कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी SIR प्रक्रियेवरुन निवडणूक आयोग आणि केंद्रातील भाजपव सरकारवर गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटले की, एसआयआर पूर्ण झाल्यानंतर आणि मतदार याद्यांचा मसुदा प्रसिद्ध झाल्यानंतर लोकांना भाजप आणि आयोगाने निर्माण केलेल्या आपत्तीचे खरी चित्र स्पष्ट दिसेल. त्यांनी नुकत्याच झालेल्या बिहार निवडणुकीचे निकालही एसआयआरशी जोडत तीव्र शंका उपस्थित केली.
...तर भाजपला देशभरात
एसआयआरविरोधी सभेत भाषण करताना ममता बॅनर्जी यांनी थेट भाजपला आव्हान दिले. त्यांनी म्हटले की, बिहारचा निकाल एसआयआरचा परिणाम आहे. विरोधक भाजपची चाल ओळखू शकले नाही. जर एसआयआर 2-3 वर्षांनी केला असता, तर आम्ही त्याला सहकार्य केले असते, पण आता हे राजकीय हेतूने केले जात आहे. त्यांनी दावा केला की, बंगालमध्ये त्यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न झाल्यास त्या देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकतील.
निवडणूक आयोग निष्पक्ष राहिला नाही
ममता यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, आयोग आता निष्पक्ष संस्था राहिली नाही. ते भाजपचे कमीशन बनले आहे. भाजप माझ्याशी राजकीय लढत देऊ शकत नाही, म्हणून इतर मार्ग वापरते. भाजपशासित राज्यांमध्ये एसआयआर होत असेल, तर केंद्र मान्य करते का की तिथेही घुसखोर आहेत? बांग्लादेशी हटवणे उद्देश असेल, तर यूपी-एमपीमध्ये एसआयआर का नाही? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
घुसखोरीबाबत केंद्रावर थेट निशाणा
रोहिंग्या किंवा इतर घुसखोर भारतात येत असतील, तर मग सीमांची जबाबदारी कोणाची? बॉर्डर मॅनेजमेंट केंद्र सरकार करते. CISF विमानतळ सांभाळते. कस्टम्स केंद्राच्या अखत्यारीत आहे. नेपाळ सीमा कोण सांभाळतो? सीमांची जबाबदारी राज्यावर ढकलून बंगालला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बंगाल ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात बीजेपी येत्या निवडणुकीत गुजरातमध्ये पराभूत होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
Web Summary : Mamata Banerjee criticizes the SIR process, accusing BJP of political motives and unfair elections. She questioned the Election Commission's impartiality and challenged the BJP to implement SIR in its own states. Banerjee warned that attempts to weaken her in Bengal would lead to BJP's downfall nationwide.
Web Summary : ममता बनर्जी ने एसआईआर प्रक्रिया की आलोचना करते हुए भाजपा पर राजनीतिक मंशा और अनुचित चुनावों का आरोप लगाया। उन्होंने चुनाव आयोग की निष्पक्षता पर सवाल उठाया और भाजपा को अपने राज्यों में एसआईआर लागू करने की चुनौती दी। बनर्जी ने चेतावनी दी कि बंगाल में उन्हें कमजोर करने के प्रयासों से राष्ट्रीय स्तर पर भाजपा का पतन होगा।