शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

ऑगस्टअखेरीस तिसरी लाट? ‘आयसीएमआर’चे प्रा. पांडा यांचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 07:39 IST

भारतात ऑगस्टच्या अखेरीस तिसरी लाट येण्याची शक्यता असून, दररोज एक लाख नवे रुग्ण आढळतील असा अंदाज प्रा. समीरण पांडा यांनी व्यक्त केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरलेली नसतानाच तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ‘आयसीएमआर’च्या वरिष्ठ शास्त्रज्ञांनी तिसऱ्या लाटेबाबत अंदाज वर्तविला आहे. भारतात ऑगस्टच्या अखेरीस तिसरी लाट येण्याची शक्यता असून, दररोज एक लाख नवे रुग्ण आढळतील असा अंदाज प्रा. समीरण पांडा यांनी व्यक्त केला आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झाली होती. मे महिन्यात दररोज चार लाख नवे रुग्ण आढळत होते. ही लाट ओसरू लागली आहे. मात्र, तज्ज्ञांकडून अनेक दिवसांपासून तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात येत आहे. प्रा. पांडा यांनी याबाबत सांगितले, की तिसरी लाट अटळ आहे. 

ऑगस्टच्या अखेरीस तिसरी लाट येऊ शकते. विषाणूमध्ये आणखी बदल न झाल्यास पहिल्या लाटेएवढी तीव्रता राहू शकते. मात्र, बदल झाल्यास तिसरी लाट अतिशय धाेकादायक ठरेल, असे प्रा. पांडा म्हणाले. ‘आयसीएमआर’ आणि लंडनच्या इम्पिरियल काॅलेजने विकसित केलेल्या गणितीय माॅडेलवर आधारित हा अंदाज आहे. लसीकरणाची संथ गती आणि निर्बंध शिथिल केल्यामुळे तिसरी लाट येईल. मात्र, दुसऱ्या लाटेएवढी ती तीव्र नसेल, असे प्रा. पांडा यांनी सांगितले.

तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणाची गती वाढविणे आवश्यक आहे. तसेच मोठ्या संख्येने लोकांनी गोळा होणे, तसेच मास्कचा वापर हे संसर्गाला प्रतिबंध घालू शकतात. निर्बंध शिथिल करण्यासाठी पॉझिटिव्हिटी दर दिशादर्शक ठरू शकेल, असे प्रा. पांडा म्हणाले. मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्यास तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी होईल. यासंदर्भात ‘आयसीएमआर’ने केलेल्या एका संशोधनाकडेही प्रा. पांडा यांनी लक्ष वेधले.

३८,०७९ जणांना कोरोनाचा  संसर्ग; ५६० जण मृत्युमुखी

३८,०७९ नवे कोरोना रुग्ण देशात सापडले. त्याबरोबर एकूण बाधितांचा आकडा ३,१०,६४,९०८ झाला. तसेच ५६० जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा आता ४,१३,०९१ झाला आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या घसरून ४,२४,०२५ झाली असून ती एकूण बाधितांच्या तुलनेत १.३६ टक्के आहे. कोरोनातून बरे होण्याचे राष्ट्रीय प्रमाण ९७.३१ टक्के आहे. मागील २४ तासांत सक्रिय रुग्णांची संख्या ६,३९७ ने कमी झाली आहे. जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, ५६० मृत्यूत सर्वाधिक १६७ मृत्यू महाराष्ट्रातील आहे. त्याखालोखाल केरळात १३० जण मरण पावले. देशातील मृतांची एकूण संख्या ४,१३,०९१ असून त्यात महाराष्ट्रातील संख्या १,२६,७२७, तर कर्नाटकातील संख्या ३६,०७९ आहे. तामिळनाडूत ३३,६५२, दिल्लीत २५,०२३ आणि उत्तर प्रदेशात २२,७११ जण मरण पावले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या