शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 22:08 IST

PM Modi Patiala Rally Speech: "काँग्रेसने सत्तेसाठी देशाचे विभाजन केले. फाळणीही अशा प्रकारे केली की, करतारपूर साहिब पाकिस्तानात गेले."

PM Modi Patiala Rally : लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे, त्यामुळे प्रचाराचा जोरही तेवढाच वाढला आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमध्ये आयोजित एका जाहीर सभेतून काँग्रेसवर जोरदार हल्लाबो केला. "बांगलादेशविरोधात युद्ध झाले, तेव्हा 90 हजारांहून अधिक पाकिस्तानी सैनिक आपल्या ताब्यात होते. त्यावेळी मी असतो, तर करतारपूर साहिब भारताला दिल्याशिवाय पाकिस्तानी सैनिकांना सोडले नसते," असे मोदी यावेळी म्हणाले.

पटियाला येथे आयोजित जाहीर सभेत मोदी म्हणतात, "आमच्या सरकारने अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना सुखरुप परत आणले. काँग्रेसने सत्तेसाठी देशाचे विभाजन केले. फाळणीही अशा प्रकारे केली की, करतारपूर साहिब पाकिस्तानात गेले. 1971 च्या युद्धानंतर पाकिस्तानचे 90 हजारांहून अधिक सैनिक भारताच्या ताब्यात होते. त्यावेळच्या सरकारला हवे असते तर करतारपूर साहिब परत घेता आले असते, पण तसे झाले नाही. त्यावेळी मी असतो, तर आधी करतारपूर साहिब परत घेतले असते. 10 वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या आमच्या सरकारमुळे करतारपूर कॉरिडॉरचा मार्ग मोकळा झाला. त्यापूर्वी दूरवरुनच दर्शन करावे लागत होते."

गांधी कुटुंबावर निशाणा साधत मोदी पुढे म्हणाले, "1962 च्या युद्धात चीनच्या हातून भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. ज्यांच्यामुळे पराभवाला सामोरं जावं लागलं, ते लोक आता या पराभवासाठी लष्कराला जबाबदार धरतात. काँग्रेसला देश प्रिय नसून त्याची सत्ता प्रिय आहे आणि त्यासाठी ते काहीही करू शकतात." शेतकरी प्रश्नावर बोलताना पीएम मोदी म्हणतात, "इंडी आघाडीने शेतकऱ्यांना आश्वासने दिली, पण ती पूर्ण करण्याची तसदी घेतली नाही. आम्ही एमएसपीमध्ये अडीच पट वाढ केली. आमचे सरकार नैसर्गिक शेतीवर भर देत आहे. जे अण्णा हजारेंचा विश्वासघात करू शकतात, ते ना पंजाबची काळजी घेऊ शकतात आणि ना तुमच्या मुलांना काही देऊ शकतात" अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसAAPआप