शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

ऑगस्टअखेरीस तिसरी लाट? ‘आयसीएमआर’चे प्रा. पांडा यांचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 07:39 IST

भारतात ऑगस्टच्या अखेरीस तिसरी लाट येण्याची शक्यता असून, दररोज एक लाख नवे रुग्ण आढळतील असा अंदाज प्रा. समीरण पांडा यांनी व्यक्त केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरलेली नसतानाच तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ‘आयसीएमआर’च्या वरिष्ठ शास्त्रज्ञांनी तिसऱ्या लाटेबाबत अंदाज वर्तविला आहे. भारतात ऑगस्टच्या अखेरीस तिसरी लाट येण्याची शक्यता असून, दररोज एक लाख नवे रुग्ण आढळतील असा अंदाज प्रा. समीरण पांडा यांनी व्यक्त केला आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झाली होती. मे महिन्यात दररोज चार लाख नवे रुग्ण आढळत होते. ही लाट ओसरू लागली आहे. मात्र, तज्ज्ञांकडून अनेक दिवसांपासून तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात येत आहे. प्रा. पांडा यांनी याबाबत सांगितले, की तिसरी लाट अटळ आहे. 

ऑगस्टच्या अखेरीस तिसरी लाट येऊ शकते. विषाणूमध्ये आणखी बदल न झाल्यास पहिल्या लाटेएवढी तीव्रता राहू शकते. मात्र, बदल झाल्यास तिसरी लाट अतिशय धाेकादायक ठरेल, असे प्रा. पांडा म्हणाले. ‘आयसीएमआर’ आणि लंडनच्या इम्पिरियल काॅलेजने विकसित केलेल्या गणितीय माॅडेलवर आधारित हा अंदाज आहे. लसीकरणाची संथ गती आणि निर्बंध शिथिल केल्यामुळे तिसरी लाट येईल. मात्र, दुसऱ्या लाटेएवढी ती तीव्र नसेल, असे प्रा. पांडा यांनी सांगितले.

तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणाची गती वाढविणे आवश्यक आहे. तसेच मोठ्या संख्येने लोकांनी गोळा होणे, तसेच मास्कचा वापर हे संसर्गाला प्रतिबंध घालू शकतात. निर्बंध शिथिल करण्यासाठी पॉझिटिव्हिटी दर दिशादर्शक ठरू शकेल, असे प्रा. पांडा म्हणाले. मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्यास तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी होईल. यासंदर्भात ‘आयसीएमआर’ने केलेल्या एका संशोधनाकडेही प्रा. पांडा यांनी लक्ष वेधले.

३८,०७९ जणांना कोरोनाचा  संसर्ग; ५६० जण मृत्युमुखी

३८,०७९ नवे कोरोना रुग्ण देशात सापडले. त्याबरोबर एकूण बाधितांचा आकडा ३,१०,६४,९०८ झाला. तसेच ५६० जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा आता ४,१३,०९१ झाला आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या घसरून ४,२४,०२५ झाली असून ती एकूण बाधितांच्या तुलनेत १.३६ टक्के आहे. कोरोनातून बरे होण्याचे राष्ट्रीय प्रमाण ९७.३१ टक्के आहे. मागील २४ तासांत सक्रिय रुग्णांची संख्या ६,३९७ ने कमी झाली आहे. जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, ५६० मृत्यूत सर्वाधिक १६७ मृत्यू महाराष्ट्रातील आहे. त्याखालोखाल केरळात १३० जण मरण पावले. देशातील मृतांची एकूण संख्या ४,१३,०९१ असून त्यात महाराष्ट्रातील संख्या १,२६,७२७, तर कर्नाटकातील संख्या ३६,०७९ आहे. तामिळनाडूत ३३,६५२, दिल्लीत २५,०२३ आणि उत्तर प्रदेशात २२,७११ जण मरण पावले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या