शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

मोदीविरोधी नाही, प्रामाणिकपणाची किंमत चुकवतोय पण गरज असेल तेव्हा सत्य बोलणारच - प्रकाश राज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 12:41 IST

मला मोदीविरोधी बोलण्याची हिम्मत कशी होते...  मी मोदीविरोधी नाहीये... ते बहुमताद्वारे पंतप्रधान म्हणून निवडून आले आहेत...मी प्रामाणिकपणाची किंमत चुकवतोय

ठळक मुद्देदेशाचा जबाबदार नागरीक म्हणून पंतप्रधानांच्या मौनामुळे मला दुःख झालं आणि त्याचं मौन मला त्रस्त करत आहे असं मी म्हणालो... यासाठी मला मोदीविरोधी बोलण्याची हिम्मत कशी होतेमी प्रामाणिकपणाची किंमत चुकवतोय....ट्रोल करणा-यांमुळे मला काही फरक पडणार नाही.... परिणाम काहीही झाले तरी चालेल पण जेव्हा गरज असेल तेव्हा मी सत्य बोलणारच

बंगळुरू - पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्यामुळे दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज चांगलेच चर्चेत आले आहेत. नरेंद्र मोदींवर टिप्पणी केल्याप्रकरणी  त्यांच्याविरोधात एका वकिलाने या प्रकरणी लखनऊ कोर्टात तक्रार देखील केली आहे. प्रकाश राज यांनी खडेबोल सुनावल्यापासून त्यांना सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. पण त्याचा कोणताही परिणाम त्यांच्यावर झालेला दिसत नाही. मी मोदीविरोधी नाहीये. पण जेव्हा गरज असेल तेव्हा मी सत्य बोलणारच, तो माझा हक्क आहे असं रोखठोक वक्तव्य त्यांनी ते द हिंदूला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये केलं आहे. चुकीच्या गोष्टींबाबत बोलल्यास मला मोदीविरोधी म्हणण्याची हिम्मत कशी होऊ शकते असा सवालही त्यांनी विचारला आहे. 

'ज्या लोकांनी गौरी लंकेश यांची हत्या केली ते अद्याप पकडले गेले नाही. त्यांना पकडणे, शिक्षा करणे हा वेगळा मुद्दा आहे, मात्र देशात हजारो लोक असे आहे, जे सोशल मीडियावर आनंदोत्सव साजरा करत आहे. आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे माहित आहे हे कोण लोकं आहेत आणि ते कोणत्या विचारधारेचे आहेत. मृत्यूवर आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांपैकी काही असेही आहेत ज्यांना आमचे पंतप्रधान मोदी फॉलो करतात. मला याच गोष्टीची चिंता आहे, आपला देश कोणत्या दिशेने चालला आहे?' पंतप्रधान त्यांच्या फॉलोअर्सच्या प्रतिक्रियांवर मौन बाळगून आहेत. त्यांची चुप्पी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे? ते काय माझ्यापेक्षाही मोठे कलाकार होण्याचा प्रयत्न करत आहेत? त्यांचे मौन मला त्रस्त करत आहे. त्यांनी साधलेले मौन हे त्यांच्या फॉलोअर्सना मुक समर्थनाचा प्रयत्न आहे का?'असं प्रकाश राज म्हणाले होते. 

देशाचा जबाबदार नागरीक म्हणून पंतप्रधानांच्या मौनामुळे मला दुःख झालं आणि त्याचं मौन मला त्रस्त करत आहे असं मी म्हणालो... यासाठी मला मोदीविरोधी बोलण्याची हिम्मत कशी होते...  मी मोदीविरोधी नाहीये... ते बहुमताद्वारे पंतप्रधान म्हणून निवडून आले आहेत... काही मुद्यांवर माझे त्यांच्याशी मतभेद आहेत.... मी प्रामाणिकपणाची किंमत चुकवतोय....ट्रोल करणा-यांमुळे मला काही फरक पडणार नाही.... परिणाम काहीही झाले तरी चालेल पण जेव्हा गरज असेल तेव्हा मी सत्य बोलणारच असं प्रकाश राज म्हणाले आहेत. 

(फोटो सौजन्य - The Hindu)

टॅग्स :Prakash Rajप्रकाश राजNarendra Modiनरेंद्र मोदी