शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मी माहेरी (पाकमध्ये) जाणार नाही म्हणजे नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 05:51 IST

सीमा हैदर; भारताने तुरुंगात टाकले तर तिथे राहीन

नॉयडा : भारतीय अधिकाऱ्यांनी मला तुरुंगात टाकले तर मी तिथे राहीन. मात्र, कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानात परत जाणार नाही, असे भारतात अवैधरित्या प्रवेश केलेल्या सीमा हैदरने शुक्रवारी पत्रकारांना सांगितले. ती म्हणाली की, उत्तर  प्रदेश दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) बड्या अधिकाऱ्यांनी माझी दोन दिवस चौकशी केली. त्यांना माझ्यावर संशय होता. पण मी जीवनकहाणी तसेच भारतात कशा रितीने आले हे सारे न लपवता त्यांना सांगितले आहे.

सीमा हैदर म्हणाली की, मला भारताचा व्हिसा मिळत नव्हता. त्यामुळे नाईलाजाने खरी ओळख लपवून मला नेपाळमार्गे भारतात यावे लागले. मी हे सारे धाडस फक्त प्रेमासाठी केले आहे. तिने सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून मी सचिन मीना याला आपला पती मानत असल्याने करवा चौथचे व्रत केले होते. पाकमध्ये असतानाही मी कुंकू लावत असे. (वृत्तसंस्था)

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्षnअवैध विदेशी नागरिकाची ओळख पटविणे तसेच त्याला मायदेशी परत पाठविणे या गोष्टींचा निर्णय  इमिग्रेशन विभागातर्फे घेण्यात येतो. त्याकडे सर्वांचे लक्ष आहे. nमायदेशात पाठविण्यासाठी १५ ते ६० दिवसांचा कालावधी लागू शकतो.

होऊ शकतो पाच ते सात वर्षांचा कारावासउत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने सीमा हैदरची दोन दिवस चौकशी केली. तिच्याविरोधात कोणते पुरावे मिळाले हे अद्याप पोलिसांनी उघड केलेले नाही. भारतात अवैध प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला पाच ते सात वर्षांचा कारावास होऊ शकतो. जर सीमा हैदर पाकिस्तानात परत गेली तर तिथे तिच्यावर कडक कारवाई होऊ शकते.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतjailतुरुंगHome Ministryगृह मंत्रालय