शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
2
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
3
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
4
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
5
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
6
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
7
“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प
8
हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...
9
श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता..; PM मोदींनी पुन्हा 'तो' मुद्दा काढला
10
भारताला २३,००० कोटी रुपयांचे युरेनियम का विकत आहे कॅनडा? मोठ्या करारामागचे कारण काय?
11
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
12
'ईसीजी' काढणारे स्मार्ट वॉच आले! भारतात 'या' किंमतीला कंपनी लाँच करून बसली...
13
मुस्कान रस्तोगी बनली आई, पण तुरुंगामध्ये जन्मलेल्या मुलांचा सांभाळ कसा केला जातो, कोणत्या सुविधा असतात?
14
हुंड्याला नकार! वराने थेट २१ लाख रुपये लग्न मंडपातच परत केले; पाहुणे बघतच राहिले, वधू भावूक
15
माझ्या विरोधात काही प्रयत्न केले तर मी भाजपाचा पाया हादरवून टाकेन; ममता बॅनर्जी यांचे आव्हान
16
Solapur Crime: एकाच दिवशी चौघांनी मृत्युला मारली मिठी, कुणी घरात, कुणी बाहेर संपवले आयुष्य
17
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! गुंतवणूकदारांचे ३३,००० कोटी पाण्यात! 'हे' ठरले टॉल लूजर्स
18
मार्च पर्यंत ४००० अब्ज डॉलर्सची होणार देशाची अर्थव्यवस्था; कोणी केला हा दावा, पाहा
19
IND vs SA 2nd Test Day 4 Stumps : दोन्ही सलामीवीर तंबूत! कुलदीपला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याची वेळ!
20
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 17:48 IST

भाजप आणि निवडणूक आयोगावर ममता बॅनर्जींची तीव्र टीका;

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी SIR प्रक्रियेवरुन निवडणूक आयोग आणि केंद्रातील भाजपव सरकारवर गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटले की, एसआयआर पूर्ण झाल्यानंतर आणि मतदार याद्यांचा मसुदा प्रसिद्ध झाल्यानंतर लोकांना भाजप आणि आयोगाने निर्माण केलेल्या आपत्तीचे खरी चित्र स्पष्ट दिसेल. त्यांनी नुकत्याच झालेल्या बिहार निवडणुकीचे निकालही एसआयआरशी जोडत तीव्र शंका उपस्थित केली.

...तर भाजपला देशभरात

एसआयआरविरोधी सभेत भाषण करताना ममता बॅनर्जी यांनी थेट भाजपला आव्हान दिले. त्यांनी म्हटले की, बिहारचा निकाल एसआयआरचा परिणाम आहे. विरोधक भाजपची चाल ओळखू शकले नाही. जर एसआयआर 2-3 वर्षांनी केला असता, तर आम्ही त्याला सहकार्य केले असते, पण आता हे राजकीय हेतूने केले जात आहे. त्यांनी दावा केला की, बंगालमध्ये त्यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न झाल्यास त्या देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकतील.

निवडणूक आयोग निष्पक्ष राहिला नाही

ममता यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, आयोग आता निष्पक्ष संस्था राहिली नाही. ते भाजपचे कमीशन बनले आहे. भाजप माझ्याशी राजकीय लढत देऊ शकत नाही, म्हणून इतर मार्ग वापरते. भाजपशासित राज्यांमध्ये एसआयआर होत असेल, तर केंद्र मान्य करते का की तिथेही घुसखोर आहेत? बांग्लादेशी हटवणे उद्देश असेल, तर यूपी-एमपीमध्ये एसआयआर का नाही? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

घुसखोरीबाबत केंद्रावर थेट निशाणा

रोहिंग्या किंवा इतर घुसखोर भारतात येत असतील, तर मग सीमांची जबाबदारी कोणाची? बॉर्डर मॅनेजमेंट केंद्र सरकार करते. CISF विमानतळ सांभाळते. कस्टम्स केंद्राच्या अखत्यारीत आहे. नेपाळ सीमा कोण सांभाळतो? सीमांची जबाबदारी राज्यावर ढकलून बंगालला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बंगाल ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात बीजेपी येत्या निवडणुकीत गुजरातमध्ये पराभूत होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Mamata Banerjee threatens to shake BJP nationwide over SIR process.

Web Summary : Mamata Banerjee criticizes the SIR process, accusing BJP of political motives and unfair elections. She questioned the Election Commission's impartiality and challenged the BJP to implement SIR in its own states. Banerjee warned that attempts to weaken her in Bengal would lead to BJP's downfall nationwide.
टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपा