शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 17:48 IST

भाजप आणि निवडणूक आयोगावर ममता बॅनर्जींची तीव्र टीका;

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी SIR प्रक्रियेवरुन निवडणूक आयोग आणि केंद्रातील भाजपव सरकारवर गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटले की, एसआयआर पूर्ण झाल्यानंतर आणि मतदार याद्यांचा मसुदा प्रसिद्ध झाल्यानंतर लोकांना भाजप आणि आयोगाने निर्माण केलेल्या आपत्तीचे खरी चित्र स्पष्ट दिसेल. त्यांनी नुकत्याच झालेल्या बिहार निवडणुकीचे निकालही एसआयआरशी जोडत तीव्र शंका उपस्थित केली.

...तर भाजपला देशभरात

एसआयआरविरोधी सभेत भाषण करताना ममता बॅनर्जी यांनी थेट भाजपला आव्हान दिले. त्यांनी म्हटले की, बिहारचा निकाल एसआयआरचा परिणाम आहे. विरोधक भाजपची चाल ओळखू शकले नाही. जर एसआयआर 2-3 वर्षांनी केला असता, तर आम्ही त्याला सहकार्य केले असते, पण आता हे राजकीय हेतूने केले जात आहे. त्यांनी दावा केला की, बंगालमध्ये त्यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न झाल्यास त्या देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकतील.

निवडणूक आयोग निष्पक्ष राहिला नाही

ममता यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, आयोग आता निष्पक्ष संस्था राहिली नाही. ते भाजपचे कमीशन बनले आहे. भाजप माझ्याशी राजकीय लढत देऊ शकत नाही, म्हणून इतर मार्ग वापरते. भाजपशासित राज्यांमध्ये एसआयआर होत असेल, तर केंद्र मान्य करते का की तिथेही घुसखोर आहेत? बांग्लादेशी हटवणे उद्देश असेल, तर यूपी-एमपीमध्ये एसआयआर का नाही? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

घुसखोरीबाबत केंद्रावर थेट निशाणा

रोहिंग्या किंवा इतर घुसखोर भारतात येत असतील, तर मग सीमांची जबाबदारी कोणाची? बॉर्डर मॅनेजमेंट केंद्र सरकार करते. CISF विमानतळ सांभाळते. कस्टम्स केंद्राच्या अखत्यारीत आहे. नेपाळ सीमा कोण सांभाळतो? सीमांची जबाबदारी राज्यावर ढकलून बंगालला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बंगाल ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात बीजेपी येत्या निवडणुकीत गुजरातमध्ये पराभूत होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Mamata Banerjee threatens to shake BJP nationwide over SIR process.

Web Summary : Mamata Banerjee criticizes the SIR process, accusing BJP of political motives and unfair elections. She questioned the Election Commission's impartiality and challenged the BJP to implement SIR in its own states. Banerjee warned that attempts to weaken her in Bengal would lead to BJP's downfall nationwide.
टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपा