शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

'मर जाऊंगा लेकीन माफी नही मांगुंगा', मोदींच्या असिस्टंटनेच माफी मागावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 13:22 IST

राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी भाजपा नेत्यांनी संसदेत केली होती.

मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना मी चूक केली नाही, मी माफी मागणार नाही असे म्हटले. आपल्या आक्रमक भाषणात बोलताना, राहुल यांनी मोदी आणि अमित शहांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. नोटाबंदी, देशातील महिलांवरील अत्याचाराच्या मुद्द्यांवरुन राहुल यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. तसेच, मै मर जाऊंगा लेकीन माफी नही मांगुंगा, असे राहुल यांनी भाजपा नेत्यांना प्रत्युत्तर दिलं. 

राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी भाजपा नेत्यांनी संसदेत केली होती. मात्र, मी कदापी माफी मागणार नसल्याचे राहुल यांनी स्पष्ट केलंय. माझं नाव राहुल सावरकर नसून राहुल गांधी आहे, त्यामुळे मी माफी मागणार नसल्याचं राहुल यांनी म्हटले. तसेच, माफी मागायची असेल तर मोदींचे असिस्टंट असलेल्या अमित शहांनी माफी मागावी, असेही राहुल यांनी म्हटले. दिल्लीच्या रामलीला मैदानावर काँग्रेसकडून मोदी सरकारच्या विरोधात भव्य रॅली काढण्यात आली आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक, महिलांवरील अत्याचार, आर्थिक मंदी आणि अन्य मुद्द्यावरुन काँग्रेस या रॅलीच्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधणार आहे. रामलीला मैदानात आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. देशातील कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते  या रॅलीत सहभागी झाले आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहनसिंग आणि प्रियंका गांधी यांच्यासह अन्य दिग्गज नेते सहभागी झाले आहेत. 

काँग्रेस नेत्या सरचिटणीस प्रियंका गांधी, मनमोहनसिंग यांच्या भाषणानंतर राहुल गांधींनी भाषणाला सुरुवात केली. त्यावेळी, मोदी सरकार हे अदानी आणि अंबानींसाठी काम करत असल्याचा आरोप राहुल यांनी केली. देशाची अर्थव्यवस्था मोदींनी नष्ट केली असून जे काम शत्रुंनी केलं नाही ते मोदींनी केलं आहे, असेही राहुल गांधींनी म्हटले. गेल्या 45 वर्षात सर्वात मोठी बेरोजगारी मोदी सरकारच्या काळात आली आहे, असे म्हणत मोदी आणि अमित शहांवर हल्लाबोल केला. रेप इन इंडिया या वक्तव्यावरुन भाजपा नेत्या आणि मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना माफी मागण्याचे आवाहन केले होते. मात्र, मोदींच्या भाषणाचा संदर्भ देत मी कधीही माफी मागणार नसल्याचे राहुल यांनी म्हटले. मै मर जाऊंगा लेकीन माफी नही मांगुंगा, असे राहुल यांनी म्हटले.  

दरम्यान, रामलीला मैदानात काँग्रेसच्या या रॅलीसाठी भव्य पोस्टर्स लावण्यात आले आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते या भव्य रॅलीला उपस्थित आहेत. तसेच देशाच्या प्रत्येक राज्यातून काँग्रेस कार्यकर्ते या रॅलीत सहभागी आहेत. नागरिकत्व सुधारणा विधेयकाविधेयक आणि महिलांवरील अत्याचार असे अनेक मुद्दे घेऊन काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलंय.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसManmohan Singhमनमोहन सिंग