शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

मोदीविरोधी नाही, प्रामाणिकपणाची किंमत चुकवतोय पण गरज असेल तेव्हा सत्य बोलणारच - प्रकाश राज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 12:41 IST

मला मोदीविरोधी बोलण्याची हिम्मत कशी होते...  मी मोदीविरोधी नाहीये... ते बहुमताद्वारे पंतप्रधान म्हणून निवडून आले आहेत...मी प्रामाणिकपणाची किंमत चुकवतोय

ठळक मुद्देदेशाचा जबाबदार नागरीक म्हणून पंतप्रधानांच्या मौनामुळे मला दुःख झालं आणि त्याचं मौन मला त्रस्त करत आहे असं मी म्हणालो... यासाठी मला मोदीविरोधी बोलण्याची हिम्मत कशी होतेमी प्रामाणिकपणाची किंमत चुकवतोय....ट्रोल करणा-यांमुळे मला काही फरक पडणार नाही.... परिणाम काहीही झाले तरी चालेल पण जेव्हा गरज असेल तेव्हा मी सत्य बोलणारच

बंगळुरू - पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्यामुळे दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज चांगलेच चर्चेत आले आहेत. नरेंद्र मोदींवर टिप्पणी केल्याप्रकरणी  त्यांच्याविरोधात एका वकिलाने या प्रकरणी लखनऊ कोर्टात तक्रार देखील केली आहे. प्रकाश राज यांनी खडेबोल सुनावल्यापासून त्यांना सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. पण त्याचा कोणताही परिणाम त्यांच्यावर झालेला दिसत नाही. मी मोदीविरोधी नाहीये. पण जेव्हा गरज असेल तेव्हा मी सत्य बोलणारच, तो माझा हक्क आहे असं रोखठोक वक्तव्य त्यांनी ते द हिंदूला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये केलं आहे. चुकीच्या गोष्टींबाबत बोलल्यास मला मोदीविरोधी म्हणण्याची हिम्मत कशी होऊ शकते असा सवालही त्यांनी विचारला आहे. 

'ज्या लोकांनी गौरी लंकेश यांची हत्या केली ते अद्याप पकडले गेले नाही. त्यांना पकडणे, शिक्षा करणे हा वेगळा मुद्दा आहे, मात्र देशात हजारो लोक असे आहे, जे सोशल मीडियावर आनंदोत्सव साजरा करत आहे. आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे माहित आहे हे कोण लोकं आहेत आणि ते कोणत्या विचारधारेचे आहेत. मृत्यूवर आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांपैकी काही असेही आहेत ज्यांना आमचे पंतप्रधान मोदी फॉलो करतात. मला याच गोष्टीची चिंता आहे, आपला देश कोणत्या दिशेने चालला आहे?' पंतप्रधान त्यांच्या फॉलोअर्सच्या प्रतिक्रियांवर मौन बाळगून आहेत. त्यांची चुप्पी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे? ते काय माझ्यापेक्षाही मोठे कलाकार होण्याचा प्रयत्न करत आहेत? त्यांचे मौन मला त्रस्त करत आहे. त्यांनी साधलेले मौन हे त्यांच्या फॉलोअर्सना मुक समर्थनाचा प्रयत्न आहे का?'असं प्रकाश राज म्हणाले होते. 

देशाचा जबाबदार नागरीक म्हणून पंतप्रधानांच्या मौनामुळे मला दुःख झालं आणि त्याचं मौन मला त्रस्त करत आहे असं मी म्हणालो... यासाठी मला मोदीविरोधी बोलण्याची हिम्मत कशी होते...  मी मोदीविरोधी नाहीये... ते बहुमताद्वारे पंतप्रधान म्हणून निवडून आले आहेत... काही मुद्यांवर माझे त्यांच्याशी मतभेद आहेत.... मी प्रामाणिकपणाची किंमत चुकवतोय....ट्रोल करणा-यांमुळे मला काही फरक पडणार नाही.... परिणाम काहीही झाले तरी चालेल पण जेव्हा गरज असेल तेव्हा मी सत्य बोलणारच असं प्रकाश राज म्हणाले आहेत. 

(फोटो सौजन्य - The Hindu)

टॅग्स :Prakash Rajप्रकाश राजNarendra Modiनरेंद्र मोदी