शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
5
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
6
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
7
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
8
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
9
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
12
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
13
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
14
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
15
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
16
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
17
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
18
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
19
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
20
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...

RPN Singh, UP Election 2022: "मी ३२ वर्षे काँग्रेसमध्ये काम केलं, पण..."; भाजपा प्रवेशानंतर आरपीएन सिंह यांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 16:07 IST

आरपीएन सिंह हे पूर्वांचलमधून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा

RPN Singh, UP Election 2022: उत्तर प्रदेशमध्ये सध्या निवडणुकांचा माहोल आहे. उत्तर प्रदेशात भाजपा आणि सपा या दोन राजकीय पक्षांमध्ये महत्त्वाची लढत पाहायला मिळणार असल्याची सर्वत्र चर्चा आहे. काँग्रेसदेखील उत्तर प्रदेशात आपला जोर लावत आहे. प्रियांका गांधी स्वत: या निवडणुकीत उत्तर प्रदेशकडे लक्ष ठेवून आहेत. पण अशा परिस्थितीत सोमवारी काँग्रेसला मोठा धक्का बसला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. आरपीएन सिंह यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला होता. त्यानंतर त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.

काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचं नक्की कारण काय? असा प्रश्न त्यांनी भाजप प्रवेशानंतर पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, "मी गेली ३२ वर्षे एकाच पक्षात म्हणजेच काँग्रेसमध्ये कार्यरत आहे. पण सध्याची काँग्रेस आणि माझ्या वेळची काँग्रेस यात फरक आहे. आताचा काँग्रेस पक्ष पूर्वीसारखा राहिलेला नाही. त्यामुळे काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपामध्ये मी सामान्य कार्यकर्त्यासारखाच असेन. पंतप्रधान मोदी यांचे भारताच्या विकासाचं स्वप्न पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल."

आरपीएन सिंह हे, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाच्या तिकिटावर पडरौना येथून स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात निवडणूक लढवू शकतात. याच मुद्द्यावर पत्रकारांनी सवाल केला की तुम्ही आणि तुमची पत्नी दोघेही यंदाची उत्तर प्रदेशची निवडणूक लढवणार आहात अशी चर्चा आहे, त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? त्यावर सिंह म्हणाले की सध्या तरी मी एवढं नक्कीच सांगेन की मी एकटाच राजकारणात आहे. मला माझा पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी मी पार पाडेन.

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर काही दिवसातच आरपीएन सिंह हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देतील अशी चर्चा होती. ते यूपीए सरकारच्या काळात केंद्रीय मंत्री होते. तसेच उत्तर प्रदेशातील पूर्वांचल पट्ट्यातील पडरौना येथे वास्तव्यास असल्याने त्यांना काँग्रेसने स्टार प्रचारकही बनवलं होतं. पण त्यांनी आज अचानक काँग्रेसमधून राजीनामा देत भाजपात प्रवेश केला आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Electionनिवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा