शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

ऑगस्टअखेरीस तिसरी लाट? ‘आयसीएमआर’चे प्रा. पांडा यांचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 07:39 IST

भारतात ऑगस्टच्या अखेरीस तिसरी लाट येण्याची शक्यता असून, दररोज एक लाख नवे रुग्ण आढळतील असा अंदाज प्रा. समीरण पांडा यांनी व्यक्त केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरलेली नसतानाच तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ‘आयसीएमआर’च्या वरिष्ठ शास्त्रज्ञांनी तिसऱ्या लाटेबाबत अंदाज वर्तविला आहे. भारतात ऑगस्टच्या अखेरीस तिसरी लाट येण्याची शक्यता असून, दररोज एक लाख नवे रुग्ण आढळतील असा अंदाज प्रा. समीरण पांडा यांनी व्यक्त केला आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झाली होती. मे महिन्यात दररोज चार लाख नवे रुग्ण आढळत होते. ही लाट ओसरू लागली आहे. मात्र, तज्ज्ञांकडून अनेक दिवसांपासून तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात येत आहे. प्रा. पांडा यांनी याबाबत सांगितले, की तिसरी लाट अटळ आहे. 

ऑगस्टच्या अखेरीस तिसरी लाट येऊ शकते. विषाणूमध्ये आणखी बदल न झाल्यास पहिल्या लाटेएवढी तीव्रता राहू शकते. मात्र, बदल झाल्यास तिसरी लाट अतिशय धाेकादायक ठरेल, असे प्रा. पांडा म्हणाले. ‘आयसीएमआर’ आणि लंडनच्या इम्पिरियल काॅलेजने विकसित केलेल्या गणितीय माॅडेलवर आधारित हा अंदाज आहे. लसीकरणाची संथ गती आणि निर्बंध शिथिल केल्यामुळे तिसरी लाट येईल. मात्र, दुसऱ्या लाटेएवढी ती तीव्र नसेल, असे प्रा. पांडा यांनी सांगितले.

तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणाची गती वाढविणे आवश्यक आहे. तसेच मोठ्या संख्येने लोकांनी गोळा होणे, तसेच मास्कचा वापर हे संसर्गाला प्रतिबंध घालू शकतात. निर्बंध शिथिल करण्यासाठी पॉझिटिव्हिटी दर दिशादर्शक ठरू शकेल, असे प्रा. पांडा म्हणाले. मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्यास तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी होईल. यासंदर्भात ‘आयसीएमआर’ने केलेल्या एका संशोधनाकडेही प्रा. पांडा यांनी लक्ष वेधले.

३८,०७९ जणांना कोरोनाचा  संसर्ग; ५६० जण मृत्युमुखी

३८,०७९ नवे कोरोना रुग्ण देशात सापडले. त्याबरोबर एकूण बाधितांचा आकडा ३,१०,६४,९०८ झाला. तसेच ५६० जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा आता ४,१३,०९१ झाला आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या घसरून ४,२४,०२५ झाली असून ती एकूण बाधितांच्या तुलनेत १.३६ टक्के आहे. कोरोनातून बरे होण्याचे राष्ट्रीय प्रमाण ९७.३१ टक्के आहे. मागील २४ तासांत सक्रिय रुग्णांची संख्या ६,३९७ ने कमी झाली आहे. जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, ५६० मृत्यूत सर्वाधिक १६७ मृत्यू महाराष्ट्रातील आहे. त्याखालोखाल केरळात १३० जण मरण पावले. देशातील मृतांची एकूण संख्या ४,१३,०९१ असून त्यात महाराष्ट्रातील संख्या १,२६,७२७, तर कर्नाटकातील संख्या ३६,०७९ आहे. तामिळनाडूत ३३,६५२, दिल्लीत २५,०२३ आणि उत्तर प्रदेशात २२,७११ जण मरण पावले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या