०९१ झाला आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या घसरून ४,२४,०२५ झाली असून ती एकूण बाधितांच्या तुलनेत १.३६ टक्के आहे. कोरोनातून बरे होण्याचे राष्ट्रीय प्रमाण ९७.३१ टक्के आहे. मागील २४ तासांत सक्रिय रुग्णांची संख्या ६,३९७ ने कमी झाली आहे. जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, ५६० मृत्यूत सर्वाधिक १६७ मृत्यू महाराष्ट्रातील आहे. त्याखालोखाल केरळात १३० जण मरण पावले. देशातील मृतांची एकूण संख्या ४,१३,०९१ असून त्यात महाराष्ट्रातील संख्या १,२६,७२७, तर कर्नाटकातील संख्या ३६,०७९ आहे. तामिळनाडूत ३३,६५२, दिल्लीत २५,०२३ आणि उत्तर प्रदेशात २२,७११ जण मरण पावले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या